शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात शिवसेनेचे मताधिक्क्य

By admin | Updated: March 6, 2017 03:23 IST

शिवसेनेने विक्रमी तीन लाख चार हजार ९१३ मते मिळवित मतदारांमध्ये प्रथम लोकप्रिय असल्याचे दाखवून दिले आहे.

आविष्कार देसाई,अलिबाग- नुकत्याच झालेल्या रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने विक्रमी तीन लाख चार हजार ९१३ मते मिळवित मतदारांमध्ये प्रथम लोकप्रिय असल्याचे दाखवून दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मताधिक्क्य घटून त्यांना फक्त एक लाख ६५ हजार ७०८ मतदारांनीच कौल दिला आहे. भाजपा आणि शेकापच्या मतदारांचा आलेख मात्र चढता राहिला आहे. या निवडणुकीत काँग्रेसचीही पीछेहाट झाली आहे. आगामी काळात जिल्ह्यात शिवसेनेची घोडदौड ही अन्य प्रमुख पक्षांची डोकेदुखी ठरणार आहे.ग्रामीण राजकारणात एकेकाळी शेकाप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मक्तेदारी असायची, ती शिवसेनेने मोडीत काढली आहे. १०० कोटी रुपयांचे बजेट असणाऱ्या रायगड जिल्हा परिषदेला केंद्र आणि राज्य सरकारचा सुमारे २०० कोटी रुपयांचा निधी येतो. त्यामुळे सुमारे ३०० कोटी रुपयांच्या जिल्हा परिषदेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याच हातात असाव्यात असे सर्वच राजकीय पक्षांना वाटणे स्वाभाविक आहे. शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे हुशार नेते आहेत. रायगड जिल्हा परिषदेच्या सत्तेमध्ये सर्वाधिक वेळा बसण्याचा मान हा शेकापलाच जातो. राष्ट्रवादी काँग्रेसनेही कमी-अधिक प्रमाणात सत्ता उपभोगली आहे. पाटील आणि तटकरे या दोन नेत्यांची जिल्ह्याच्या राजकारणावर मजबूत पकड आणि प्रशासनावर जबरदस्त अंकुश आहे. यंदाच्या निवडणुकीत त्यांना टक्कर देण्यासाठी शिवसेनेने विशिष्ट व्यूहरचना आखली होती. गेल्या वर्षभरापासून शिवसेनेने जनतेपर्यंत पोचण्याचा प्रयत्न सुरू केला होता. पाटील-तटकरे हे घोटाळेबाज नेते असल्याचे राजकीय भांडवल करून त्याचा डंका अखंड जिल्हाभर पिटला गेला. त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते हे पहिल्या क्रमांकावर होते. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी झंझावाती दौरे करून शिवसेनेला कौल देण्याचे मतदारांना आवाहन केले. शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसला रोखण्यासाठी शिवसेनेने काँग्रेस आणि भाजपा यांची एकत्रित मोट बांधली. त्याला बहुतांश प्रमाणात यश आल्याचे निकालावरून दिसून येते. शेकापला २३ जागा, शिवसेनेला १८ जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त १२ जागा आणि काँग्रेस-भाजपाला प्रत्येकी तीन जागा मिळाल्या होत्या. शेकाप-राष्ट्रवादी युतीचा फायदा शेकापला जास्त झाला, तर राष्ट्रवादी काँग्रेसला या युतीने तारले, असेच म्हणावे लागेल.राष्ट्रवादी काँग्रेस नंबर एकचा पक्ष होता. त्या खालोखाल शेकाप आणि नंतर शिवसेनेचा क्रमांक होता. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापचे मताधिक्क्य सर्वाधिक होते. शिवसेना तेव्हा गणतीमध्येही नव्हती. मात्र शिवसेनेने नुकत्याच झालेल्या निवडणुकीत तब्बल तीन लाख चार हजार ९१३ मते मिळवली. शिवसेनेने मारलेली ही जोरदार मुसंडी सर्वच राजकीय पक्षांना विचार करायला लावणारी आहे. शेकापला दोन लाख ७७ हजार ३३२ मते मिळाली तर, राष्ट्रवादी काँग्रेसला एक लाख ६५ हजार ७०८, काँग्रेसला एक लाख ३० हजार ४९२, भाजपाला एक लाख ११ हजार १७० मते मिळाली. ग्रामीण निवडणुकीतील मतांची बेरीज ही भाजपासाठी चांगली गोष्ट आहे.पनवेल तालुक्यामध्ये शेकाप एक नंबरवर राहिला आहे. त्यांना ७८ हजार ३२६ मते मिळाली, दोन नंबरवर भाजपा, त्यांना ५० हजार ८३३ मते तर तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना राहिली. त्यांना नऊ हजार ४२१ मते मिळाली.>तालुकानिहाय मिळालेली मतेतालुकाशेकापशिवसेना राष्ट्रवादीभाजपाकाँग्रेसपनवेल ७८,३२६ ९,४२१ ००५०,८३३ ००कर्जत१५,८५९ ३१,५९६ ३२,४३२ ९,२७० ६,३७५खालापूर५,२५२ ३२,९६५ ३०,००२ २,१८९ ००सुधागड १२,१०१ ०० ९,०२४ ०० ००पेण ४६, १४७ १४,०४७ २,७८२, १०,०८६ २१,१५३उरण७,९८९२२,९७० ०० २०,९९० १८,१९८ अलिबाग६८,२१५ ३०,२१७ ०० १,८२० ३२,१०९मुरुड १६,०४८ १४,७२४ ०० ८६९ ००रोहे १२,२४४ २३,८८२ ३२,३३७ ७,२१५ ००तळा ०० ६,०७० १०,०६० १,६४० ४२९माणगाव ९,०३३ ३३,९८८ १९,१२९ २,५९१ १२,१५८म्हसळा ०० ९,१४७ ११,२१६ २,३७३ १,९१५श्रीवर्धन ०० १३,७४८ १३,६९०१,८३९ ४५१महाड ०० ४३,१५७ ३,९३४१,६९५ ३३,१३५पोलादपूर ६,११८ ११,२८१ १,१०२०० ४,५६९