शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
3
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
4
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
5
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
6
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
7
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
8
जातगणना : मॅजिक की मंडल?
9
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
10
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
11
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
12
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
13
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
14
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
15
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
16
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
17
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
18
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
19
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
20
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा

शाळा बुडवण्यासाठी स्वत:चेच अपहरण

By admin | Updated: October 6, 2014 04:52 IST

शाळेत जाण्याचा कंटाळा येत असल्याने एका बारा वर्षीय मुलाने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव केल्याचा प्रकार ‘ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिट’ने समुपदेशनाद्वारे उघडकीस आणला आहे

ठाणे : शाळेत जाण्याचा कंटाळा येत असल्याने एका बारा वर्षीय मुलाने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव केल्याचा प्रकार ‘ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिट’ने समुपदेशनाद्वारे उघडकीस आणला आहे. गेल्या महिन्यातही अशाच प्रकारे दुकानात केलेल्या चोरीची माहिती पालकांना मिळेल, या भीतीने आठ वर्षीय बालकाने स्वत:च्या अपहरणाचा बनाव केला होता.कळव्यात चौथीत शिकणाऱ्या या मुलाला शाळेत जाण्याचा कंटाळा येत होता. त्यामुळे त्याने २४ सप्टेंबरला घरातून पळ काढला. याप्रकरणी २६ सप्टेंबरला कळवा पोलीस ठाण्यात अपहरण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर ‘ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिट’ आणि कळवा पोलिसांनी संयुक्तरीत्या तपास सुरू केला. याचदरम्यान तो गावी असल्याचा फोन त्याच्या पालकांना आला. ठाणे चाइल्ड प्रोटेक्शन युनिटद्वारे त्याचे समुपदेशन केले असता त्याला शाळेत जाण्याचा कंटाळा येत असल्याने त्याने हा अपहरणाचा बनाव केल्याचा प्रकार समोर आला.‘२४ सप्टेंबरला मला चौघांनी पळवून नेले. तेथे २०-२५ मुले होती. त्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेशातील आपल्या गावी सोडले,’ असे त्याने सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी शोध घेतला. पण, ते काही सापडले नाहीत. त्याने एकट्याने उत्तर प्रदेश गाठले. याचदरम्यान, त्याने रेल्वेत भीक मागून पोट भरले़ नंतर गाव गाठल्याचे निदर्शनास आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ, पोलीस उपनिरीक्षक कमालउद्दीन शेख, पोलीस नाईक अजय फराते यांनी ही कामगिरी केली. (प्रतिनिधी)