शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
3
मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
4
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
5
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
6
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
7
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
8
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
9
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
10
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
11
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
12
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
14
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
15
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
16
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार
17
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
18
देशाची आर्थिक राजधानी, डिजिटल शर्यतीत मागे; मुंबईत फायबर टाकणे सर्वात महाग
19
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
20
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले

कोल्हापुरात शेटजींना घरी बसवले

By admin | Updated: October 24, 2014 04:04 IST

जिल्ह्याचे राजकारण करावयाचे झाल्यास साखर कारखाना असल्यास सहज शक्य असल्याचे सूत्र आता बदलले

प्रकाश पाटील, कोपार्डे (जि़ कोल्हापूर)जिल्ह्याचे राजकारण करावयाचे झाल्यास साखर कारखाना असल्यास सहज शक्य असल्याचे सूत्र आता बदलले असून, सहकारातून राजकारणापेक्षा समाजकारणातून राजकारण हा नवीन ट्रेंड येत असल्याचे चित्र विधानसभा निवडणुकीत दिसले. कोल्हापूर जिल्ह्यातील १० मतदारसंघांत ७ कारखानदार उमेदवार निवडणूक रिंगणात होते. त्यापैकी आमदार चंद्रदीप नरके वगळता सर्व कारखानदारांना मतदारांनी नाकारले. जिल्ह्यात १९६०नंतर सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे, दादासाहेब पाटील (कौलवकर), डी.सी. नरके, रत्नाप्पाण्णा कुंभार या दिग्गजांनी सहकारातून समृद्धीचा मंत्र ग्रामीण जनतेला दिला. या सहकार महर्षीमधील कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते रत्नाप्पाण्णा कुंभार वगळता सर्वच सहकार महर्षींनी राजकारणापेक्षा आपल्या संस्थांतून समाजकारण करणेच पसंद केले. या सहकार महर्षींची दुसरी पिढीही काही प्रमाणात राजकारणापासून अलिप्त राहिली व आपले साखर कारखाने व ऊस उत्पादक यांचे हित सांभाळण्यात धन्यता मानू लागली.मात्र, १९९०नंतर हा ट्रेंड बदलला व याच सहकार महर्षींची तिसरी पिढी सहकारी साखर कारखान्यात राजकीय वारसा चालवू लागली. यात सर्व जण तरुण व महत्त्वाकांक्षी होते. आपल्या हातात असणाऱ्या साखर कारखान्याच्या माध्यमातून होणारा जनसंपर्क व मोठा राजकीय गट यांचा वापर करून राजकारण करता येऊ शकते, हे ओळखत ‘वारणा समूहा’चे विनय कोरे, ‘कुंभी’चे अध्यक्ष आम. चंद्रदीप नरके, डी.वाय. पाटील कारखान्याचे अध्यक्ष सतेज पाटील, ‘जवाहर’चे प्रकाश आवाडे, ‘बिद्री’चे के.पी. पाटील, ‘शरद’ नरंदेचे राजेंद्र पाटील (यड्रावकर), ‘दत्त’ शिरोळचे सा.रे. पाटील, ‘राजाराम’ बावड्याचे महाडिक यांनी गेल्या १० वर्षांत जिल्ह्याच्या राजकारणात अधिराज्य गाजविले आहे. ऊसदराबाबत ज्या ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांच्या जिवावर या कारखानदारांचे राजकारण सुरू आहे त्या कारखानदारांनी शेतकऱ्यांना मात्र वाऱ्यावर सोडले. हंगाम सुरू होण्यापूर्वी शेतकऱ्यांना ऊसदराबाबत संघर्ष करीत डोकी-फोडून घ्यावी लागत होती.हंगाम २०१३-१४चा विचार केल्यास २२५० व केंद्राने दिल्यानंतर ४०० असा २६५०चा फॉर्म्युला ठरला होता. मात्र, पॅकेज मिळूनही कारखानदारांनी घूमजाव केले व एफआरपीच देणार असल्याचा पवित्रा घेतला. यामुळे हंगाम २०१३-१४मध्ये शेतकऱ्यांना किमान ३०० कोटींचा फटका बसला. यामुळे साखर कारखानदारांबाबत कमालीचा असंतोष निर्माण झाला. याचाच परिणाम १० विधानसभा मतदारसंघ असणाऱ्या ७ कारखानदारांपैकी ६ उमेदवारांना पराभूत करीत तुम्ही पहिले तुमचे कारखाने सांभाळा, असा जणू संदेश दिला आहे.