शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मैदानांच्या बदल्यात मिळवले शिवसेनेचे सहकार्य - नारायण राणे

By admin | Updated: July 29, 2016 18:13 IST

मुंबईतील मैदाने पुन्हा एकदा क्लब आणि संस्थांना बहाल करण्याच्या बदल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे सहकार्य मिळविल्याचा आरोप काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शुक्रवारी केला

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. २९ : मुंबईतील मैदाने पुन्हा एकदा क्लब आणि संस्थांना बहाल करण्याच्या बदल्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे सहकार्य मिळविल्याचा आरोप काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शुक्रवारी केला. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री मातोश्रीवर जाऊन आले. सत्तेबाहेर पडण्याच्या धमक्या देणा-या शिवसेनेचा आवाज या भेटीनंतर बंद झाला. शिवसेना नेत्यांकडे असलेली उद्याने-मैदाने कायम ठेवण्याच्या बदल्यात ही तडजोड झाली का, असा सवाल राणे यांनी विधिमंडळ प्रांगणात पत्रकारांशी बोलताना केला.

तत्पूर्वी राणे यांनी विधान परिषदेत मुंबईतील उद्याने आणि मैदानांबत नियम २८९ अन्वये स्थगन प्रस्ताव मांडला. मुंबई महापालिकेने काही उद्याने, मैदाने खासगी संस्थांना देखभालीसाठी दिली होती. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या तक्रारीनंतर मुख्यमंत्र्यांनी ही मैदाने महापालिकेकडे परत घेण्याचे निर्देष दिले होते. त्याप्रमाणे १२५ मैदाने-उद्याने महापालिकेने परत घेतली. ७४ व्या घटनादुरुस्तीनुसार महापालिकेच्या कारभारात राज्य सरकारला हस्तक्षेप करता येत नाही. मग, मुख्यमंत्र्यांनी कोणत्या अधिकारात मैदाने परत घेण्याबाबतचे आदेश दिले, असा सवाल राणे यांनी केला.

आता परत ही मैदाने खासगी संस्था आणि क्लबना बहाल करण्यात येणार आहेत. २७ जुलै रोजी तसा निर्णय झाला आहे. मधल्या काळात असे काय घडले की मुख्यमंत्र्यांना निर्णय बदलावा लागला. मातोश्री येथील भोजनानंतर हा निर्णय झाल्याचा आरोप राणे यांनी केला.

मुंबई ही केवळ देशाची आर्थिक राजधानी नसून एक जागतिक पर्यटन शहर आहे. सव्वाकोटी लोकसंख्येच्या मुंबईत मैदाने व उद्याने जनतेच्या सोयीसाठी महत्त्वाची आहेत. म्हणूनच महापालिकेच्या विकास आराखड्यात त्यासाठी आरक्षण ठेवलेले असते. महापालिकेने २१६ मैदाने संस्थांना देखभालीसाठी दिले होते.

ते किती वर्षांसाठी देण्यात आले होते? त्या जागा आता सुरक्षित आहेत का? तिथे संस्थांनी खाजगी क्लब स्थापन केले आहेत का ? सामान्य जनतेला याचा उपयोग होतोय का? याची माहिती सरकारने घेऊन सभागृहाला द्यावी, अशी मागणी राणे यांनी या प्रस्तावाद्वारे केली.