शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मंत्रिपदी शिवाजीराव नाईक की सदाभाऊ?

By admin | Updated: November 11, 2015 00:14 IST

जिल्ह्याला लाल दिवा शक्य : बिहारच्या निकालाचा भाजपवर परिणाम

अशोक पाटील -- इस्लामपूर -बिहारच्या निकालाचा परिणाम दक्षिण महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांवर होऊ नये म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीला मंत्रीपद देण्यात येणार असल्याचे सोमवारी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप आमदारांच्या मंत्रिपदाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. आता मंत्रिपदाची लॉटरी शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांना की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना लागणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.बिहार विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने भाजप सावध झाला आहे. जिल्ह्यात शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ आणि विलासराव जगताप हे भाजपचे आमदार मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. नाईक यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणुकीच्या प्रचारसभेत कॅबिनेट मंत्रीपद देऊ, असा शब्द दिला होता. याला वर्षाहून अधिक कालावधी लोटला तरी नाईक यांच्या पदरात पद पडलेले नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांत नाराजीचा सूर आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीपासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांना भाजपची कोअर कमिटी आतही येऊ देत नसल्याने या दोघांनीही आता उसाच्या एफआरपीसाठी लढा सुरू केला आहे.आघाडी शासनाच्या काळात सांगली जिल्ह्यात तीन मंत्रिपदे होती. मात्र युती शासनाने गेल्या वर्षभरात सांगलीकडे फारसे लक्ष दिलेले नाही. पण आता बिहारमधील पराभवाचे पडसाद दक्षिण महाराष्ट्रावर पडू नयेत, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला फटका बसू नये म्हणून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्ह्याला मंत्रिपद मिळणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे जिल्ह्यातील भाजपच्या चार आमदारांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मंत्रिपदाचे वेध लागले आहे. मात्र शिवाजीराव नाईक आणि सदाभाऊ खोत हेच प्रबळ दावेदार मानले जातात.