शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
5
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
6
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
7
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
8
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
9
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
10
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
11
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
12
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
13
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
14
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
15
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
16
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
17
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
18
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
19
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
20
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)

शिवसंग्राम संघटनेचा करणार राजकीय पक्ष

By admin | Updated: May 27, 2014 05:42 IST

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मराठा आरक्षणावरून समाजाच्या भावनेशी खेळ केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जनतेने त्यांना धडा शिकविला

 पुणे : काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने मराठा आरक्षणावरून समाजाच्या भावनेशी खेळ केला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत जनतेने त्यांना धडा शिकविला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर आधारित शिवसंग्राम संघटनेचे लवकरच राजकीय पक्षात रूपांतर करणार आहे. येत्या विधानसभा निवडणुका महायुतीबरोबर लढविणार असून, काँग्रेसमुक्त महाराष्ट्र करण्याचा निर्धार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष व आमदार विनायक मेटे यांनी सोमवारी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरही मराठा आरक्षण जाहीर करण्यास काँग्रेस आघाडीने टाळाटाळ केली. त्यामुळे राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन आमदार मेटे यांनी महायुतीशी घरोबा केला. भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या उपस्थितीत महायुतीला पाठिंबा दिला. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसंग्राम संघटनेची भूमिका जाहीर करण्यासाठी पुण्यात सोमवारी सर्वसाधारण सभा झाली. त्यावेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, मुंबई डबेवाले संघटनेचे गंगाराम तळेगावकर, संदीप तेलगावकर, डॉ. भारती लवेकर, उदय आहेर, अ‍ॅड. विजय कातोरे आदी उपस्थित होते. यावेळी संघटनेचे राजकीय पक्षात रुपांतर करण्याच्या ठरावाला एकमताने मान्यता देण्यात आली. येत्या दोन आठवड्यात नव्या राजकीय पक्षाची ध्येयधोरणे व जाहीरनामा ठरविण्यात येणार असून, २० जूनला मुंबई येथे मेळावा घेऊन पक्षाची अधिकृत घोषणा करण्यात येणार असल्याचे मेटे यांनी सांगितले. ते म्हणाले, काँग्रेस आघाडीच्या आमदारांना निवडून येण्यासाठी आणि सत्तेसाठी मराठा समाज बरोबर पाहिजे. परंतु, समाजाच्या अडचणी व समस्या सोडविण्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. त्यामुळेच मराठा आरक्षण आणि छत्रपती शिवाजी स्मारकांची केवळ घोषणाच होते. काँग्रेस आघाडीने मतासाठी शिवाजी, शाहू, फुले व डॉ. आंबेडकर यांच्या नावाचा वापर केला जातो. राज्यघटनेतील नियमानुसार आरक्षण देता येत असूनही काँग्रेस आघाडी सरकार स्वार्थी राजकारण करीत दुर्लक्ष करते. त्यामुळे शिवसंग्राम संघटना राजकारणात येऊन समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे. (प्रतिनिधी)