शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

शिरोलीत बिबट्याची दहशत!

By admin | Updated: March 2, 2017 01:30 IST

बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या भागातील नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत

ओझर : जुन्नर तालुक्यातील शिरोली बुद्रुक येथील तळवस्ती परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे या भागातील नागरिक प्रचंड दहशतीखाली आहेत. कधी दिवसाढवळ्या तर कधी रात्री अपरात्री बिबट्याचे दर्शन होत आहे. बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरीवर्ग अक्षरश: रडकुंडीला आला आहे. शेतीमालाच्या ढासाळलेल्या बाजारभावमुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेती पीक त्यांच्यासाठी जीव की प्राण बनले आहे. आर्थिक संकटात असलेल्या शेतकरीवर्गाला आर्थिक आधार असलेल्या उन्हाळा हंगामातील शेतीपिके जगविताना दमछाक झाली आहे. उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यामुळे शेतीपिकांना पाणी देताना शेतकरीवर्गाला विजेच्या भारनियमनाचे गणित सांभाळून कसरत करावी लागत आहे. दिवसा कृषीपंपांना वीजपुरवठा उपलब्ध नसल्यावर रात्री वीज उपलब्ध असताना शेतीपिकांना पाणी द्यावे लागत आहे.शेतकरीवर्ग जीव धोक्यात घालून शेती पिकांना पाणी भरत आहे. बिबट्या मोठ्या उसामध्ये लपन करत आहे. परंतु, ऊसतोड सुरू असल्यामुळे ज्या उसामधे बिबट्याचे वास्तव्य आहे; तो ऊस तुटला की बिबट्या दुसरीकडे पलायन करत आहेत. त्यामुळे बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. शेती पिकांच्या आजुबाजूला बिबट्याच्या पायाचे मोठे मोठे ठसे पाहून लोकांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. या भागात वनविभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी येथील शेतकरीवगार्तून होत आहे. (वार्ताहर)