शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

पेणमध्ये सात कुटुंबे वाळीत

By admin | Updated: December 1, 2015 01:01 IST

पेण तालुक्यात गेल्या आठ वर्षांपूर्वी विष्णू म्हात्रे यांच्या घर बांधल्याच्या कारणास्तव संपूर्ण कुटुंबास वाळीत टाकण्याचा प्रकार घडला आहे, तसेच शिंगवटणमधील सुनिता पाटील

अलिबाग : पेण तालुक्यात गेल्या आठ वर्षांपूर्वी विष्णू म्हात्रे यांच्या घर बांधल्याच्या कारणास्तव संपूर्ण कुटुंबास वाळीत टाकण्याचा प्रकार घडला आहे, तसेच शिंगवटणमधील सुनिता पाटील, तसेच इतरांनाही क्षुल्लक कारणास्तव वाळीत टाकण्यात आले आहे. याबाबत गावकीच्या पंच, तसेच इतर ६ जणांविरुद्ध रायगड पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पेण तालुक्यातील बेनेघाट गावातील ग्रामस्थ विष्णू म्हात्रे यानी शिंगणवट गावात घर बांधले यावरून चिडून त्याांना ८ वर्षांपूर्वी वाळीत टाकले. त्यानंतर शिंगणवटमधील सुनिता पाटील या विष्णू म्हात्रेंशी बोलल्या म्हणून त्यांना पाच वर्षांपूर्वी वाळीत टाकले. ममता पाटील (११) ही मुलगी सुनिता यांच्या घरी दूध देण्यासाठी गेली, म्हणून तिच्या सर्व कुटुंबास वाळीत टाकले. गावातीलच संध्या मोहिते याही पाटील कुटुंबाशी बोलल्या, म्हणून त्यांचा मुलगा रूपेश याचे केशकर्तनाचे दुकान दोन वर्षांपूर्वी बंद करण्यात आले . कोणी केस कापण्याकरिता दुकानात गेल्यास त्यासही वाळीत टाकले जाते. गावातील पंकज पाटील याने वाळीत टाकलेल्या ग्रामस्थांशी संबंध ठेवू नये, म्हणून गेल्या चार महिन्यांपूर्वी पोलीस पाटील सचिन कोठावळे यांनी पंकज, त्यांचे वडील व आई यांना जबर मारहाण केली, तसेच वाळीत टाकले. चंद्रकांत पाटील, मारुती पाटील, रूपेश मोहिते यांनाही वाळीतग्रस्तांशी बोलल्याच्या कारणांवरून वाळीत टाकण्यात आले, तसेच रूपेशला मारहाणही करण्यात आली. सातत्याने मानसिक त्रास दिल्याप्रकरणी शिंगणवट गावकीचे पंच अविनाश कोठावळे, स्वप्निल कोठावळे, कमलाकर पाटील, सतीश पाटील, गोपीनाथ म्हात्रे, परेश कोठावळे आणि अनंत कोठावळे या सात जणांविरुद्ध वाळीतग्रस्त बाळकृष्ण पाटील, शंकर पाटील, मनीराम पाटील, सुनिता पाटील, संध्या मोहिते, मारुती पाटील, चंद्रकांत पाटील व भागुबाई पाटील या सात कुटुंबे प्रमुखांनी शुक्रवारी रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले व रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांच्याकडे लेखी संयुक्त तक्रारी दाखल केल्या आहेत. गावकीचे पंच व पोलीस पाटील सचिन कोठावळे हे गावात दहशत माजवत आहेत. या सर्व प्रकाराबाबत वारंवार वडखळ पोलिसांत तक्रार करूनही कारवाई केली जात नाही. या सर्व प्रकारांबाबत स्वतंत्र गुन्हे दाखल करावेत. जर तत्काळ कारवाई झाली नाही, तर आंदोलन करण्यावाचून पर्याय राहणार नाही, असा निर्वाणीचा इशारा या वाळीतग्रस्त कुटुंबांनी लेखी निवेदनात दिला आहे. (विशेष प्रतिनिधी)पेण तहसीलदार घेणार समन्वय बैठकरायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले व रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक या उभयतांना भेटून लेखी तक्रार निवेदन दिल्यावर, या अधिकाऱ्यांनी वाळीतग्रस्तांबरोबर चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणी शिंगणवट गावातील या उभय गटांची समन्वय बैठक आयोजित करण्यात येत असून, त्यातून सामोपचाराने हे सामाजिक बहिष्काराचे प्रकरण मिटू शकेल, असे रायगडचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक राजा पवार म्हणाले.