शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
2
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
3
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
4
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
5
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
6
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
7
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
8
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
9
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
10
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
11
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
12
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
13
International Yoga Day: देशभरात आज साकारणार विश्वविक्रमी योग!
14
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
15
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
16
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
17
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
18
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
19
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
20
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना

पेणमध्ये सात कुटुंबे वाळीत

By admin | Updated: December 1, 2015 01:01 IST

पेण तालुक्यात गेल्या आठ वर्षांपूर्वी विष्णू म्हात्रे यांच्या घर बांधल्याच्या कारणास्तव संपूर्ण कुटुंबास वाळीत टाकण्याचा प्रकार घडला आहे, तसेच शिंगवटणमधील सुनिता पाटील

अलिबाग : पेण तालुक्यात गेल्या आठ वर्षांपूर्वी विष्णू म्हात्रे यांच्या घर बांधल्याच्या कारणास्तव संपूर्ण कुटुंबास वाळीत टाकण्याचा प्रकार घडला आहे, तसेच शिंगवटणमधील सुनिता पाटील, तसेच इतरांनाही क्षुल्लक कारणास्तव वाळीत टाकण्यात आले आहे. याबाबत गावकीच्या पंच, तसेच इतर ६ जणांविरुद्ध रायगड पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. पेण तालुक्यातील बेनेघाट गावातील ग्रामस्थ विष्णू म्हात्रे यानी शिंगणवट गावात घर बांधले यावरून चिडून त्याांना ८ वर्षांपूर्वी वाळीत टाकले. त्यानंतर शिंगणवटमधील सुनिता पाटील या विष्णू म्हात्रेंशी बोलल्या म्हणून त्यांना पाच वर्षांपूर्वी वाळीत टाकले. ममता पाटील (११) ही मुलगी सुनिता यांच्या घरी दूध देण्यासाठी गेली, म्हणून तिच्या सर्व कुटुंबास वाळीत टाकले. गावातीलच संध्या मोहिते याही पाटील कुटुंबाशी बोलल्या, म्हणून त्यांचा मुलगा रूपेश याचे केशकर्तनाचे दुकान दोन वर्षांपूर्वी बंद करण्यात आले . कोणी केस कापण्याकरिता दुकानात गेल्यास त्यासही वाळीत टाकले जाते. गावातील पंकज पाटील याने वाळीत टाकलेल्या ग्रामस्थांशी संबंध ठेवू नये, म्हणून गेल्या चार महिन्यांपूर्वी पोलीस पाटील सचिन कोठावळे यांनी पंकज, त्यांचे वडील व आई यांना जबर मारहाण केली, तसेच वाळीत टाकले. चंद्रकांत पाटील, मारुती पाटील, रूपेश मोहिते यांनाही वाळीतग्रस्तांशी बोलल्याच्या कारणांवरून वाळीत टाकण्यात आले, तसेच रूपेशला मारहाणही करण्यात आली. सातत्याने मानसिक त्रास दिल्याप्रकरणी शिंगणवट गावकीचे पंच अविनाश कोठावळे, स्वप्निल कोठावळे, कमलाकर पाटील, सतीश पाटील, गोपीनाथ म्हात्रे, परेश कोठावळे आणि अनंत कोठावळे या सात जणांविरुद्ध वाळीतग्रस्त बाळकृष्ण पाटील, शंकर पाटील, मनीराम पाटील, सुनिता पाटील, संध्या मोहिते, मारुती पाटील, चंद्रकांत पाटील व भागुबाई पाटील या सात कुटुंबे प्रमुखांनी शुक्रवारी रायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले व रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक यांच्याकडे लेखी संयुक्त तक्रारी दाखल केल्या आहेत. गावकीचे पंच व पोलीस पाटील सचिन कोठावळे हे गावात दहशत माजवत आहेत. या सर्व प्रकाराबाबत वारंवार वडखळ पोलिसांत तक्रार करूनही कारवाई केली जात नाही. या सर्व प्रकारांबाबत स्वतंत्र गुन्हे दाखल करावेत. जर तत्काळ कारवाई झाली नाही, तर आंदोलन करण्यावाचून पर्याय राहणार नाही, असा निर्वाणीचा इशारा या वाळीतग्रस्त कुटुंबांनी लेखी निवेदनात दिला आहे. (विशेष प्रतिनिधी)पेण तहसीलदार घेणार समन्वय बैठकरायगडच्या जिल्हाधिकारी शीतल तेली-उगले व रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मो.सुवेझ हक या उभयतांना भेटून लेखी तक्रार निवेदन दिल्यावर, या अधिकाऱ्यांनी वाळीतग्रस्तांबरोबर चर्चा करून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले आहे. या प्रकरणी शिंगणवट गावातील या उभय गटांची समन्वय बैठक आयोजित करण्यात येत असून, त्यातून सामोपचाराने हे सामाजिक बहिष्काराचे प्रकरण मिटू शकेल, असे रायगडचे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक राजा पवार म्हणाले.