शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

कोंडीमुळे जयंतराव पर्यायांच्या शोधात

By admin | Updated: December 9, 2014 23:53 IST

वादळापूर्वीची शांतता : कार्यकर्त्यांत अस्वस्थता; अस्तित्व टिकविण्यासाठी जोरदार प्रयत्न

अशोक पाटील -इस्लामपूर -पंधरा वर्षांनंतर मंत्रीपदाच्या खुर्चीवरून पायउतार व्हावे लागलेले राष्ट्रवादीचे वनजदार नेते आमदार जयंत पाटील यांची सध्या राजकीय कोंडी झाली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांत अस्वस्थता आहे. जयंतराव वरवर शांत दिसत असले तरी, अस्तित्व टिकविण्यासाठी त्यांचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत. त्यांनी राष्ट्रवादीला धक्का देण्याची तयारी केल्याची चर्चा एकीकडे आहे, तर दुसरीकडे याच पक्षात राहून स्वत:च्या गटाची मजबूत बांधणी करण्यासाठी त्यांनी कंबर कसल्याचे बोलले जात आहे.सध्या जयंत पाटील यांनी आफ्रिकेत भाडेतत्त्वावर घेतलेल्या जमिनी विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. राज्यात भाजपचे सरकार आल्याने ते राजकीय कोंडीत सापडले आहेत. कारण जिल्हा बँकेतील गैरव्यवहारासारखे जिल्ह्यातील अनेक प्रश्न चव्हाट्यावर येऊ लागले असून, त्या प्रश्नांवर विधानसभेत त्यांना सामोरे जावे लागणार आहे. पाटील यांनी मंत्रिपदाच्या काळात इस्लामपूर व परिसरात कार्यकर्त्यांना गारमेंट उद्योग उभे करण्यास पाठबळ दिले, परंतु हा उद्योग सध्या अडचणीत सापडला आहे. पाटील यांच्या प्रयत्नातून आलेल्या पेठनाक्यावरील खासगी प्रकल्पात धोक्याची घंटा वाजू लागली आहे. तेथील कामगारांचे प्रश्न जटिल बनू लागले आहेत. तेथे मतदारसंघातील हजारो महिलांच्या हाताला काम मिळाले होते, परंतु पगाराच्या प्रश्नावरून त्यातील अनेकांनी काम बंद केले आहे. परिणामी मजुरांची संख्या रोडावल्याने हा उद्योग अडचणीत येण्याची शक्यता आहे.राजारामबापू उद्योग समूहातील राजारामबापू बँक, दूध संघ आणि शिक्षण संस्था वगळता उर्वरित सहकारी संस्था चालविण्यासाठी पाटील यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. मंत्रीपद असताना त्यांनी या संस्थांसाठी विविध योजनांतून निधी मिळवला होता. आता मंत्रीपद नसल्याने संस्था चालविणे आव्हान ठरणार आहे. याच गोष्टींचा विचार केला तर आगामी काळात राजकीय धोरणांमध्ये त्यांनी आश्चर्यकारक बदल केले तर आश्चर्य वाटणार नाही. जयंत पाटील गेले काही दिवस परदेश दौऱ्यावर होते. सध्या ते हिवाळी अधिवेशनात व्यस्त आहेत. त्यानंतर मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्त्यांशी विचारविनिमय करून संस्थात्मक बांधणीसह राष्ट्रवादीला भक्कम करणे अथवा इतर निर्णय घेणे याबद्दल बैठक निश्चित करण्यात आली आहे.- बी. के. पाटील, अध्यक्ष, वाळवा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस.राजकीय भूकंप होण्याची चिन्हे...इस्लामपूर व आष्टा शहरांतील विकासाच्या योजना प्रलंबित आहेत. यासाठी विविध योजनांतून निधी मिळविण्यासाठी पाटील यांचे प्रयत्न राहतील, परंतु मंत्रीपद नसल्याने त्यात अडथळेही येणार आहेत. या संकटांना तोंड देण्यासाठी सध्या पाटील यांनी शांत राहणे पसंत केले आहे. मात्र पाटील यांची कारकीर्द पाहता, ही वादळापूर्वीची शांतता असून, भविष्यात राजकीय भूकंप करून धक्का देण्याची तयारी त्यांनी चालवली असल्याचे संकेत मिळत आहेत.