शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

क्षमता, ज्ञान, योग्यतेवर क्षेत्र निवडा

By admin | Updated: July 1, 2014 00:59 IST

दहावी किंवा बारावी नंतर आपले क्षेत्र निवडताना क्षमता, त्या क्षेत्रातील ज्ञान, संकल्पना समजून घेण्याची योग्यता आणि महत्त्वाचं म्हणजे त्या क्षेत्रात किती कष्ट करू शकता यावर अवलंबून असते.

‘दहावीनंतर पुढे काय ?’मध्ये वक्त्यांचा सूर : विद्यार्थी-पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसादनागपूर : दहावी किंवा बारावी नंतर आपले क्षेत्र निवडताना क्षमता, त्या क्षेत्रातील ज्ञान, संकल्पना समजून घेण्याची योग्यता आणि महत्त्वाचं म्हणजे त्या क्षेत्रात किती कष्ट करू शकता यावर अवलंबून असते. विशेष म्हणजे, कोणतेही क्षेत्र निवडल्यानंतर त्यातील ज्ञान अपडेट ठेवणे आवश्यक असते, असा सूर वक्त्यांचा होता. ‘लोकमत युवा नेक्स्ट’च्यावतीने ‘दहावी नंतर पुढे काय ?’ या शिर्षकांतर्गत दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी आज रविवारी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य मार्गदर्शक म्हणून सेंट पॉल स्कूलचे संचालक राजाभाऊ टांकसाळे, जे.डी. कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अ‍ॅण्ड मॅनेजमेंटचे उपप्राचार्य श्रीकांत विजयराव सोनेकर, फ्युचर व्हिस्टाचे संचालक नितीन आचार्य, प्रेमलता डागा आणि निधी नशिने आदी उपस्थित होते. शंकरनगर चौकातील साई सभागृहात आयोजित या कार्यशाळेला पालक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.इंजिनिअरिंग क्षेत्रात भरपूर ‘स्कोप’इंजिनिअरिंग अभ्यासक्र मांच्या प्रवेश प्रक्रि येत नेमक्या कोणत्या बाबी महत्त्वाच्या आहेत, आरक्षणाचे नियम , जागांचं वाटप कसं असतं, आॅप्शन फॉर्म भरताना घ्यायची काळजी अशा अनेक बाबींविषयी असलेल्या शंकांचं निरसन श्रीकांत सोनेकर यांनी केले. ते म्हणाले, इंजिनिअरिंग क्षेत्रात भरपूर स्कोप आहे. साधारण २०-२५ व्या वर्षी अर्निंग सोर्स सुरू करता येतो. इंजिनिअरिंगनंतर रिसर्च फिल्ड, फार्मा, बायोमेडिकल, इन्श्युरन्स या शिवाय गव्हर्नमेंट सेक्टर मध्येही जाता येऊ शकते. कुठल्याही व्यावसायिक अभ्यासक्रमात साधारण ६-७ वर्षे जातात परंतु इंजिनिअरिंगमध्ये चारच वर्षे लागतात. यात शेवटच्या वर्षाला जॉब मिळविता येतो. एका निरीक्षणात असे आढळून आले आहे, २०१६ मध्ये भारतात ३ मिलेनियम इंजिनिअरिंगच्या पोस्ट निर्माण होणार आहेत. लक्ष्य निश्चित कराआयुष्यात ध्येय, लक्ष्य निश्चित करणे आवश्यक असते. ते साध्य करण्यासाठी प्रयत्नांची नितांत आवश्यकता असते. आपल्या ध्येयाशी प्रामणिक राहाल तर यशापर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला कोणतीच अडचण येणार नाही, हा कानमंत्र नितीन आचार्य यांनी दिला. ते म्हणाले, इंजिनिअरिंगच्या फक्त १० हजार जागा आहेत. यामुळे जेईईई मेन्स आणि बारावी बोर्डवर आपले लक्ष केंद्रित करावे. त्यानंतर आयआयटीची तयारी करावी. यावेळी आचार्य यांनी फ्युचर व्हिस्टातील कोचिंग क्लासेसचीही माहिती दिली. (प्रतिनिधी)