शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

‘महापालिका विकास आराखडा लादू पाहतेय!’

By admin | Updated: July 31, 2016 01:50 IST

मुंबई महानगरपालिका चुकीचा प्रस्तावित विकास नियोजन आराखडा मुंबईकरांवर जबरदस्तीने लादू पाहतेय

मुंबई : मुंबई महानगरपालिका चुकीचा प्रस्तावित विकास नियोजन आराखडा मुंबईकरांवर जबरदस्तीने लादू पाहतेय, असा आरोप हमारा शहर मुंबई अभियान संस्थेने केला आहे. पालिकेच्या प्रस्तावित विकास नियोजन आराखड्याला हजारो सूचना आणि हरकती आल्या आहेत. मात्र त्यांचा आकडा कमी दर्शवून पालिका मुंबईकरांना अंधारात ठेवत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते सीताराम शेलार यांनी या वेळी केला आहे.शेलार म्हणाले की, महापालिकेच्या विकास आराखड्यात बदल, सूचना आणि हरकती दर्शविणारे सुमारे ३० हजार अर्ज संस्थेने पाठविले आहेत. तरीही १० हजारांहून कमी अर्ज आल्याचे पालिका सांगते. या अर्जांची संख्या कमी दाखविण्यासाठी पालिकेने एका संस्थेने पाठविलेल्या हजारो अर्जांची गणती एक अर्ज म्हणून केली आहे. या आराखड्यात लोकशाही पायदळी तुडवून पालिका आयुक्तांना राजाप्रमाणे एकाधिकार दिले जात असल्याचा आरोपही शेलार यांनी केला आहे. ते म्हणाले की, माजी आयुक्त सीताराम कुंटे यांनी वॉर्ड स्तरावर जनजागृती करून मुंबईकरांना प्रस्तावित आराखड्याविषयी माहिती दिली होती. याउलट सध्याच्या आयुक्तांकडून असा कोणताही प्रयत्न होताना दिसत नाही. याउलट पालिका अभियंत्यांना विकास आराखडा समजून घेण्यासाठी खासगी संस्थेकडे पाठवते. त्यामुळे सुधारित आराखडा बिल्डरांसाठीच आहे. (प्रतिनिधी)