शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

दुय्यम मिश्र खत पुन्हा माथी

By admin | Updated: October 25, 2016 02:06 IST

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दुय्यम मिश्र खत कारखान्यांचा परवाना नूतनीकरण करण्याचा डाव कृषी मंत्रालयात आखला जात असून, त्यासाठी सहकार मंत्रालयातून

-  राजेश निस्ताने,  यवतमाळशेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दुय्यम मिश्र खत कारखान्यांचा परवाना नूतनीकरण करण्याचा डाव कृषी मंत्रालयात आखला जात असून, त्यासाठी सहकार मंत्रालयातून कारखान्यांच्या वतीने मध्यस्थी केली जात आहे. महाराष्ट्राचा अपवाद वगळता, देशात कुठेच दुय्यम मिश्र खत विक्रीला परवानगी नाही. ही परवानगी केंद्राच्या अधिकारात येते, परंतु २०११ मध्ये राज्यात चार डझनांवर कारखान्यांना परवानगी देण्यात आली होती. या परवानगीसाठी तत्कालीन कृषी मंत्रालयातून खास पुण्यात ‘झेंडे’ रोवले गेले होते. राज्य शासनाने अधिसूचना काढून दुय्यम मिश्र खताची १०-५-१० ही ग्रेड मंजूर केली. आता या कारखान्यांचे परवाने नूतनीकरण करून देण्याची तयारी कृषी आयुक्तालयात सुरू झाली आहे. या नूतनीकरणासाठी खुद्द कृषी मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. सर्व कारखानदारांच्या वतीने सहकार मंत्रालयातून कृषी मंत्रालयाकडे ‘मध्यस्थी’ केली जात आहे. कारण त्यांना आपल्याही एका कारखान्याच्या परवान्याचे ‘मंगल’ करून घ्यायचे आहे. मुळात या कारखान्यांना २०११ मध्ये देण्यात आलेला परवानाच चुकीचा व नियमबाह्य असल्याचे सांगितले जाते. कारण केंद्र शासनाला मिश्र खत हा प्रकारच मान्य नाही. महाराष्ट्रात तर त्याही पुढे जाऊन दुय्यम दर्जाच्या मिश्र खत कारखान्यांना परवानगी देण्यात आली आहे. या परवानगीमुळे अशिक्षित, गोरगरीब शेतकऱ्यांची स्वस्त खताच्या नावाखाली सर्रास लूट केली जात आहे. - अवघे ५० ते ६० रुपये उत्पादन खर्च असलेल्या या दुय्यम खताच्या प्रती बॅगची किंमत ३०० ते ४०० रुपये आकारली जाते. अनेक कृषी केंद्रचालक मनमानी पद्धतीने या खताची विक्री करतात. दुय्यम मिश्र खत कारखान्यांना परवाने देतानाच मोठी ‘उलाढाल’ झाली होती. त्याची पुनरावृत्ती करून, या परवान्यांचे नूतनीकरण करण्याची तयारी सुरू आहे. - या खताचे विदर्भ, मराठवाड्यासह सर्वत्र कारखाने आहेत. हे खत जणू मातीच्या स्वरूपात राहते. त्यातील घटक एकजीव होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ‘रिझल्ट’ मिळत नाही. दर्जेदार खताची बॅग १२०० रुपयांपर्यंत मिळते. त्यावर कृषी केंद्र विक्रेत्याला ‘मार्जिन’ कमी राहते. म्हणून जादा मार्जिनच्या ३०० ते ४०० रुपयांत मिळणाऱ्या खताची शिफारस केली जाते. अनेकदा महागड्या खताच्या एका पोत्यात मिश्र खताचे दोन पोती मिसळून शेतकरी वापरतात. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन हे खत त्यांच्या माथी मारले जाते.