शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

संप करणा-या व्यापा-यांना गोळ्या घाला - रघुनाथदादा पाटील

By admin | Updated: July 20, 2016 15:07 IST

देशातील अनेक राज्यात बाजार समित्यांविना शेतक-यांचा माल विकला जातो. राज्यातील भाजप सरकार हे शेतक-यांच्या पाठीशी नसून ते व्यापा-यांच्या पाठीशी आहे.

ऑनलाइन लोकमत 
सोलापूर, दि. २० - देशातील अनेक राज्यात बाजार समित्यांविना शेतक-यांचा माल विकला जातो. राज्यातील भाजप सरकार हे शेतक-यांच्या पाठीशी नसून ते व्यापा-यांच्या पाठीशी आहे. सध्याचा शेतकरी स्वत:चा माल विकण्यास सक्षम असून याला बाजार समित्यांची गरज नाही. शेतक-यांच्या हिताच्या निर्णयाविरूध्द जर व्यापारी जात असेल तर त्या व्यापा-यांना गोळ्या घाला, लाठी चार्ज करा असे सडेतोड आवाहन शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी केले.
 
शेतक-यांच्या विविध प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी सोलापूरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाप्रसंगी ते बोलत होते. पार्क चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेतक-यांचा भव्य मोर्चा निघाला होता. या मोर्चात भाकड जनावरेही आणण्यात आली होती.
 
पुढे बोलताना रघुनाथदादा पाटील म्हणाले की, भाजप सरकार व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आणत आहे़ स्वातंत्र्याची गळचेपी करणारे लोक सत्तेवर येतील असे कधीच वाटले नव्हतं. भाजप सरकारनं भारतीय घटनेचा सन्मान करीत शेतक-यांना न्याय देण्याचे काम करावं. पशुधनाच्या किंमती कमी झाल्या आहेत. भाकड जनावरं पाळण कठीण झालं आहे़ विकायला गेलो तर हिंदूत्ववादी संघटना व पोलीस प्रशासन संगनमत करून शेतक-यांची आर्थिक लूट करीत आहेत. आगामी काळात शेतक-यांच्या विरोधातील सरकारला पायउतार करण्यासाठी शेतकरी संघटना काम करणार आहे असेही रघुनाथदादा पाटील यांनी सांगितले.