शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळात अन्नसुरक्षेची छाया

By admin | Updated: August 25, 2015 02:19 IST

मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर आणि परभणी या चार जिल्ह्यांत राज्यात सर्वांत भीषण दुष्काळी परिस्थिती असूनही स्थलांतर झालेले नाही किंवा मोठ्या संख्येने मजुरीची

मुंबई : मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद, लातूर आणि परभणी या चार जिल्ह्यांत राज्यात सर्वांत भीषण दुष्काळी परिस्थिती असूनही स्थलांतर झालेले नाही किंवा मोठ्या संख्येने मजुरीची मागणी केली जात नाही याचे कारण सर्व दुष्काळी जिल्ह्यांमध्ये अन्नसुरक्षा योजना लागू केली आहे. दुष्काळाच्या वणव्यात होरपळणाऱ्या लक्षावधींना अन्नसुरक्षेमुळे पोटाची चिंता भेडसावत नाही.राज्य सरकारने दुष्काळग्रस्त १४ जिल्ह्यांमध्ये अन्नसुरक्षेच्या धर्तीवर २ रुपये दराने गहू तर ३ रुपये दराने तांदूळ उपलब्ध करून दिले आहेत. बीडमध्ये १ लाख ७३ हजार, उस्मानाबादमध्ये १ लाख ६३ हजार, लातूरमध्ये १ लाख ११ हजार तर परभणीत १ लाख ६१ हजार लोकांना या योजनेमध्ये माणशी ५ किलो धान्य दिले जात आहे. दुष्काळाची तीव्रता वाढूनही लोकांचा स्थलांतर न होण्याचे किंवा नरेगावरील मजुरांची संख्या फारशी न वाढण्याचे अन्नसुरक्षेचे कवच हेच कारण असल्याचे अधिकारी मान्य करतात.राज्यात सध्या दुष्काळी भागात १९०१ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून, त्यापैकी १२९१ टँकर्स मराठवाड्यात सुरू आहेत. गतवर्षी याच दिवशी राज्यात १५२४ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जात होता. गतवर्षी मराठवाड्यात केवळ ७१८ टँकर्स सुरू होते. मराठवाड्यात ५० ते ६० कि.मी. अंतरावरून पाणी आणले जात आहे. अनेक धरणांमधील पाण्याने तळ गाठल्याने दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. बीड जिल्ह्यात सर्वाधिक ५६२, उस्मानाबादेत १६४, लातूर ९८ एवढे टँकर सुरू आहेत.प्रत्येक तालुक्यात किमान एक चारा छावणी सुरू करण्याचे आदेश दिले असून, सध्या पंढरपूर, बार्शी, कुर्डूवाडी अथवा कर्नाटकातून चारा उपलब्ध करून दिला जात आहे. (विशेष प्रतिनिधी)महाराष्ट्रात जून ते सप्टेंबर या कालावधीत ११३१.३ मि.मी. पाऊस होतो. यंदा त्याच्या केवळ ४३.९ टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी ५५३ मि.मी. म्हणजे ६४.३ टक्के पाऊस झाला होता. राज्यात सर्वांत कमी १७.६ टक्के पाऊस सोलापूरमध्ये तर सर्वाधिक ७७.७ टक्के पाऊस नागपूर येथे झाला आहे.राज्यातील धरणांत सध्या केवळ ४८ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, सर्वांत बिकट स्थिती मराठवाड्यातील धरणांची आहे. राज्यातील २५५४ प्रकल्पांमधील एकूण पाणीसाठ्याची क्षमता ३७ हजार ६४८ द.ल.घ.मी. असून त्यापैकी १८ हजार ०१९ द.ल.घ.मी. एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी याच दिवशी २३ हजार १९२ द.ल.घ.मी. पाणीसाठा शिल्लक होता. मराठवाड्यातील मोठ्या पाणीपुरवठा प्रकल्पांत ९ टक्के, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के, लघू प्रकल्पांत ५ टक्के असा एकूण फक्त ८ टक्केच पाणीसाठा आहे.