शहरं
Join us  
Trending Stories
1
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
2
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
3
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
4
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
5
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
6
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
7
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
8
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
9
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
10
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
11
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
12
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
13
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
14
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
15
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू
16
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
18
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
19
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
20
निवडणूक आयोगाने देशात 'मतदार यादी दुरुस्ती' मोहिमची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक

नि:स्वार्थी समाजसेवक, खासदार हरपला! चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत एकही गुन्हा दाखल नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 06:30 IST

मंगळवारी कालवश झालेले पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे वर्णन नि:स्वार्थी लोकप्रतिनिधी असेच केले जाते. चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्याकडे वडिलोपार्जित घर, शेती व जमीन सोडली तर एकही नाव घेण्यासारखी मालमत्ता नव्हती.

विशेष प्रतिनिधीपालघर : मंगळवारी कालवश झालेले पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचे वर्णन नि:स्वार्थी लोकप्रतिनिधी असेच केले जाते. चार दशकांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांच्याकडे वडिलोपार्जित घर, शेती व जमीन सोडली तर एकही नाव घेण्यासारखी मालमत्ता नव्हती. एकूण १४ लाखांच्या मालमत्तेतून २ लाखांचे कर्ज वजा केले तर कशीबशी १२ लाखांची मालमत्ता त्यांची आहे. लोकप्रतिनिधींचे पी.अ‍े. आणि साधे नगरसेवक करोडपती होण्याच्या काळात तीनदा खासदार व एकदा आमदार झालेल्या वनगांची ही आर्थिकस्थिती त्यांच्या नि:स्वार्थतेचे द्योतक आहे. पक्ष आणि समाज कार्यासाठी त्यांनी २००४ साली घेतलेली इंडिका कार ही एकमेव मोठी अशी मालमत्ता त्यांच्याकडे होती. परंतु ती इतकी जुनी होती की, तिचे काही मूल्येही उरलेले नाही.आपल्या खासदारकीच्या उमेदवारी अर्जासोबत त्यांनी भरलेल्या मालमत्तेच्या विवरण पत्रानुसार त्यांच्यावर बँक आॅफ महाराष्टÑच्या तलासरी शाखेचे ६२३३२ रुपयांचे डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या तलासरी शाखेचे १२२३३२ असे एकूण १८४६६४ रुपयांचे कर्ज होते. त्यांच्या वडिलोपार्जित शेतजमीनीची किंमत ६ लाख होती. तर अकृषिक जमीनीची किंमत ३ लाख होती. पत्नीचे २ तोळ्याचे मंगळसूत्र हा एकमेव दागिना त्यांच्याकडे होता. त्याची किंमती ३० हजार रुपये होती. चार बँक खात्यातील शिल्लक अवघी ३२ हजार, राहते घर व गुंतवणूक हिशेबात घेतली तर त्यांची एकूण मालमत्ता १४ लाखांची त्यातून जर कर्जाची रक्कम वजा केली तर ती १२१५३३६ एवढीच होती. आजी-माजी मंत्री, पंतप्रधान, खासदार, आमदार हे शासकीय निवासस्थानाचे लाखो रुपयांचे भाडे व त्यातील सुविधांचे बिल थकविण्यात धन्यता मानत असतांना वनगा यांनी मात्र कोणत्याही शासकीय यंत्रणेचा एक छदामही बाकी ठेवलेला नव्हता. त्यामुळेच त्यांना नि:स्वार्थी व प्रामाणिक लोकप्रतिनीधी असे संबोधले जात होते.२००९ साली झालेल्या लोकसभा निवडणूकीत बविआच्या बळीराम जाधव यांनी २२३२३४ मते मिळवून व १२,३५९ मतांनी त्यांचा पराभव केला होता. या निवडणूकीत काँग्रेसच्या दामू शिंगडा यांनी १६०५७० आणि मार्क्सवादी पक्षाचे लहानू कोम यांनी ९२२२४ मते मिळविली होती. त्यामुळे वनगा यांचा पराभव घडून आला होता. या पराभवाने खचून न जाता वनगा यांनी पक्ष बांधणी आणि समाजाच्या विविध प्रश्नांवर आंदोलने उभारणे सुरु ठेवले. त्यामुळेच २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत त्यांनी ५३३२०१ एवढी विक्रमी मते व २३९५२० मताधिक्यांनी बळीराम जाधव यांचा पराभव केला. २००९ च्या विधानसभा निवडणूकीत वनगा यांनी भाजपचे उमेदवार म्हणून विक्रमगड मतदारसंघातून ४७३७१ मते मिळवून त्यांनी राष्टÑवादीचे चंद्रकांत भुसारा यांचा ५०३२ मताधिक्याने पराभव केला होता.लोकसभेत चिंतामणी या टोपण नावाने ते ओळखले जायचे. पेशाने वकील असलेल्या वनगा यांनी आपल्या वकीलीकडे कधी व्यवसाय म्हणून न पाहता वकीली हे जनसेवेचे साधन म्हणून वापरले. असंख्य गोर-गरीब जनतेचे खटले त्यांनी मोफत चालविले.आज बंदचे आवाहनडहाणू : खा.चिंतामण वनगा यांच्या निधनाचे वृत्त पसरताच संपूर्ण पालघर जिल्हयात शोककळा पसरली आहे.तर संघर्षातुन साकारलेले नेतृत्व हरपल्याची प्रतिक्र ीया सर्वत्र उमटली. तलासरी बरोबरच डहाणू, पालघर, विक्रमगड, जव्हार या तालुक्यात शोक व्यक्त केला जात होता.शेतीमध्ये राबणारे , भ्रष्टाचारमुक्त नेते म्हणून त्यांची ख्याती होती. पाकिस्तानच्या तुरुंगातील आदिवासी खलाशांची त्यांनी मुक्तता घडवून आणली होती. दुखवटा म्हणून डहाणू, चारोटी, कासा येथे बुधवारी बंद पाळण्याचे आवाहन भाजपने केले आहे.

टॅग्स :Vasai Virarवसई विरारChintaman Wangaचिंतामण वनगा