शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्तचा दुसरा टप्पा धीम्या गतीने

By admin | Updated: May 19, 2016 06:08 IST

जलयुक्त शिवार अभियानातील पहिल्या टप्प्यातील ४७० कामे प्रगतीपथावर आहेत.

राजेश खराडे,

बीड- जलयुक्त शिवार अभियानातील पहिल्या टप्प्यातील ४७० कामे प्रगतीपथावर आहेत. दुसऱ्या टप्प्यातील कामे पावसाळ््यापूर्वी त्वरित सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. मात्र बीडमध्ये १७ व आष्टी तालुक्यात २० कामे वगळता इतर तालुक्यांमध्ये अजून कामांचा श्रीगणेशाही झालेला नाही.सिंचनक्षेत्र वाढविण्याच्या दृष्टीने दुसऱ्या टप्प्याकरीता मराठवाड्यात सर्वाधिक २४२ गावांची निवड बीड जिल्ह्यातून करण्यात आलेली आहे. याविषयी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी कामांचा आढावा घेऊन कामे त्वरीत सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार बीड तालुका कृषी विभागाच्या वतीने १७ कामांच्या निविदा काढून कार्यरंभाचे आदेश देण्यात आले आहेत. वस्तुत: मार्च अखेरपर्यंत पहिला टप्पा पूर्ण करून दुसऱ्या टप्प्यातील कामे सुरू करण्याचा प्रशासनाचा मानस होता. मात्र दोन महिने उलटल्यानंतरही प्रक्रियेतच कामे अडकली आहेत. गावांची नावे जाहीर होताच त्याची पाहणी करून आवश्यक असणाऱ्या कामांच्या याद्या तयार करण्याचे आदेश देण्यात आले होते. असे असतानाही कामांना गती मिळालेली नाही.निविदा प्रक्रियामुळे खोडापहिल्या टप्प्यातील कामे कृषी विभागाअंतर्गत होती. त्यामुळे कामांत अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. दुसरा टप्पा हा निविदेनुसार होत असल्याने हा सहभाग कमी झाला आहे. अनेक तालुक्यांमधून कामांच्या याद्याही जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे जमा नाहीत. त्यामुळे नेमकी काय कामे सुरू आहेत याबाबत वरिष्ठ अधिकारीही दुसऱ्या टप्प्याबाबत अनभिज्ञ आहेत. दुष्काळामुळे शेततळ्यांच्या कामांना ब्रेकजालना : मागेल त्याला शेततळे योजनेअंतर्गत जिल्ह्यात १७०६ शेततळ्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. मात्र, तीव्र दुष्काळामुळे शेतकऱ्यांनी या कामांना ब्रेक दिल्याचे चित्र आहे. तळ््यासाठी शासनाकडून ५० हजार रुपयांचे किरकोळ अनुदान मिळत आहे. यातून शेततळे तयार करणे शक्य नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या योजनेअंतर्गत साडेपाच हजार अर्ज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाकडे प्राप्त झाले आहेत. दुष्काळ व तसेच शेतकऱ्यांकडे पैशांची जुळवाजुळव नसल्याने मंजूर असलेले शेततळ्यांची कामे ठप्प झाली आहेत. पाऊस पडल्यावरच शेतकरी शेततळी करतील, असा अंदाज कृषी अधिकारी व्यक्त करतात.