शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
'डोनाल्ड ट्रम्प यांचा कॉल अन् PM मोदींनी ५ तासात युद्ध थांबवले', राहुल गांधींची बोचरी टीका
3
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
4
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
5
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
6
ग्रीन टी की ब्लॅक टी... वजन कमी करण्यापासून ते हृदयाच्या आरोग्यासाठी, जास्त फायदेशीर काय?
7
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
8
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
9
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
10
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
11
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
12
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
13
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
14
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
15
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
16
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
17
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
18
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
19
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
20
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!

सेवाग्राम राष्ट्रीय स्मारक प्रकल्प तातडीने पूर्णत्वास न्यावा

By admin | Updated: July 15, 2014 03:04 IST

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेले सेवाग्राम हे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी काँग्रेसचे राज्यसभा सदस्य विजय दर्डा १० वर्षांपासून प्रयत्न करत आहेत

नागपूर : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेले सेवाग्राम हे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी काँग्रेसचे राज्यसभा सदस्य विजय दर्डा १० वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. महात्मा गांधी यांच्या वर्धा जिल्ह्यातील आगमनाला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर सेवाग्राम आश्रमासह वर्धा जिल्ह्याच्या विकासासाठी राज्य सरकारने नागपूर ते वर्धा पर्यटन सर्किट तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ४९० कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. हे स्वागतार्ह पाऊल असून, यासाठी मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतानाच हे काम तातडीने हाती घ्यावे आणि युद्धपातळीवर ते पूर्णत्वास न्यावे, अशी अपेक्षा खा. दर्डा यांनी व्यक्त केली आहे. सेवाग्राम हे राष्ट्रीय स्मारक व्हावे, यासाठी खा. दर्डा हे १० वर्षांपासून पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने मागणी करीत आहेत. दर्डा यांनी तत्कालीन केंद्रीय पर्यटन मंत्री अंबिका सोनी व चिरंजीवी यांनाही पत्र लिहिले होते. अंबिका सोनी यांनी दर्डा यांच्या प्रश्नावर राज्यसभेत उत्तर देताना हा राज्य सरकारचा विषय असून, राज्य सरकारकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठवीत असल्याची माहिती दिली होती. सेवाग्राम हे देशाच्या स्वातंत्र्याचे प्रतीक आहे. स्वातंत्र्याच्या लढ्याची प्रेरणा या क्रांतिभूमीने दिली. पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, सरहद्द गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, आचार्य कृपलानी, जमनालाल बजाज आदी थोर पुरुष सातत्याने सेवाग्राममध्ये यायचे व गांधींचे मार्गदर्शन घ्यायचे. गांधीजींनीही अशी जागा निवडली होती की जी देशाच्या मध्यभागी आहे. स्वर्गीय इंदिरा गांधी यांनी सेवाग्राम आश्रमाशी असलेले ऋणानुबंध आयुष्यभर जपले. स्वर्गीय राजीव गांधी यांनीही हा वसा पुढे नेला. इंदिरा गांधी यांनी लक्ष घालून सेवाग्रामच्या विकासासाठी ९० कोटी रुपये मंजूर केले होते. मात्र, स्थानिक विरोधामुळे त्याची अंमलबजावणी होऊ शकली नाही. अलीकडेच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चा करताना खा. दर्डा यांनी राज्यसभेत अत्यंत महत्त्वपूर्ण अशा १७ सूचना केल्या. यात सेवाग्रामला राष्ट्रीय स्मारक करून त्याचा विकास व्हावा, याही सूचनेचा अंतर्भाव होता. यासंदर्भात दर्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही पत्र लिहिले. जगातील इतर राष्ट्रांमध्ये त्या त्या देशातील राष्ट्रपुरुषांचे स्मारक असते तशा दर्जाचे स्मारक सेवाग्राम येथे व्हावे, अशी खा. दर्डा यांची इच्छा आहे. २० वर्षांपूर्वी अमेरिकन संशोधक काही कलावंतांना घेऊन सेवाग्रामला आले होते. हा वारसा आपल्या देशात जतन करण्यासाठी त्यावेळी त्यांनी प्रयत्न केले. जगप्रसिद्ध ‘गांधी’ चित्रपटाचे रिचर्ड अ‍ॅटनबरो येथे दर्शनासाठी नेहमी यायचे. पण सेवाग्रामकडे कायम दुर्लक्ष करण्यात आले. हे राष्ट्रीय स्मारक जपले पाहिजे, अशी कळकळीची विनंती खा. दर्डा यांनी सरकारकडे केली आहे. (प्रतिनिधी)