शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हे कुळवाडीभूषणच- संभाजीराजे भोसले

By admin | Updated: June 27, 2017 21:35 IST

शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हे तर कुळवाडीभूषणच असल्याचे मत राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज व खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 27 - छत्रपती शिवाजी महराज हे कधीही मुसलमानांच्या विरोधात नव्हते. त्यांनी आठरा पगडजाती आणि बाराबलुतेदरांना सोबत घेऊन रयतेच राज्य स्थापन केले. यामुळे शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हे तर कुळवाडीभूषणच असल्याचे मत राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज व खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज अध्यास केंद्रातर्फे खासदार संभाजीराजे भोसले आणि ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य टी.एस. पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. तर व्यासपीठावर कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, डॉ. राजेश रगडे, डॉ. नंदकुमार राठी, डॉ. राम चव्हाण आणि डॉ. राजेश रगडे उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या कार्यकाळात २०० वर्षांपेक्षा अधिक फरक आहे. शिवाजी महाराज यांनी बाराबलुतेदारांना सहभागी करून स्वराज्याची स्थापना केली. तर छत्रपती शाहू महाराजांनी बहुजनांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले. दोघांमध्ये रतय आणि बहुजनांची प्रगती हेच महत्वाचे असल्याचे संभाजीराजे भोसले यांनी सांगितले. दोन्ही राजांकडे दलित व सवर्ण हा शब्दप्रयोग करण्यात आलेला नाही. दोघांनाही बहुजन हाच शब्द वापरला. यामुळे बहुजनांच्या उध्दारासाठी शाहू महाराजांनी शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे ओळखले होते. यासाठी राज्याच्या एकुण महसुलाच्या २३ टक्के वाटा हा शिक्षणावर खर्च करण्याचे धोरण अवलंबिले. सुरुवातील सर्व जातीधर्मातील विद्यार्थ्यांसाठी एकच बोर्डिंग काढले. पण हा प्रयोग फसल्यामुळे शाहू महाराजांनी विविध समाजाचे तब्बल २३ बोर्डिंगकाढून बहुजन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. कार्यक्रमाच प्रस्ताविक शाहू महाराज अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. राजेश करपे यांनी केले. यात अध्यासन केंद्राच्या प्रगतीचा आढावा घेतला. संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. हंसराज जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. पुरूषोत्तम देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, अधिकारी, प्राध्यापक उपस्थित होते.नुसतेच पुरोगामी असून चालणार नाहीसर्वजण पुरोगामी असल्याचे सांगतात. मात्र त्यांनी फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार किती आत्मसात केले. हा महत्वाचा मुद्दा आहे. शाहू घराण्याचा वारसदार म्हणून मी केवळ मराठ्यांचे नेतृत्व करत नाही. तर सर्व बहुजनांचे नेतृत्व करत असल्याचे संभाजीराजे भोसले यांनी स्पष्ट केले.