शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

दुय्यम मिश्र खत पुन्हा माथी

By admin | Updated: October 25, 2016 02:06 IST

शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दुय्यम मिश्र खत कारखान्यांचा परवाना नूतनीकरण करण्याचा डाव कृषी मंत्रालयात आखला जात असून, त्यासाठी सहकार मंत्रालयातून

-  राजेश निस्ताने,  यवतमाळशेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या दुय्यम मिश्र खत कारखान्यांचा परवाना नूतनीकरण करण्याचा डाव कृषी मंत्रालयात आखला जात असून, त्यासाठी सहकार मंत्रालयातून कारखान्यांच्या वतीने मध्यस्थी केली जात आहे. महाराष्ट्राचा अपवाद वगळता, देशात कुठेच दुय्यम मिश्र खत विक्रीला परवानगी नाही. ही परवानगी केंद्राच्या अधिकारात येते, परंतु २०११ मध्ये राज्यात चार डझनांवर कारखान्यांना परवानगी देण्यात आली होती. या परवानगीसाठी तत्कालीन कृषी मंत्रालयातून खास पुण्यात ‘झेंडे’ रोवले गेले होते. राज्य शासनाने अधिसूचना काढून दुय्यम मिश्र खताची १०-५-१० ही ग्रेड मंजूर केली. आता या कारखान्यांचे परवाने नूतनीकरण करून देण्याची तयारी कृषी आयुक्तालयात सुरू झाली आहे. या नूतनीकरणासाठी खुद्द कृषी मंत्रालयाने पुढाकार घेतला आहे. सर्व कारखानदारांच्या वतीने सहकार मंत्रालयातून कृषी मंत्रालयाकडे ‘मध्यस्थी’ केली जात आहे. कारण त्यांना आपल्याही एका कारखान्याच्या परवान्याचे ‘मंगल’ करून घ्यायचे आहे. मुळात या कारखान्यांना २०११ मध्ये देण्यात आलेला परवानाच चुकीचा व नियमबाह्य असल्याचे सांगितले जाते. कारण केंद्र शासनाला मिश्र खत हा प्रकारच मान्य नाही. महाराष्ट्रात तर त्याही पुढे जाऊन दुय्यम दर्जाच्या मिश्र खत कारखान्यांना परवानगी देण्यात आली आहे. या परवानगीमुळे अशिक्षित, गोरगरीब शेतकऱ्यांची स्वस्त खताच्या नावाखाली सर्रास लूट केली जात आहे. - अवघे ५० ते ६० रुपये उत्पादन खर्च असलेल्या या दुय्यम खताच्या प्रती बॅगची किंमत ३०० ते ४०० रुपये आकारली जाते. अनेक कृषी केंद्रचालक मनमानी पद्धतीने या खताची विक्री करतात. दुय्यम मिश्र खत कारखान्यांना परवाने देतानाच मोठी ‘उलाढाल’ झाली होती. त्याची पुनरावृत्ती करून, या परवान्यांचे नूतनीकरण करण्याची तयारी सुरू आहे. - या खताचे विदर्भ, मराठवाड्यासह सर्वत्र कारखाने आहेत. हे खत जणू मातीच्या स्वरूपात राहते. त्यातील घटक एकजीव होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ‘रिझल्ट’ मिळत नाही. दर्जेदार खताची बॅग १२०० रुपयांपर्यंत मिळते. त्यावर कृषी केंद्र विक्रेत्याला ‘मार्जिन’ कमी राहते. म्हणून जादा मार्जिनच्या ३०० ते ४०० रुपयांत मिळणाऱ्या खताची शिफारस केली जाते. अनेकदा महागड्या खताच्या एका पोत्यात मिश्र खताचे दोन पोती मिसळून शेतकरी वापरतात. शेतकऱ्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन हे खत त्यांच्या माथी मारले जाते.