शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
2
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
3
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
4
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
5
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
6
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
7
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
8
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
9
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
10
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
11
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
12
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
13
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
14
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
15
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
16
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
17
Operation Sindoor Live Updates: भारतीय सैन्यदलांनी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर श्रीनगरमधील लाल चौकातही जल्लोष
18
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
19
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
20
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया

घरांचे अक्षांश-रेखांश शोधण्यासाठी धावाधाव!

By admin | Updated: August 15, 2015 00:43 IST

शिक्षण विभागातील एका आदेशाने शिक्षकांची चांगलीच दमछाक झाली असून, स्वत:च्या घराचे अक्षांश-रेखांश शोधण्यासाठी त्यांची धावाधाव सुरू आहे. संगणकीकरणाच्या नावाखाली

- संजय पाठक,  नाशिकशिक्षण विभागातील एका आदेशाने शिक्षकांची चांगलीच दमछाक झाली असून, स्वत:च्या घराचे अक्षांश-रेखांश शोधण्यासाठी त्यांची धावाधाव सुरू आहे. संगणकीकरणाच्या नावाखाली सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची व्यक्तिगत आणि कौटुंबिक माहिती मागविताना शिक्षण खात्याने त्यांच्या घरांचे नकाशे आणि अक्षांश-रेखांश यांची माहिती दोनच दिवसांत सादर करण्यास सांगितले आहे.गेल्या वर्षी चोक्कलिंगम शिक्षण आयुक्त झाल्यानंतर त्यांनी ‘यूएसएडी कोड’द्वारे मोबाइलमध्ये फोटो काढून विद्यार्थी व शिक्षकांची उपस्थिती कळविण्याचा अजब फतवा काढला, त्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. त्याचे पुढे काय झाले, हे कोणास ठावुक नाही. तत्पूर्वी दोन शाळांमधील अंतर मोजण्यासाठी अ‍ॅँड्रॉइड फोनचा वापर करण्यासाठी मुख्याध्यापकांना सक्ती करण्यात आली होती. अँड्रॉइड फोन असणाऱ्यांनाच यासंदर्भातील प्रशिक्षणासाठी पाठविण्याची सूचना करण्यात आली होती. त्यानंतर ‘शालार्थ’ प्रणालीने गोंधळ घातला, तो मिटत नाही तोच आता ‘सरल’ नावाच्या आणखी एक प्रणालीने शाळांमध्ये खळबळ उडाली आहे.कोणतीही माहिती आॅनलाइन आणि तीसुद्धा सायबर कॅफे व्यावसायिकांच्या मदतीशिवायच भरण्याचा फतवा काढण्यात आला आहे. गुरुवारी ‘सरल’च्या माध्यमातून सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व त्यांच्या कुटुंबांची माहिती संकलित करून देण्याच्या आदेशाने सारेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी दैनंदिन काम सोडून आदेशाच्या अंमलबजावणीत गुंतले आहेत.कर्मचाऱ्याची व्यक्तिगत माहिती ठीक आहे; परंतु कुटुंबातील सर्व व्यक्तींची माहिती- जन्मतारीख, उंची, वजन, प्रत्येकाचे आधारकार्ड, मतदार ओळखपत्र, नोकरी करणारे- न करणारे, सदस्यांच्या शरीरावरील ओळख खुणा, वारसददार, घराचे नकाशे आणि अक्षांश-रेखांश अशी सर्वच माहिती मागविण्यात आली आहे. प्रत्येकाचे आधार व मतदार ओळखपत्र स्कॅन करून जोडावे लागणार आहे. अनेक शिक्षक भाड्याच्या खोलीत राहतात. त्यांनी घराचे नकाशे आणि अक्षांश-रेखांश कसे द्यायचे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.वेतन अजून ‘आॅफ-लाइन’च...‘सरल’ प्रणालीचा वापर करून दरमहा १ तारखेलाच वेतन करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. प्रत्यक्षात गेल्या वर्षभरापासून आॅफलाइनच आणि अनियमित वेतन मिळत आहे. गेल्या वर्षी पटसंख्या पूर्ण झाल्यानंतर आणि रोज आॅनलाइन पद्धतीने शासनाला पटसंख्या कळविली जात असताना, अद्यापही कर्मचाऱ्यांंना अर्धवेळ ठेवले आहे अनेकांचे वेतन वेळेत होत नाही. त्याकडे लक्ष देण्याऐवजी रोज नवे फतवे निघत आहेत, अशी भावना शिक्षकांमधून व्यक्त होत आहे.