शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

शुभमंगल योजनेस रिसोड तालुक्यात खो

By admin | Updated: May 14, 2014 22:36 IST

तालुक्यामध्ये एकाही सामाजिक नोंदणीकृत संस्थेद्वारा यावर्षात सामुहिक विवाह सोहळय़ाचे आयोजन केले नाही.

रिसोड: दोन जिवांचे अतुट संबंध जोडणारा विवाह सोहळा अनेकांना कर्जाच्या खाईत लोटणारा ठरतो. शेतकर्‍यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाने शुभमंगल कन्यादान योजना सुरु केलेली आहे. पण २0१३-२0१४ यावर्षात तालुक्यामध्ये एकाही सामाजिक नोंदणीकृत संस्थेद्वारा सामुहिक विवाह सोहळय़ाचे आयोजन केले नाही. यामुळे या शुभमंगल कन्यादान योजनेस रिसोड तालुक्यात ब्रेक लागले असल्याचे दिसून येत आहे. सामाजिक न्याय विभागांतर्गत समाजकल्याण अधिकार्‍यामार्फत तर महिला बालकल्याण विकास विभागाअंतर्गत महिला बालविकास अधिकार्‍यामार्फत कन्यादान योजना राबविण्याची व्यवस्था आहे. शासनाच्या वतीने विवाह सोहळय़ातील कागदपत्राची पुर्तता करणार्‍या प्रत्येकी जोडप्यास १0 हजार रुपयाचे अनुदान देण्यात येते तसेच शुभमंगल सोहळय़ाचे आयोजन करणार्‍या सामाजिक संस्थेस जोडप्यामागे दोन हजार रुपयाचे अनुदान देण्याची तरतूद आहे. या सामुहिक सोहळय़ाकरीता जोडप्यांची र्मयादा दिली आहे. मागील वर्षी तालुक्यात १५१ जोडप्यांचे सामुहिक विवाहसोहळय़ांमध्ये शुभमंगल पार पडले. त्या जोडप्यांना या योजनेचा लाभ मिळाला. प्रत्येक गावातून तीन ते चार विवाहसोहळा होतात. तालुक्यातील ९८ गावांमध्ये सरासरी तीन ते चार हजार शुभमंगल विवाह सोहळे होतात. कन्यादान योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करण्याची प्रक्रिया अतिशय क्लिष्ट असल्यामुळे सामाजिक संस्था पुढाकार घेत नाहीत. त्यामुळे योजनेस तालुक्यात खो मिळाला आहे.