शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

केंद्रातून शिवसेनेची माघार, राज्यातही विरोधी बाकावर बसणार ?

By admin | Updated: November 9, 2014 18:32 IST

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्यास दांडी मारुन भाजपाला शिवसेनेचा 'स्वाभिमान' दाखवला आहे.

 ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ९ - केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये शिवसेनेने दांडी मारत भाजपाच्या तोडग्यावर असमाधानी असल्याचे दाखवून दिले.  शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेना खासदार अनिल देसाई दिल्लीत पोहोचले खरे मात्र मातोश्रीवरुन आदेश आल्याने देसाई विमानतळाबाहेर न पडताच तिथूनच मुंबईत परतले.  

शिवसेना आणि भाजपामधील तणाव उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामध्ये फोनवर झालेल्या चर्चेमुळे निवळल्याचे दिसत होते. शिवसेनेनेही राज्यसभेतील खासदार अनिल देसाई यांची केंद्रीय मंत्रिमंडळासाठी शिफारस केली होती. यानुसार देसाई रविवारी सकाळी दिल्लीकडे रवानाही झाले होते. मात्र भाजपाने देसाई यांना राज्यमंत्रिपद देण्याची तयारी दर्शवल्याने शिवसेनेच्या गोटात नाराजीचे वातावरण निर्माण झाले. अनिल देसाई दिल्लीत दाखल झाले होते, मात्र अर्धा तासाचा कालावधी लोटला तरी विमानतळावरुन बाहेर पडत नव्हते. त्यामुळे सेना - भाजपा युतीविषयी संभ्रम निर्माण झाला. अखेरीस मातोश्रीवरुन उद्धव ठाकरे यांनी देसाई यांना फोन करुन माघारी परतण्याचे आदेश दिले. यानंतर दिल्लीत दाखल झालेले शिवसेनेचे अन्य खासदारही विमानतळावर पोहोचले व शिवसेना शपथविधी सोहळ्यात सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्राविषयी तोडगा निघत नसल्याने केंद्रीय मंत्रिमंडळात शपथविधी घेण्यात काहीही उपयोग नाही, आम्ही शपथविधीत जाणार नाही अशी प्रतिक्रिया खा. आनंदराव अडसळू यांनी विमानतळावर पत्रकारांशी बोलताना दिली. 

आज संध्याकाळी मुंबईत शिवसेना आमदारांची निवड केली जाणार आहे.यामध्ये शिवसेनेचा विधीमंडळातील गटनेत्याची निवड होणार आहे. या बैठकीतही शिवसेना राज्यात विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेईल अशी माहिती सूत्रांनी दिली.