शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
3
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
4
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
5
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
6
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
7
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
8
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
9
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
10
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
11
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
12
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
13
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
14
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
15
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
16
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
17
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
18
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
19
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
20
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर

घरांचे अक्षांश-रेखांश शोधण्यासाठी धावाधाव!

By admin | Updated: August 15, 2015 00:43 IST

शिक्षण विभागातील एका आदेशाने शिक्षकांची चांगलीच दमछाक झाली असून, स्वत:च्या घराचे अक्षांश-रेखांश शोधण्यासाठी त्यांची धावाधाव सुरू आहे. संगणकीकरणाच्या नावाखाली

- संजय पाठक,  नाशिकशिक्षण विभागातील एका आदेशाने शिक्षकांची चांगलीच दमछाक झाली असून, स्वत:च्या घराचे अक्षांश-रेखांश शोधण्यासाठी त्यांची धावाधाव सुरू आहे. संगणकीकरणाच्या नावाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची व्यक्तिगत आणि कौटुंबिक माहिती मागविताना शिक्षण खात्याने त्यांच्या घरांचे नकाशे आणि अक्षांश-रेखांश यांची माहिती दोनच दिवसांत सादर करण्यास सांगितले आहे.गेल्या वर्षी चोक्कलिंगम शिक्षण आयुक्त झाल्यानंतर त्यांनी ‘यूएसएडी कोड’द्वारे मोबाइलमध्ये फोटो काढून विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती कळविण्याचा अजब फतवा काढला, त्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. त्याचे पुढे काय झाले, हे कोणास ठावुक नाही. तत्पूर्वी दोन शाळांमधील अंतर मोजण्यासाठी अ‍ॅँड्रॉइड फोनचा वापर करण्यासाठी मुख्याध्यापकांना सक्ती करण्यात आली होती. अँड्रॉइड फोन असणाऱ्यांनाच यासंदर्भातील प्रशिक्षणासाठी पाठविण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानंतर ‘शालार्थ’ प्रणालीने गोंधळ घातला, तो मिटत नाही तोच आता ‘सरल’ नावाच्या आणखी एक प्रणालीने शाळांमध्ये खळबळ उडाली आहे.कोणतीही माहिती आॅनलाइन आणि तीसुद्धा सायबर कॅफे व्यावसायिकांच्या मदतीशिवायच भरण्याचा फतवा काढण्यात आला आहे. गुरुवारी ‘सरल’च्या माध्यमातून सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांची माहिती संकलित करून देण्याच्या आदेशाने सारेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी दैनंदिन काम सोडून आदेशाच्या अंमलबजावणीत गुंतले आहेत.कर्मचाऱ्याची व्यक्तिगत माहिती ठीक आहे; परंतु कुटुंबातील सर्व व्यक्तींची माहिती- जन्मतारीख, उंची, वजन, प्रत्येकाचे आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, नोकरी करणारे- न करणारे, सदस्यांच्या शरीरावरील ओळख खुणा, वारसददार, घराचे नकाशे आणि अक्षांश-रेखांश अशी सर्वच माहिती मागविण्यात आली आहे. प्रत्येकाचे आधार व मतदार ओळखपत्र स्कॅन करून जोडावे लागणार आहे. अनेक शिक्षक भाड्याच्या खोलीत राहतात. त्यांनी घराचे नकाशे आणि अक्षांश-रेखांश कसे द्यायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.वेतन अजून ‘आॅफ-लाइन’च...‘सरल’ प्रणालीचा वापर करून दरमहा १ तारखेलाच वेतन करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. प्रत्यक्षात गेल्या वर्षभरापासून आॅफलाइनच आणि अनियमित वेतन मिळत आहे. गेल्या वर्षी पटसंख्या पूर्ण झाल्यानंतर आणि रोज आॅनलाइन पद्धतीने शासनाला पटसंख्या कळविली जात असताना, अद्यापही कर्मचाऱ्यांंना अर्धवेळ ठेवले आहे अनेकांचे वेतन वेळेत होत नाही. त्याकडे लक्ष देण्याऐवजी रोज नवे फतवे निघत आहेत, अशी भावना शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.