शहरं
Join us  
Trending Stories
1
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
2
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
3
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
4
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
5
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
6
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
7
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
8
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
9
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
10
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
11
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!
12
चिनी विद्यार्थिनीला युक्रेनियन तरुणासोबत शारीरिक संबंध ठेवल्याची शिक्षा, विद्यापीठानं उचललं टोकाचं पाऊल
13
नॅशनल पार्कमधील ‘वनराणी’चे रुपडे पालटले; व्हिस्टाडोमसह नव्या अवतारात सेवेत, कधी सुरू होणार?
14
आरोपीच्या बोलावण्यावरून वारंवार हॉटेलमध्ये का गेलात? पती असताना परपुरुषाशी...! बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टानं फटकारलं
15
RCBचा विराट कोहली जबाबदार! बेंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणात कर्नाटक सरकारचा अहवाल सादर
16
वृद्धाला हातपाय बांधून कारमध्ये कोंडले, मग कुटुंब ताजमहाल पाहण्यात रंगले, सुरक्षा रक्षकाने पाहिल्याने अनर्थ टळला   
17
"आमचं शांततापूर्ण जीवन..."; गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने फोन चार्ज झाल्यावर पहिलं काय केलं?
18
केस एवढे गळतात की टक्कल पडण्याचीच वाटते भीती; 'हा' घरगुती उपाय ठरेल रामबाण
19
Maharashtra Politics : 'दिनो मोरियाने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल';एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा
20
2025 Keeway RR300: थेट बीएमडब्लूशी स्पर्धा करणार मोटो वॉल्टची नवी बाईक? दोन लाखांहून कमी किंमतीत लॉन्च!

दुय्यम मिश्र खत पुन्हा माथी

By admin | Updated: October 25, 2016 02:06 IST

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दुय्यम मिश्र खत कारखान्यांचा परवाना नूतनीकरण करण्याचा डाव कृषी मंत्रालयात आखला जात असून, त्यासाठी सहकार मंत्रालयातून

-  राजेश निस्ताने,  यवतमाळशेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दुय्यम मिश्र खत कारखान्यांचा परवाना नूतनीकरण करण्याचा डाव कृषी मंत्रालयात आखला जात असून, त्यासाठी सहकार मंत्रालयातून कारखान्यांच्या वतीने मध्यस्थी केली जात आहे. महाराष्ट्राचा अपवाद वगळता, देशात कुठेच दुय्यम मिश्र खत विक्रीला परवानगी नाही. ही परवानगी केंद्राच्या अधिकारात येते, परंतु २०११ मध्ये राज्यात चार डझनांवर कारखान्यांना परवानगी देण्यात आली होती. या परवानगीसाठी तत्कालीन कृषी मंत्रालयातून खास पुण्यात ‘झेंडे’ रोवले गेले होते. राज्य शासनाने अधिसूचना काढून दुय्यम मिश्र खताची १०-५-१० ही ग्रेड मंजूर केली. आता या कारखान्यांचे परवाने नूतनीकरण करून देण्याची तयारी कृषी आयुक्तालयात सुरू झाली आहे. या नूतनीकरणासाठी खुद्द कृषी मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. सर्व कारखानदारांच्या वतीने सहकार मंत्रालयातून कृषी मंत्रालयाकडे ‘मध्यस्थी’ केली जात आहे. कारण त्यांना आपल्याही एका कारखान्याच्या परवान्याचे ‘मंगल’ करून घ्यायचे आहे. मुळात या कारखान्यांना २०११ मध्ये देण्यात आलेला परवानाच चुकीचा व नियमबाह्य असल्याचे सांगितले जाते. कारण केंद्र शासनाला मिश्र खत हा प्रकारच मान्य नाही. महाराष्ट्रात तर त्याही पुढे जाऊन दुय्यम दर्जाच्या मिश्र खत कारखान्यांना परवानगी देण्यात आली आहे. या परवानगीमुळे अशिक्षित, गोरगरीब शेतकऱ्यांची स्वस्त खताच्या नावाखाली सर्रास लूट केली जात आहे. - अवघे ५० ते ६० रुपये उत्पादन खर्च असलेल्या या दुय्यम खताच्या प्रती बॅगची किंमत ३०० ते ४०० रुपये आकारली जाते. अनेक कृषी केंद्रचालक मनमानी पद्धतीने या खताची विक्री करतात. दुय्यम मिश्र खत कारखान्यांना परवाने देतानाच मोठी ‘उलाढाल’ झाली होती. त्याची पुनरावृत्ती करून, या परवान्यांचे नूतनीकरण करण्याची तयारी सुरू आहे. - या खताचे विदर्भ, मराठवाड्यासह सर्वत्र कारखाने आहेत. हे खत जणू मातीच्या स्वरूपात राहते. त्यातील घटक एकजीव होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ‘रिझल्ट’ मिळत नाही. दर्जेदार खताची बॅग १२०० रुपयांपर्यंत मिळते. त्यावर कृषी केंद्र विक्रेत्याला ‘मार्जिन’ कमी राहते. म्हणून जादा मार्जिनच्या ३०० ते ४०० रुपयांत मिळणाऱ्या खताची शिफारस केली जाते. अनेकदा महागड्या खताच्या एका पोत्यात मिश्र खताचे दोन पोती मिसळून शेतकरी वापरतात. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन हे खत त्यांच्या माथी मारले जाते.