शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
7
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
8
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
9
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
10
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
11
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
12
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
13
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
14
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
15
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
16
Operation Sindoor Live Updates: देशाच्या विविध भागांत मॉकड्रिल आणि ब्लॅकआऊट
17
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
18
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
19
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
20
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!

मंत्रिपदासाठी सेनेची पाच नावे चर्चेत

By admin | Updated: November 16, 2015 03:35 IST

मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आलेला असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सायंकाळी शिवसेना नेत्यांची बैठक घेत चर्चा केली.

मुंबई : मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चांना उधाण आलेला असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी सायंकाळी शिवसेना नेत्यांची बैठक घेत चर्चा केली. महापौर बंगल्यात झालेल्या या बैठकीत संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारातील शिवसेनेचा समावेश, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक आदी मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते. भाजपा-शिवसेनेच्या फॉर्म्युल्यानुसार शिवसेनेच्या वाट्याला आणखी दोन मंत्रिपदे येतात. मंत्रिमंडळ विस्तारात या दोन्ही जागा भरल्या जाव्यात, अशी शिवसेनेची मागणी आहे. रविवारी झालेल्या बैठकीत मंत्रिपदाच्या संभाव्य दावेदारांच्या नावांवर चर्चा झाली. आ. निलम गोऱ्हे (विधान परिषद सदस्य), आ. गुलाबराव पाटील (जळगाव ग्रामीण), अर्जुन खोतकर(जालना), डॉ. सुजित मिणचेकर(हातकणंगले), राजेश क्षीरसागर(कोल्हापूर उत्तर) अशी पाच जणांची नावे आघाडीवर असून, गुलाबराव पाटील आणि अर्जुन खोतकर यांना संधी मिळण्याची शक्यता असल्याचे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले. पाटील आणि खोतकर यांनी विधिमंडळात भाजपावर केलेला हल्लाबोल आणि या दोन्ही नेत्यांना त्यांच्या ग्रामीण पार्श्वभूमीचा फायदा होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. भाजपासोबतच्या संबंधातील तणावाबाबतही या बैठकीत चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. विशेषत: मंत्रिमंडळातील भाजपा मंत्र्यांकडून शिवसेनेच्या मंत्र्यांना दिली जाणारी वागणूकही यावेळी चर्चिली गेली. मंत्रिमंडळ विस्तार आणि भाजपासोबतच्या धोरणाबाबत अंतिम निर्णय घेण्याचे सर्वाधिकार यापूर्वीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे देण्यात आले होते, मुख्यमंत्री लंडन दौऱ्यावरून आल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा करण्याची शक्यता आहे. येत्या ५ डिसेंबरपासून उद्धव ठाकरे राज्यव्यापी दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्याबाबतही यावेळी चर्चा झाली. येत्या १७ नोव्हेंबर रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा तिसरा स्मृतिदिन असून, या दिवशीच्या कार्यक्रमांच्या तयारीचाही बैठकीत आढावा घेण्यात आला. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या भव्य स्मारकासाच्या स्थळाबाबतही यावेळी चर्चा करण्यात आली.महापौर बंगल्यासह अन्य काही ठिकाणे स्मारकासाठी चर्चेत आहेत. उद्धव ठाकरे ज्या ठिकाणाला पसंती देतील तिथे स्मारक उभारले जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे.