शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान सीजफायरसंदर्भात बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मोहम्मद युनूस? 
2
उज्जैनला देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या खासगी वाहनाला अपघात; तीन ठार
3
परराष्ट्रमंत्र्यांना 'सुअर' म्हटल्यानं इराणचा तीळपापड, मेजर गौरव आर्य यांची भारताकडे तक्रार
4
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
5
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
6
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
7
India Pak Ceasefire नंतर सलमानने सोशल मीडियावरुन पोस्ट हटवली, असं काय लिहिलं होतं?
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
10
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
11
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
12
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
13
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
14
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
15
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
16
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
17
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
18
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
19
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
20
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत

शाहीर साबळे यांचे निधन

By admin | Updated: March 20, 2015 18:49 IST

'गर्जा महाराष्ट्र माझा' हे गीत महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहोचवणारे शाहीर साबळे यांचे शुक्रवारी मुंबईतील राहत्या घरी निधन झाले.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. २० - ' जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा ' हे गीत महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोहोचवणारे  कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. उद्या सकाळी  त्यांचा  देह अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत साबळे यांचे मोठे योगदान होते. शाहीर साबळे हे केवळ मनोरंजनातून प्रबोधन करणारे शाहीर नव्हते तर उत्तम कवी-संगीतकार, अभिनेते- दिग्दर्शक, कुशल ढोलकीवादक, उत्कृष्ट व्यवस्थापक व संघटक आणि उच्च प्रतीचे गायकही होते. प्रख्यात दिग्दर्शक केदार शिंदे हा त्यांचा नातू आहे. साबळे यांच्या निधनामुळे संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्षीदार असलेली एक धडाडती 'तोफ' शांत झाली आहे.
 
शाहिर साबळे यांचा जीवन परिचय -
शाहीर साबळे यांचा जन्म १९२३ साली  सातारा जिल्ह्यातल्या, वाई तालुक्यातील पसरणी गावात झाला. जात्यावर ओव्या गाणारी आई आणि भजनं गाणारे वारकरी वडील यांच्याकडून त्यांना गायनाचे बाळकडू मिळाले. सुरूवातील जन्मगावी शिक्षण घेतल्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते अमळनेरला त्यांच्या मामांकडे गेले. तेथे त्यांना साने गुरूजींचा सहवास लाभला आणि त्यांच्यावर राष्ट्रीयत्व आणि निर्व्याज देशभक्तीचे संस्कार झाले. देशाच्या स्वातंत्र्यचळवळीत जनजागृती करण्यासाठी गुरुजींबरोबर ते दौरे करू  लागले.  राजकीय व सामाजिक अपप्रवृत्तींवर प्रहार करण्यासाठी शाहिरी माध्यमाचा उपयोग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. १९४२ साली ते शाहीर शंकरराव निकम ह्यांच्या प्रभावाखाली आले आणि त्यांच्याकडूनच  त्यांनी शाहिरी कलेचे प्रत्यक्ष धडे घेतले. हैदराबाद मुक्तिसंग्रामातही त्यांनी प्रचाराचे रान उठवले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्यांनी ‘जातीयवाद की समाजवाद’ (१९४७) हा पहिला पोवाडा लिहिला. स्वतंत्र भारतात नव्याने सुरु झालेल्या राजऐकारणाचा संदर्भ ह्या पोवाड्याला होता. 'आधुनिक मानवाची कहाणी'  हा त्यांचा विशेष उल्लेखनीय पोवाडा.
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिजनांच्या प्रवेशासाठी साने गुरुजींनी केलेल्या उपोषणाला पाठिंबा देताना शाहिर साबळेंनी महाराष्ट्रभर प्रचार करुन अनुकूल वातावरण निर्माण केले. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवामुक्ती आंदोलन ह्यांतही जनजागृतीसाठी त्यांनी प्रभावी शाहिराची भूमिका बजावली. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा ‘हे गीत शाहिरांनी गायिले. ह्या गाण्याने त्यांना उदंड कीर्ती लाभली. महाराष्ट्र राज्यात मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी बाळासाहेब ठाकरे ह्यांच्यासह जनजागृतीसाठी दौरे केले; तसेच 'आंधळं दळतंय' हे मुक्तनाट्य लिहून रंगभूमीवर आणले.
‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कार्यकमाने त्यांच्या जीवनात एक मोठे यश आले. महाराष्ट्राच्या विविध भागांतील लोकांच्या कलांना एकत्र आणून त्यांचे सादरीकरण करण्याची कल्पना त्यामागे होती.  या कार्यकमातून लावणी, बाल्यानृत्य, कोळीनृत्य, गोंधळीनृत्य, मंगळागौर, वाघ्यामुरळी, वासुदेव, धनगर इत्यादींचे जिवंत दर्शन घडविण्यात आले.
शाहिर साबळे यांना अनेक मानसन्मान मिळाले. १९८४ साली त्यांना संगीत नाटक अकादेमीचा पुरस्कार जाहीर झाला तर १९८८ साली ते शाहीर अमर शेख पुरस्काराचे पहिले मानकरी ठरले. अखिल भारतीय शाहिरी परिषदेच्या अध्यक्षपदासोबतच (१९९०) अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवणारे ते एकमेव शाहीर होते. १९९८ साली त्यांना भारत सरकारतर्फे 'पद्मश्री' पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.