शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

शहान्नवव्या वर्षी नेत्रदानातून दृष्टी

By admin | Updated: May 6, 2017 02:22 IST

आयुष्याची ९६ वर्षे सरली; पण एवढ्या वृद्धापकाळात कोणाला दृष्टिदान मिळाल्याचे आजोबांनी ऐकले होते ना पाहिले. म्हणूनच हे आजोबा

लोकमत न्यूज नेटवर्कचिंचवड : आयुष्याची ९६ वर्षे सरली; पण एवढ्या वृद्धापकाळात कोणाला दृष्टिदान मिळाल्याचे आजोबांनी ऐकले होते ना पाहिले. म्हणूनच हे आजोबा ठरलेत अत्यंत भाग्यवान. महिन्याभरापूर्वी झालेल्या पंतूचा चेहरा न्याहळताना त्यांचे हात थरथरले आणि डोळ्यात दाटून आले आनंदाश्रू. डोळे दान करणारा दाता अन् त्यांचे यशस्वी प्रत्यारोपण करणारे डॉक्टर यांच्या प्रति त्यांच्या मनात आहेत कृतज्ञतेचे भाव.पुण्यातील रंगनाथ नामदेव भागवत (वय ९६) यांची उभी हयात कष्टात गेली. बहुतांशी आरोग्य निरोगी लाभले. हीच या आजोबांची सर्वांत मोठी पुंजी. पण, आयुष्याला कोणाचीतरी दृष्ट लागली. १९८९ मध्ये त्यांचे मोतिबिंदूचे आॅपरेशन झाले. मात्र, आॅगस्ट २०१६ ला त्यांच्या डोळ्यात पांढरा डाग दिसू लागला. हळूहळू त्यांची दृष्टी कमजोर होऊ लागली. पाहता पाहता त्यांचे दिसणे बंद झाले.याच परिस्थितीत त्यांना पणतू झाल्याची बातमी कानावर पडली; परंतु त्याला पाहण्यासाठी त्यांच्याकडे पूर्वीसारखी दृष्टी नव्हती. यासाठी त्यांचा मुलगा रवींद्र व राजेंद्र यांनी रुग्णालयात तपासणी करून घेतली. डॉक्टरांनी त्यांचे बुब्बुळ खराब झाल्याचे सांगितल्यानंतर त्यांच्या कुटुंबाला धक्का बसला. मात्र, नेत्रदानातून आलेल्या बुब्बुळाचे प्रत्यारोपण करून दृष्टी मिळू शकते, असे डॉक्टरांनी सांगितले. परंतु, वयाच्या ९६ व्या वर्षी नेत्ररोपण करण्याबाबत त्यांच्या कुटुंबात चर्चा सुरू झाली. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांची नावनोंदणी नेत्रपेढीत करण्यात आली. २८ एप्रिल रोजी नेत्रपेढीत नेत्रदान झाले. २९ तारखेला डॉक्टरांनी भागवत परिवाराला फोन करून नेत्र प्रत्यारोपण करण्यासाठी बोलाविले. त्याच दिवशी येथील डॉ. सीमा जगदाळे-मांढरे व शिल्पा जोशी यांनी त्यांचे नेत्ररोपण शस्त्रक्रिया पूर्ण केली. या शस्त्रक्रियेत आजोबांच्या प्रकृतीनेही चांगली साथ दिली. अतिशय किचकट असणारी ही शस्त्रक्रिया करणे हे डॉक्टरांपुढे आव्हान होते; परंतु त्यांच्या प्रकृतीचा विचार करत डॉक्टरांनी ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली. त्याचा आनंद डॉक्टरांच्या चेहऱ्यावरही दिसत होता.मृत्यूपच्छात होणाऱ्या नेत्रदानामुळे कोणाच्यातरी आयुष्यात चांगले दिवस येतात याचीच प्रचिती या नेत्रदानातून मिळाली आहे. ज्या परिवाराने आपल्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांचे नेत्रदान करून घेतले, त्यांच्या या सामाजिक बांधिलकीमुळेच मी आज पुन्हा हे सुंदर जग पाहू शकलो, अशा भावना त्या आजोबांनी व्यक्त केल्या.गैरसमजामुळे चळवळीला येताहेत अडचणीनेत्रदानासाठी वयाची मर्यादा लागत नाही. तसेच नेत्ररोपण शस्त्रक्रिया करण्यासाठीही वय पाहायची गरज नाही, असाच अनुभव या घटनेतून आला आहे. मृत्यूनंतर नेत्रदान करण्याची मानसिकता समाजात रुजणे महत्त्वाचे आहे. नेत्रदान जनजागृतीसाठी अनेक संस्था व कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. मात्र, अजूनही समाजात याबाबत गैरसमज असल्याने अडचणी येत आहेत. बुबुळाला दुसरा कृत्रिम पर्याय उपलब्ध नसल्याने अंध व्यक्तीच्या आयुष्यात प्रकाश टाकण्यासाठी नेत्रदान होणे महत्त्वाचे आहे. यासाठी समाजातील व्यक्तींनी नेत्रदान करून घेण्याचा संकल्प धरून नेत्रदान करून घेतले पाहिजे. म्हणजेच ‘नेत्रदाता’ झाले पाहिजे. - डॉ. मदन देशपांडे