शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हे कुळवाडीभूषणच- संभाजीराजे भोसले

By admin | Updated: June 27, 2017 21:35 IST

शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हे तर कुळवाडीभूषणच असल्याचे मत राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज व खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले

ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. 27 - छत्रपती शिवाजी महराज हे कधीही मुसलमानांच्या विरोधात नव्हते. त्यांनी आठरा पगडजाती आणि बाराबलुतेदरांना सोबत घेऊन रयतेच राज्य स्थापन केले. यामुळे शिवाजी महाराज गोब्राह्मणप्रतिपालक नव्हे तर कुळवाडीभूषणच असल्याचे मत राजर्षी शाहू महाराज यांचे वंशज व खासदार संभाजीराजे भोसले यांनी व्यक्त केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज अध्यास केंद्रातर्फे खासदार संभाजीराजे भोसले आणि ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य टी.एस. पाटील यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे होते. तर व्यासपीठावर कुलसचिव डॉ. प्रदीप जब्दे, डॉ. राजेश रगडे, डॉ. नंदकुमार राठी, डॉ. राम चव्हाण आणि डॉ. राजेश रगडे उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या कार्यकाळात २०० वर्षांपेक्षा अधिक फरक आहे. शिवाजी महाराज यांनी बाराबलुतेदारांना सहभागी करून स्वराज्याची स्थापना केली. तर छत्रपती शाहू महाराजांनी बहुजनांना मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य केले. दोघांमध्ये रतय आणि बहुजनांची प्रगती हेच महत्वाचे असल्याचे संभाजीराजे भोसले यांनी सांगितले. दोन्ही राजांकडे दलित व सवर्ण हा शब्दप्रयोग करण्यात आलेला नाही. दोघांनाही बहुजन हाच शब्द वापरला. यामुळे बहुजनांच्या उध्दारासाठी शाहू महाराजांनी शिक्षणाशिवाय पर्याय नसल्याचे ओळखले होते. यासाठी राज्याच्या एकुण महसुलाच्या २३ टक्के वाटा हा शिक्षणावर खर्च करण्याचे धोरण अवलंबिले. सुरुवातील सर्व जातीधर्मातील विद्यार्थ्यांसाठी एकच बोर्डिंग काढले. पण हा प्रयोग फसल्यामुळे शाहू महाराजांनी विविध समाजाचे तब्बल २३ बोर्डिंगकाढून बहुजन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले असल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले. कार्यक्रमाच प्रस्ताविक शाहू महाराज अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. राजेश करपे यांनी केले. यात अध्यासन केंद्राच्या प्रगतीचा आढावा घेतला. संजय शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. हंसराज जाधव यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. पुरूषोत्तम देशमुख यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, अधिकारी, प्राध्यापक उपस्थित होते.नुसतेच पुरोगामी असून चालणार नाहीसर्वजण पुरोगामी असल्याचे सांगतात. मात्र त्यांनी फुले-शाहू-आंबेडकर यांचे विचार किती आत्मसात केले. हा महत्वाचा मुद्दा आहे. शाहू घराण्याचा वारसदार म्हणून मी केवळ मराठ्यांचे नेतृत्व करत नाही. तर सर्व बहुजनांचे नेतृत्व करत असल्याचे संभाजीराजे भोसले यांनी स्पष्ट केले.