शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मध्य रेल्वेची ठाणे ते सीएसएमटी दरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद
2
मिठी नदी धोक्याच्या पातळीवर; नदीलगतच्या कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवलं, बीकेसीत पाणी साचण्याची शक्यता
3
ती गुढ आग... ज्यात भारताचं सेमीकंडक्टर बनवण्याचं स्वप्न झालं होतं जळून खाक, ७ फेब्रुवारी १९८९ रोजी नेमकं काय झालं होतं?
4
सावधान! अनोळखी व्यक्तीला कॅशच्या बदल्यात पैसे ट्रान्सफर करताय? 'या' एका चुकीमुळे जावं लागेल थेट तुरुंगात
5
Himachal Pradesh: हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटी; अनेक घरे, गाड्या गेल्या वाहून, ४०० रस्ते बंद!
6
Miss Universe India: २२ वर्षांच्या मनिका विश्वकर्माने जिंकला 'मिस युनिव्हर्स इंडिया २०२५' चा खिताब, कोण आहे ही सुंदरी?
7
ट्रम्प यांना भेटायला गेलेल्या झेलेन्स्कींनी मेलानियांसाठी पाठवले खास पत्र; काय आहे या पत्रात?
8
आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवाराची घोषणा करणार 'I.N.D.I.A.'? ही 3 नावं शर्यतीत!
9
'हिंदुस्तान झिदाबाद...' तिरंग्यासाठी लंडनमध्ये पाकिस्तानींशी भिडल्या भारतीय तरुणी, पाहा VIDEO
10
पैसे दुप्पट करते ही सरकारी योजना; ५ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळेल १० लाखांचा गॅरंटीड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
पतीच्या निधनामुळे खचलेल्या तिच्या आयुष्यात 'तो' आला अन् मोठा झटका देऊन गेला! तरुणीसोबत घडलं असं काही की...
12
LIC ची मोठी घोषणा! बंद पडलेल्या पॉलिसी पुन्हा सुरू करण्याची सुवर्णसंधी; विलंब शुल्कातही मोठी सूट
13
मुंबईतील सर्व सरकारी कार्यालयांना सुट्टी; खासगी कंपन्यांना वर्क फ्रॉम देण्याच्या सूचना, शाळा, कॉलेज बंद
14
रोनाल्डोचा साखरपुडा आणि सौदीचे ‘रहस्य’! स्थानिकांना वेगळा नियम आणि स्टारला वेगळा न्याय, का?
15
ठाकरे बंधू किंवा महायुती कुणीही निवडणूक जिंकली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना न्याय मिळेल का?
16
चिपळुणात वाशिष्ठी नदीने ओलांडली इशारा पातळी; पूरसदृश स्थितीमुळे कामाशिवाय घराबाहेर न पडण्याची सूचना
17
"२६ जुलैचा जलप्रलय, तुम्ही मला...", वीणा जामकरने सांगितली ज्योती चांदेकरांची भावुक आठवण
18
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
19
Pune Traffic: पुण्यात सकाळपासून मुसळधार! शहरात प्रचंड वाहतूककोंडी, प्रमुख मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा
20
"झोया अख्तर बड्या बापाची मुलगी...", 'गलीबॉय'साठी ऑडिशन द्यायला सांगितल्याने भडकल्या उषा नाडकर्णी

भाजपाला शिवसेनेचा अडसर

By admin | Updated: February 14, 2017 00:54 IST

भाजपा-शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यात हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढत आहेत. तर पालिका निवडणुकीतून धडा घेत, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने

मिलिंद कुलकर्णी / जळगावभाजपा-शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या जळगाव जिल्ह्यात हे दोन्ही पक्ष स्वतंत्र लढत आहेत. तर पालिका निवडणुकीतून धडा घेत, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी करून भाजपा-सेनेला तगडे आव्हान उभे केले आहे.गेल्या १५ वर्षांपासून भाजपा-शिवसेना जिल्हा परिषद निवडणूक स्वतंत्रपणे लढवत असले, तरी सत्तेसाठी एकत्र येतात. मात्र, मुंबई महापालिका निवडणुकीतील वादंगानंतर जळगावात त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. भाजपात पूर्वी एकनाथ खडसे हे एकमुखी नेतृत्व असल्याने ते म्हणतील ती पूर्वदिशा असायची, परंतु खडसे यांचे मंत्रिपद गेल्यानंतर आठ महिन्यांत गिरीश महाजन हे प्रभावशाली झाले. विधान परिषद निवडणुकीत चंदूलाल पटेल या समर्थकाला त्यांनी निवडून आणून आपली मांड आणखी पक्की केली. पालिका निवडणुकीतही भाजपाची कामगिरी लक्षणीय राहिली. निवडणुकीत यश मिळत असले, तरी पक्षातील कुरबुरी थांबविण्यासाठी पक्षश्रेष्ठींनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जळगावचे पालकमंत्रिपद सोपविले. ऐन निवडणूक काळात ही जबाबदारी आल्याने पाटील यांनी त्यांच्या तीन दौऱ्यांमध्ये भाजपाचे गड असलेल्या गावांना भेटी आणि नेते-कार्यकर्त्यांशी संवादावर भर दिला आहे. महाजन यांच्याकडे नाशिक महापालिकेची जबाबदारी असल्याने जळगावला ते फारसा वेळ देऊ शकलेले नाही. हीच स्थिती शिवसेनेची आहे. सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे परभणीच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी असल्याने, त्यांना तिकडच्या निवडणुकीकडेही लक्ष द्यावे लागत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील आणि राज्यमंत्री दादा भुसे यांच्या सभांनी प्रचारात रंगत आणली आहे. शिवसेना-भाजपातील वाद हाच प्रचारसभांमधील ठळक मुद्दा राहिला आहे. भाजपा-शिवसेनेने ‘वचननामा’ या नावाने स्वतंत्र असे जाहीरनामे प्रकाशित केले असले, तरी दोघांनीही १५ वर्षांच्या कामगिरीचा लेखाजोखा मांडणे टाळले आहे. दोन्ही पक्षांची ही कमजोरी जोखण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस कमी पडत आहे. या दोन्ही पक्षांनी आघाडी केली असली, तरी संयुक्त प्रचार सभा होत नाही. काँग्रेस नेत्याच्या सभेला राष्ट्रवादीची मंडळी व्यासपीठावर नसते, त्यामुळे एकीचा संदेश जात नाही. नातेवाईकांना तिकिटे देण्याचे प्रमाण या निवडणुकीत मोठे आहे. त्यामुळे नेते, लोकप्रतिनिधी नातलगांच्या गटात अडकून पडले आहेत.