कोपरगाव (अहमदनगर) : ऊसदराबाबत इशारे देऊन आंदोलन पुढे ढकलण्याचे काम सध्या खा़ राजू शेट्टी करीत आहेत़ मंत्रिमंडळाच्या विस्ताराकडे त्यांचा डोळा आह़े उसापेक्षा त्यांना मंत्रिपदाची काळजी असल्याचा आरोप शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी येथे केला़ खा. शेट्टी सध्या सरकारला ‘ब्लॅकमेल’ करीत असल्याचाही घणाघात त्यांनी ऊसदर हक्क संघर्ष यात्रेनिमित्त येथे आल्यानंतर केला. (प्रतिनिधी)