शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

नामदेव शास्त्रींचे काय करायचे ते दसरा झाल्यावर पाहू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2016 04:55 IST

ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या यासंदर्भातील कथित संभाषणाच्या तीन क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

प्रताप नलावडे,

बीड- भगवानगडावरील दसरा मेळाव्याचा वाद विकोपाला गेलेला असतानाच आता ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या यासंदर्भातील कथित संभाषणाच्या तीन क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. एका क्लिपमध्ये ‘नामदेव शास्त्रींचे काय करायचे ते आपण दसरा मेळावा झाल्यावर पाहू’, असे कार्यकर्त्यांशी संवाद साधतानाच, लोकांना मारून पुन्हा त्यांच्यावरच गुन्हे दाखल करून त्यांना तडीपार आम्ही करतो...आम्ही काही साधे नाही, असे खळबळजनक वक्तव्य आहे. तथापि, या क्लिपच्या सत्यतेसंदर्भात पंकजा मुंडे समर्थकांनी साशंकता व्यक्त केली आहे.सोशल मीडियावरून व्हायरल झालेल्या या क्लिपस् आपण ऐकल्या असून गोपीनाथ मुंडे यांची कन्या माझ्याविषयी असे बोलू शकते, यावर अजूनही विश्वास बसत नाही आणि हे सर्व ऐकून माझे डोकेच सुन्न झाले आहे, अशी प्रतिक्रिया नामदेवशास्त्री यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.ते म्हणाले, मी आजही पंकजा यांना गडाची कन्या मानतो आणि त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे आहे. परंतु धर्म आणि राजकारण याची गल्लत होऊ नये, यासाठी आपण ही भूमिका घेतली आहे आणि ती पंकजा यांनी समजून घेतली पाहिजे. केवळ भाषण करण्यासाठी हट्टाला पेटणे उचित ठरणार नाही. त्यांना मेळावाच घ्यायचा असेल तर तो गडाच्या पायथ्याशी त्या घेऊ शकतात. दसरा सणानिमित्ताने गडावर कोणतेही राजकीय भाषण होणार नाही, अशी भूमिका महंत नामदेवशास्त्री यांनी घेतल्याने गेल्या ११ महिन्यांपासून हा विषय चर्चेत राहिला आहे. (प्रतिनिधी)भगवानगडावरील पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यास परवानगी द्यायची की नाही याबाबत जिल्हा प्रशासनाने पोलिसांकडे अभिप्राय मागविला आहे़ पोलिसांच्या अहवालावरून पुढील कार्यवाही केली जाणार आहे़या संदर्भात मुंडे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. मुंबईतील रॉयलस्टोन या त्यांच्या निवासस्थानी दूरध्वनी केल्यानंतर त्यांचे सहाय्यक प्रदीप कुलकर्णी यांच्याशी संवाद झाला. परंतु त्या आता उपलब्ध नाहीत, असे सांगण्यात आले. >मान-सन्मान काही असा मागून आणि भांडून मिळत नसतो. त्यामुळे पंकजा यांनी गडावर येणार आणि भाषण करणारच, असा घेतलेला पवित्रा चुकीचा आहे. त्या मंत्री आहेत. त्यांनी असे वागणे योग्य नाही. त्यांना किंवा कोणालाच आम्ही निमंत्रण दिलेले नाही. परंतु आता सत्तेच्या जोरावर त्या असे करणार असतील तर त्याची जबाबदारी शासनावर राहिल.- नामदेवशास्त्री महाराज, महंत, भगवानगड