शहरं
Join us  
Trending Stories
1
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
2
पंतप्रधान मोदींनी आदमपूर एअरबेस का निवडला? एकाच झटक्यात पाकिस्तानची खोट्याची ८ मिसाईल पाडली...
3
Viral Video : प्रियकराचं लागत होतं लग्न, ऐन मुहूर्तावर झाली प्रेयसीची एंट्री; पुढं काय झालं बघाच!
4
चिनी क्षेपणास्त्रांनी आधी मैदानात मार खाल्ला, आता शेअर बाजारातही लाज निघाली
5
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
6
शत्रुला शांतपणे झोप का लागत नाही? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'त्या' फोटोद्वारे दिला थेट संदेश...
7
Rambabu Singh : अवघ्या ४ महिन्यांपूर्वी लग्न झालेले जवान रामबाबू सिंह शहीद; पत्नीला अजून सांगितलंच नाही...
8
१० तारखेला वाढदिवस साजरा केला अन् दुसऱ्याच दिवशी...; आईसह २ मुलांचा दुर्दैवी अंत
9
धक्कादायक! अचानक तोल गेला अन् खासदार अजय मंडल पडले खाली; पायाला झालं फ्रॅक्चर
10
₹२३९२ चा 'हा' शेअर आपटून आला ₹५१ वर; सोमवारी दोन मोठे राजीनामे, गुंतवणूकदारांना झटका
11
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
12
Astro Tips: गाडीच्या डॅशबोर्डवर कोणत्या देवतेची मूर्ती ठेवणे ठरते अधिक लाभदायी?
13
"वाढलेल्या वजनामुळे मला.."; 'हास्यजत्रा' फेम ईशाने केला मोठा खुलासा, झालेला हा आजार
14
Operation Sindoor : काहींचे हात तुटले, तर काहींना गंभीर दुखापत झाली, असीम मुनीर यांनी पाकिस्तानी सैनिकांची अवस्था दाखवली
15
म्युच्युअल फंड की FD.. गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला? फक्त परतावा पाहू नका, 'हे' समजून घ्या
16
लग्नात नायट्रोजनचा धूर ठरला घातक; नवरा-नवरीच्या एन्ट्रीदरम्यान ७ वर्षांच्या मुलीचा गेला जीव
17
भारतीय सैन्याच्या रिटायर्ड कॅप्टनची घरात घुसून हत्या; सरपंचाने मध्यरात्री केला हल्ला
18
High Alert: दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
19
आधी वरमाला घातली अन्..; अभिनेत्याचा बायकोसोबत खास डान्स, रत्नागिरीत गावकऱ्यांच्या साथीने धरला ठेका
20
IPL च्या सामन्यांतून BCCI ची कमाई किती होते, उत्पन्नाचे स्त्रोत काय, कुठून येतो पैसा?

मंत्रिपदी शिवाजीराव नाईक की सदाभाऊ?

By admin | Updated: November 11, 2015 00:14 IST

जिल्ह्याला लाल दिवा शक्य : बिहारच्या निकालाचा भाजपवर परिणाम

अशोक पाटील -- इस्लामपूर -बिहारच्या निकालाचा परिणाम दक्षिण महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांवर होऊ नये म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगलीला मंत्रीपद देण्यात येणार असल्याचे सोमवारी सांगितले. त्यामुळे जिल्ह्यातील भाजप आमदारांच्या मंत्रिपदाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. आता मंत्रिपदाची लॉटरी शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांना की स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना लागणार, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.बिहार विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्याने भाजप सावध झाला आहे. जिल्ह्यात शिवाजीराव नाईक, सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ आणि विलासराव जगताप हे भाजपचे आमदार मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. नाईक यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणुकीच्या प्रचारसभेत कॅबिनेट मंत्रीपद देऊ, असा शब्द दिला होता. याला वर्षाहून अधिक कालावधी लोटला तरी नाईक यांच्या पदरात पद पडलेले नाही. त्यामुळे त्यांच्या समर्थकांत नाराजीचा सूर आहे. त्यातच लोकसभा निवडणुकीपासून गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले खासदार राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांना भाजपची कोअर कमिटी आतही येऊ देत नसल्याने या दोघांनीही आता उसाच्या एफआरपीसाठी लढा सुरू केला आहे.आघाडी शासनाच्या काळात सांगली जिल्ह्यात तीन मंत्रिपदे होती. मात्र युती शासनाने गेल्या वर्षभरात सांगलीकडे फारसे लक्ष दिलेले नाही. पण आता बिहारमधील पराभवाचे पडसाद दक्षिण महाराष्ट्रावर पडू नयेत, तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला फटका बसू नये म्हणून पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जिल्ह्याला मंत्रिपद मिळणार असल्याचे सांगितले आहे. यामुळे जिल्ह्यातील भाजपच्या चार आमदारांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मंत्रिपदाचे वेध लागले आहे. मात्र शिवाजीराव नाईक आणि सदाभाऊ खोत हेच प्रबळ दावेदार मानले जातात.