शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

चटणी-भाकरीच्या रूपाने नेहरूंची सेवा

By admin | Updated: November 14, 2015 03:46 IST

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अहमदनगर किल्ल्यातील साडेतीन वर्षांच्या बंदिवासात काही मोजक्या स्थानिक नेत्यांशी संबंध आला

योगेश गुंड,  अहमदनगरभारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अहमदनगर किल्ल्यातील साडेतीन वर्षांच्या बंदिवासात काही मोजक्या स्थानिक नेत्यांशी संबंध आला. त्यातील एक राजाराम साठे (पाटील). यजमानामार्फत नेहरूंना राजाराम पाटलांचा डबा किल्ल्यात जात होता. चटणी-भाकरीच्या रूपाने नगर तालुक्यातील नारायणडोहोसारख्या खेड्यातील स्वातंत्र्यसैनिकाला त्यांची सेवा करण्याचे भाग्य मिळाले. नारायणडोहो येथील राजाराम मोराजी साठे विनोबा भावे यांच्या भूदान आंदोलनात, तसेच स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय होते. मोतीलाल फिरोदिया कुटुंबाकडे नेहरूंचे व इतर राष्ट्रीय नेत्यांचे यजमानपद होते. नेहरू १९४२च्या स्वातंत्र्यलढ्यात १० आॅगस्ट ते २८ मार्च १९४५ या काळात भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. या काळात नेहरू जसे नगरच्या घट्ट ‘बासुंदी’च्या प्रेमात पडले, तसेच राजाराम पाटलांच्या चटणी-भाकरीच्याही. यजमान यांच्यामार्फत नेहरूंना डबा देण्यासाठी राजाराम पाटील नारायण डोहो ते नगर हे १५ किलोमीटरचे अंतर पायी जात. त्यांच्या घरच्या चटणी-भाकरीच्या चवीने नेहरूंना मोठे समाधान मिळे. १९७२ला इंदिरा गांधी यांची भेट घेऊन त्यांनी नेहरूंच्या आठवणींचा उजाळा दिला. इंदिराजींनाही राजाराम पाटलांबद्दल आदर व आपुलकी वाटली.