शहरं
Join us  
Trending Stories
1
“CM फडणवीसांना टोमणा नाही, मित्र म्हणून सल्ला देतो की...”; नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?
2
पाकिस्तानात लष्करी सराव की पुन्हा सतावतेय भारताकडून एअरस्ट्राइक होण्याची भीती? घेतला मोठा निर्णय 
3
कर्नाटक काँग्रेसचा अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर; उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेण्यास मुख्यमंत्र्यांचा नकार
4
घटस्फोटानंतर पत्नीला नाही द्यायचा संपत्तीचा एकही हिस्सा; श्रीमंत लोक काय वापरतायेत 'फंडा'? वाचा
5
पुढील आठवड्यांत IPO चा धमाका: तब्बल १० कंपन्या बाजारात उतरणार, गुंतवणुकीची सुवर्णसंधी!
6
“शेतकऱ्यांनो विसरा हमी… खेळा रम्मी…”; कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंवर विरोधकांची सडकून टीका
7
बांगलादेशच्या आयातबंदीचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना फटका; पावसामुळे कमी भावांत विकण्याची वेळ 
8
ISIS स्टाईलने हिंदू मुलींचे ब्रेनवॉश; लष्कर-ए-तैयबाच्या निधीतून सुरू होते आग्रा धर्मांतर नेटवर्क
9
धक्कादायक: शिक्षकांना नियमित केले, परंतु आदेश तात्पुरते राहिले, तासिका व रोजंदारीवरच दिल्या नियुक्त्या
10
वनविभागात ‘आयएफएस’ पदांचा खेळ; आता ८ पीसीसीएफ, वनसंरक्षक पदाला कात्री आणि बदल्यांमध्ये सोय
11
"राणे कुटुंबाने खून केलेले लोक हिंदूंच होते, नितेश राणेंनी वडिलांना..."; मनसे नेत्यांचे खळबळजनक आरोप
12
“बोले तैसा चाले आहे की वाकडी यांची पाऊले ते कळेल”; निवृत्तीवरून ठाकरेंचा RSS-मोदींना टोला
13
पगारातून कापला गेलेला TDS आता सहज परत मिळणार, सरकार बदलणार नियम, कधीपासून लागू?
14
'डॉन ३' मधून विक्रांत मेस्सी बाहेर, 'बिग बॉस' विजेता अभिनेता बनणार व्हिलेन? नवी अपडेट समोर
15
सावधान, पावसाळ्यात सर्पदंशाचा धोका अधिक! कशी घ्याल स्वतःची काळजी?
16
'सन ऑफ सरदार २' पोस्टपोन, 'या' सिनेमाला घाबरुन बदलली रिलीज डेट? नवीन तारीख समोर
17
अरेच्चा...! पत्नी मागेच राहिली, केंद्रीय मंत्र्याने १ किमीवरून ताफा पुन्हा मागे वळवला; काय घडलं?
18
"कमी जागा मिळो अथवा जास्त, मुख्यमंत्री नितीश कुमारच होणार", जदयूचा भाजपला स्पष्ट मेसेज, एनडीएमध्ये पेच
19
गिरगाव चौपाटीवर मासेमारीस मज्जाव? बंदर बंद झाल्याने बोटी हटविण्याचे मच्छीमारांना आदेश
20
पाकिस्तान समर्थक जमात ए इस्लामीने बांगलादेशात दाखवली ताकद; देशात इस्लामिक राजवटीचे संकेत?

चटणी-भाकरीच्या रूपाने नेहरूंची सेवा

By admin | Updated: November 14, 2015 03:46 IST

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अहमदनगर किल्ल्यातील साडेतीन वर्षांच्या बंदिवासात काही मोजक्या स्थानिक नेत्यांशी संबंध आला

योगेश गुंड,  अहमदनगरभारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अहमदनगर किल्ल्यातील साडेतीन वर्षांच्या बंदिवासात काही मोजक्या स्थानिक नेत्यांशी संबंध आला. त्यातील एक राजाराम साठे (पाटील). यजमानामार्फत नेहरूंना राजाराम पाटलांचा डबा किल्ल्यात जात होता. चटणी-भाकरीच्या रूपाने नगर तालुक्यातील नारायणडोहोसारख्या खेड्यातील स्वातंत्र्यसैनिकाला त्यांची सेवा करण्याचे भाग्य मिळाले. नारायणडोहो येथील राजाराम मोराजी साठे विनोबा भावे यांच्या भूदान आंदोलनात, तसेच स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय होते. मोतीलाल फिरोदिया कुटुंबाकडे नेहरूंचे व इतर राष्ट्रीय नेत्यांचे यजमानपद होते. नेहरू १९४२च्या स्वातंत्र्यलढ्यात १० आॅगस्ट ते २८ मार्च १९४५ या काळात भुईकोट किल्ल्यात बंदिवासात होते. या काळात नेहरू जसे नगरच्या घट्ट ‘बासुंदी’च्या प्रेमात पडले, तसेच राजाराम पाटलांच्या चटणी-भाकरीच्याही. यजमान यांच्यामार्फत नेहरूंना डबा देण्यासाठी राजाराम पाटील नारायण डोहो ते नगर हे १५ किलोमीटरचे अंतर पायी जात. त्यांच्या घरच्या चटणी-भाकरीच्या चवीने नेहरूंना मोठे समाधान मिळे. १९७२ला इंदिरा गांधी यांची भेट घेऊन त्यांनी नेहरूंच्या आठवणींचा उजाळा दिला. इंदिराजींनाही राजाराम पाटलांबद्दल आदर व आपुलकी वाटली.