शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

श्ॉडो कॅबिनेट वॉच ठेवेल !

By admin | Updated: October 29, 2014 01:46 IST

सिझरची पत्नी वादातीत असावी, हे तत्त्व घटनात्मक दृष्टीने वरच्या पदावर बसणा:यांना लागू पडते आणि तसे झाले नाही तर लोकांनी राज्यात ‘श्ॉडो कॅबिनेट’ बनवून भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या खात्यावर वॉच ठेवावा.

अतुल कुलकर्णी -मुंबई
सिझरची पत्नी वादातीत असावी, हे तत्त्व घटनात्मक दृष्टीने वरच्या पदावर बसणा:यांना लागू पडते आणि तसे झाले नाही तर लोकांनी राज्यात ‘श्ॉडो कॅबिनेट’ बनवून भ्रष्टाचारी मंत्र्यांच्या खात्यावर वॉच ठेवावा. या कामी आपण पुढाकार घेऊ, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी दिली आहे. 
‘हवे आहेत भ्रष्टाचाराचे आरोप नसणारे मंत्री!’ असे वृत्त मंगळवारी ‘लोकमत’ने दिले होते. त्याची चर्चा मंगळवारी दिवसभर विधानभवन परिसरातही होती. देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार, याची चर्चा सुरू झाली़ त्यात ‘लोकमत’च्या बातमीचा संदर्भ कायम निघत होता. गेली काही वर्षे ज्यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप झाले किंवा ज्यांची कारकीर्द कायम वादग्रस्त ठरली, अशांचे चेहरे काळवंडलेले झालेले दिसले, तर पक्षांतर करून भाजपाच्या तिकिटावर निवडून आलेल्यांच्या मनात मंत्रिमंडळातील समावेशावरून धाकधूक सुरू झाली आहे.
मंत्री होण्याची इच्छा मनात ठेवून विधान भवनात फडणवीस, राजीव प्रसाद रुडी, प्रकाश जावडेकर यांच्या मागेपुढे करणा:यांच्या चेह:यावर देखील ही भीती स्पष्ट दिसत होती. राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्यांना मंत्रिमंडळात घ्यायचे की नाही यावरून भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू झाली आहे.
त्या पाश्र्वभूमीवर विश्वंभर चौधरी यांना विचारले असता, सामाजिक कार्यकत्र्याना आपलेसे वाटणारा मुख्यमंत्री अशी फडणवीस यांची प्रतिमा आहे. ती जपण्याची मोठी जबाबदारी त्यांच्यावरच असल्याचे त्यांनी सांगितले. 
निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीतील अनेक भ्रष्ट नेत्यांना पवित्र करुन घेण्याचे काम भाजपाने केले, मात्र जनतेने त्यांना धडा शिकवला याची चाड राखून निवड केली जावी. मावळत्या सरकारने कायम गरीब, धरणग्रस्त यांची नावे घेत स्वत:ची तुंबडी भरण्यापलिकडे काही केले नाही. ती परंपरा खंडीत करणारे मंत्री निवडून चांगला संदेश द्यावा, असे ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्या सुनीती सु. र. म्हणाल्या.
 
च्गैरव्यवहाराचे आरोप झालेल्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार की नाही, याबाबत उत्सुकता आहे. सामाजिक कार्यकत्र्याना आपलासा वाटणारा मुख्यमंत्री अशी फडणवीसांची प्रतिमा आहे. ती जपण्याची जबाबदारी त्यांच्यावर 
आहे, असे मत चौधरी यांनी 
व्यक्त केले. 
 
च्फडणवीस हे अभ्यासू, प्रामाणिक आणि रोखठोक भूमिका घेणारे म्हणून आम्ही त्यांना ओळखतो़ मात्र त्यांनी मंत्री निवडताना राज्याचे हित जपले पाहिजे. मावळत्या सरकारची भ्रष्टाचाराची परंपरा मोडून चांगला संदेश द्यावा, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ सामाजिक कार्यकत्र्या सुनिती सु. र. यांनी दिली.