शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

क्षमता, ज्ञान, योग्यतेवर क्षेत्र निवडा

By admin | Updated: July 1, 2014 00:59 IST

दहावी किंवा बारावी नंतर आपले क्षेत्र निवडताना क्षमता, त्या क्षेत्रातील ज्ञान, संकल्पना समजून घेण्याची योग्यता आणि महत्त्वाचं म्हणजे त्या क्षेत्रात किती कष्ट करू शकता यावर अवलंबून असते.

‘दहावीनंतर पुढे काय ?’मध्ये वक्त्यांचा सूर : विद्यार्थी-पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसादनागपूर : दहावी किंवा बारावी नंतर आपले क्षेत्र निवडताना क्षमता, त्या क्षेत्रातील ज्ञान, संकल्पना समजून घेण्याची योग्यता आणि महत्त्वाचं म्हणजे त्या क्षेत्रात किती कष्ट करू शकता यावर अवलंबून असते. विशेष म्हणजे, कोणतेही क्षेत्र निवडल्यानंतर त्यातील ज्ञान अपडेट ठेवणे आवश्यक असते, असा सूर वक्त्यांचा होता. ‘लोकमत युवा नेक्स्ट’च्यावतीने ‘दहावी नंतर पुढे काय ?’ या शिर्षकांतर्गत दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आज रविवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून सेंट पॉल स्कूलचे संचालक राजाभाऊ टांकसाळे, जे.डी. कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंटचे उपप्राचार्य श्रीकांत विजयराव सोनेकर, फ्युचर व्हिस्टाचे संचालक नितीन आचार्य, प्रेमलता डागा आणि निधी नशिने आदी उपस्थित होते. शंकरनगर चौकातील साई सभागृहात आयोजित या कार्यशाळेला पालक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.इंजिनिअरिंग क्षेत्रात भरपूर ‘स्कोप’इंजिनिअरिंग अभ्यासक्र मांच्या प्रवेश प्रक्रि येत नेमक्या कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत, आरक्षणाचे नियम , जागांचं वाटप कसं असतं, आॅप्शन फॉर्म भरताना घ्यायची काळजी अशा अनेक बाबींविषयी असलेल्या शंकांचं निरसन श्रीकांत सोनेकर यांनी केले. ते म्हणाले, इंजिनिअरिंग क्षेत्रात भरपूर स्कोप आहे. साधारण २०-२५ व्या वर्षी अर्निंग सोर्स सुरू करता येतो. इंजिनिअरिंगनंतर रिसर्च फिल्ड, फार्मा, बायोमेडिकल, इन्श्युरन्स या शिवाय गव्हर्नमेंट सेक्टर मध्येही जाता येऊ शकते. कुठल्याही व्यावसायिक अभ्यासक्रमात साधारण ६-७ वर्षे जातात परंतु इंजिनिअरिंगमध्ये चारच वर्षे लागतात. यात शेवटच्या वर्षाला जॉब मिळविता येतो. एका निरीक्षणात असे आढळून आले आहे, २०१६ मध्ये भारतात ३ मिलेनियम इंजिनिअरिंगच्या पोस्ट निर्माण होणार आहेत. लक्ष्य निश्चित कराआयुष्यात ध्येय, लक्ष्य निश्चित करणे आवश्यक असते. ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची नितांत आवश्यकता असते. आपल्या ध्येयाशी प्रामणिक राहाल तर यशापर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही, हा कानमंत्र नितीन आचार्य यांनी दिला. ते म्हणाले, इंजिनिअरिंगच्या फक्त १० हजार जागा आहेत. यामुळे जेईईई मेन्स आणि बारावी बोर्डवर आपले लक्ष केंद्रित करावे. त्यानंतर आयआयटीची तयारी करावी. यावेळी आचार्य यांनी फ्युचर व्हिस्टातील कोचिंग क्लासेसचीही माहिती दिली. (प्रतिनिधी)