शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

शेतक-यांना कर्जमुक्ती मिळेपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही- सावंत

By admin | Updated: May 6, 2017 02:52 IST

बाळापुरात निघाला शेतक-यांचा रूमणे मोर्चा

बाळापूर : शेतकर्‍यांना कर्जमुक्ती मिळावी व स्वामिनाथन आयोग लागू करावा, या मागण्या शिवसेनेने हाती घेतल्या आहेत. त्या पूर्ण होईपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन शिवसेनेचे संपर्क नेते खासदार अरविंद सावंत यांनी केले. ते बाळापूर येथे शिवसेनेच्यावतीने शेतकर्‍यांना कर्जमुक्ती या मागणीसाठी रूमणे मोर्चापूर्वी अकोला नाक्याजवळ मंडपात आयोजित सभेत बोलत होते. या सभेत मार्गदर्शन करताना संपर्कप्रमुख खा. अरविंद सावंत यांनी शिवसेना ८0 टक्के समाजकारण, तर २0 टक्केच राजकारण केले. कुठलीही निवडणूक नसताना शेतकर्‍यांना कर्जमुक्ती मिळावी, ही मागणी घेऊन शेतकरी हितासाठी शिवसेना काम करेल. राज्य शासनाने शेतकर्‍यांना कर्जमुक्त न केल्यास शिवसेना मंत्र्यांना गावबंदी करण्यासाठी पुढाकार घेईल, असा इशारा दिला. या सभेला प्रमुख अतिथी आमदार गोपीकिसन बाजोरिया, जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, श्रीरंग पिंजरकर, जिल्हा उपप्रमुख रवींद्र पोहरे, माजी उपप्रमुख सेवकराम ताथोड, सुभाष धनोकार, उमेशआप्पा भुसारी, तालुकाप्रमुख संजय शेळके, शहरप्रमुख बनचरे आदी होते. सभास्थळी खा. सावंत, आ. गोपीकिसन बाजोरिया, नितीन देशमुख यांची भाषणे झाली. त्यानंतर भर उन्हात बैलगाडीवर खा. सावंत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन देशमुख, महिला जिल्हाप्रमुख चोरे यांनी बसून मोर्चाचे नेतृत्व केले. शेतकरी कडक उन्हात बैलगाडीने रूमणे मोर्चात सहभागी झाले होते. अकोला नाका ते उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चाने जाऊन उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांना निवेदन देण्यात आले. कार्यालयाबाहेर सर्वांचे आभार जिल्हाप्रमुख नितीन देशमुख यांनी मानले. या मोर्चात मोठय़ा संख्येने शिवसैनिक व शेतकरी बांधव उपस्थित होते. शिवसेनेच्यावतीने शेतकर्‍यांना कर्जमुक्ती मिळावी, यासाठी रूमणे मोर्चा जिल्हा शिवसेनेच्यावतीने जिल्ह्यात प्रथमच बाळापूर विधानसभा मतदारसंघात काढण्यात आला, हे विशेष.