शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

संप करणा-या व्यापा-यांना गोळ्या घाला - रघुनाथदादा पाटील

By admin | Updated: July 20, 2016 15:07 IST

देशातील अनेक राज्यात बाजार समित्यांविना शेतक-यांचा माल विकला जातो. राज्यातील भाजप सरकार हे शेतक-यांच्या पाठीशी नसून ते व्यापा-यांच्या पाठीशी आहे.

ऑनलाइन लोकमत 
सोलापूर, दि. २० - देशातील अनेक राज्यात बाजार समित्यांविना शेतक-यांचा माल विकला जातो. राज्यातील भाजप सरकार हे शेतक-यांच्या पाठीशी नसून ते व्यापा-यांच्या पाठीशी आहे. सध्याचा शेतकरी स्वत:चा माल विकण्यास सक्षम असून याला बाजार समित्यांची गरज नाही. शेतक-यांच्या हिताच्या निर्णयाविरूध्द जर व्यापारी जात असेल तर त्या व्यापा-यांना गोळ्या घाला, लाठी चार्ज करा असे सडेतोड आवाहन शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केले.
 
शेतक-यांच्या विविध प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाप्रसंगी ते बोलत होते. पार्क चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेतक-यांचा भव्य मोर्चा निघाला होता. या मोर्चात भाकड जनावरेही आणण्यात आली होती.
 
पुढे बोलताना रघुनाथदादा पाटील म्हणाले की, भाजप सरकार व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणत आहे़ स्वातंत्र्याची गळचेपी करणारे लोक सत्तेवर येतील असे कधीच वाटले नव्हतं. भाजप सरकारनं भारतीय घटनेचा सन्मान करीत शेतक-यांना न्याय देण्याचे काम करावं. पशुधनाच्या किंमती कमी झाल्या आहेत. भाकड जनावरं पाळण कठीण झालं आहे़ विकायला गेलो तर हिंदूत्ववादी संघटना व पोलीस प्रशासन संगनमत करून शेतक-यांची आर्थिक लूट करीत आहेत. आगामी काळात शेतक-यांच्या विरोधातील सरकारला पायउतार करण्यासाठी शेतकरी संघटना काम करणार आहे असेही रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले.