शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात अन्नसुरक्षेची छाया

By admin | Updated: August 25, 2015 02:19 IST

मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर आणि परभणी या चार जिल्ह्यांत राज्यात सर्वांत भीषण दुष्काळी परिस्थिती असूनही स्थलांतर झालेले नाही किंवा मोठ्या संख्येने मजुरीची

मुंबई : मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर आणि परभणी या चार जिल्ह्यांत राज्यात सर्वांत भीषण दुष्काळी परिस्थिती असूनही स्थलांतर झालेले नाही किंवा मोठ्या संख्येने मजुरीची मागणी केली जात नाही याचे कारण सर्व दुष्काळी जिल्ह्यांमध्ये अन्नसुरक्षा योजना लागू केली आहे. दुष्काळाच्या वणव्यात होरपळणाऱ्या लक्षावधींना अन्नसुरक्षेमुळे पोटाची चिंता भेडसावत नाही.राज्य सरकारने दुष्काळग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये अन्नसुरक्षेच्या धर्तीवर २ रुपये दराने गहू तर ३ रुपये दराने तांदूळ उपलब्ध करून दिले आहेत. बीडमध्ये १ लाख ७३ हजार, उस्मानाबादमध्ये १ लाख ६३ हजार, लातूरमध्ये १ लाख ११ हजार तर परभणीत १ लाख ६१ हजार लोकांना या योजनेमध्ये माणशी ५ किलो धान्य दिले जात आहे. दुष्काळाची तीव्रता वाढूनही लोकांचा स्थलांतर न होण्याचे किंवा नरेगावरील मजुरांची संख्या फारशी न वाढण्याचे अन्नसुरक्षेचे कवच हेच कारण असल्याचे अधिकारी मान्य करतात.राज्यात सध्या दुष्काळी भागात १९०१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, त्यापैकी १२९१ टँकर्स मराठवाड्यात सुरू आहेत. गतवर्षी याच दिवशी राज्यात १५२४ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. गतवर्षी मराठवाड्यात केवळ ७१८ टँकर्स सुरू होते. मराठवाड्यात ५० ते ६० कि.मी. अंतरावरून पाणी आणले जात आहे. अनेक धरणांमधील पाण्याने तळ गाठल्याने दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ५६२, उस्मानाबादेत १६४, लातूर ९८ एवढे टँकर सुरू आहेत.प्रत्येक तालुक्यात किमान एक चारा छावणी सुरू करण्याचे आदेश दिले असून, सध्या पंढरपूर, बार्शी, कुर्डूवाडी अथवा कर्नाटकातून चारा उपलब्ध करून दिला जात आहे. (विशेष प्रतिनिधी)महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर या कालावधीत ११३१.३ मि.मी. पाऊस होतो. यंदा त्याच्या केवळ ४३.९ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी ५५३ मि.मी. म्हणजे ६४.३ टक्के पाऊस झाला होता. राज्यात सर्वांत कमी १७.६ टक्के पाऊस सोलापूरमध्ये तर सर्वाधिक ७७.७ टक्के पाऊस नागपूर येथे झाला आहे.राज्यातील धरणांत सध्या केवळ ४८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, सर्वांत बिकट स्थिती मराठवाड्यातील धरणांची आहे. राज्यातील २५५४ प्रकल्पांमधील एकूण पाणीसाठ्याची क्षमता ३७ हजार ६४८ द.ल.घ.मी. असून त्यापैकी १८ हजार ०१९ द.ल.घ.मी. एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच दिवशी २३ हजार १९२ द.ल.घ.मी. पाणीसाठा शिल्लक होता. मराठवाड्यातील मोठ्या पाणीपुरवठा प्रकल्पांत ९ टक्के, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के, लघू प्रकल्पांत ५ टक्के असा एकूण फक्त ८ टक्केच पाणीसाठा आहे.