पुणे : रायगडावरून निघालेली शिवाजी महाराजांची पालखी दि. ३० रोजी पुण्यात येत आहे. २३ जून रोजी रायगडावरून प्रारंभ झालेल्या या पालखीचा पुण्याच्या पुढील प्रवास पंढरपूरला जात असलेल्या जगद्गुरू श्री तुकाराममहाराजांच्या पालखीबरोबर दौंड, बारामती, इंदापूरमार्गे होणार आहे.शिवरायांच्या या पालखी सोहळ््यात रायगडावरून २१ धारकरी निघाले होते. त्यांच्या संख्येत वाढ होत होत आता ती संख्या १६८ झाली आहे. साधनसामग्रीचा अभाव असल्याने या मुलांनी महाराजांच्या पादुका याही वर्षी डोक्यावरून आणल्या आहेत. ३५ वर्षे सुरू असलेल्या या पालखी सोहळ््याचे आगळे वैशिष्ट्य म्हणजे सांगली जिल्ह्यातील ५ वर्षांपासून ११ वर्षांपर्यंतची १३ मुलेही महाराजांच्या पादुका प्रवासात सहभागी झाली आहेत.पालखी सोहळा सुरुवातीपासूनच शक्त्ीा-भक्तीच्या समन्वयधारेत सिद्ध व्हावा, यासाठी अभिनव रिंगणाची कल्पना निश्चित केली आहे. या दुसऱ्या वर्षीच्या सोहळ््यातील पहिले शस्त्र रिंगण पुण्यात उद्या (दि. ३०) दुपारी ३.३० ते ५ या वेळेत भावे हायस्कूल, सदाशिव पेठ येथे होणार आहे.शिवरायांच्या पालखी सोहळ््यातील धारकांना व पुण्यातील शिवभक्तांना मंगलाशीर्वाद देण्यासाठी महर्षी वेदव्यास प्रतिष्ठानचे अध्यक्ष, ज्येष्ठ भागवत कथाकार स्वामी गोविंद देवगिरी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)
शिवरायांची पालखी आज येणार पुण्यात
By admin | Updated: June 30, 2016 01:31 IST