शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

नऊ वर्षांत शाळांचा ‘मेक ओव्हर’

By admin | Updated: January 12, 2015 01:07 IST

गेल्या नऊ वर्षांत राज्यात शाळांमधील पायाभूत सोयींचे प्रमाण जवळपास दुपटीने वाढले आहे. राज्यांतील ९७ टक्के शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी वेगळे स्वच्छतागृह असून अर्ध्याहून अधिक शाळांमध्ये

महिला स्वच्छतागृहाचे प्रमाण ४७ वरून ९७ टक्क्यांवरयोगेश पांडे - नागपूरगेल्या नऊ वर्षांत राज्यात शाळांमधील पायाभूत सोयींचे प्रमाण जवळपास दुपटीने वाढले आहे. राज्यांतील ९७ टक्के शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी वेगळे स्वच्छतागृह असून अर्ध्याहून अधिक शाळांमध्ये संगणक उपलब्ध आहे. डीआयएसई’तर्फे (डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन) जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. विशेषत: देशपातळीवर ‘आरटीई’ (राईट टू एज्युकेशन) कायदा लागू झाल्यापासून शाळांमध्ये नियमांची अंमलबजावणी करण्याकडे भर दिसून येत आहे.केंद्र शासनाच्या ‘एनयूईपीए’कडून (नॅशनल युनिव्हर्सिटी आॅफ एज्युकेशनल प्लॅनिंग अ‍ॅन्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेशन) देशपातळीवरील निरनिराळ््या शाळांकडून विविध बाबींसंदर्भात माहिती गोळा करण्यात आली. महाराष्ट्रातील ३५ जिल्ह्यांमधील ९६ हजार १७९ शाळांचा यात समावेश होता. ‘डीआयएसई’तर्फे २००५-०६ ते २०१३-१४ या कालावधीतील आकडेवारी नुकतीच जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार २००५-०६ मध्ये राज्यातील ४७.५ टक्के शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह होते. ९ वर्षांत हेच प्रमाण दुपटीहून वाढले असून २०१३-१४ मध्ये ही संख्या ९७.६ टक्क्यांवर गेली आहे. देशपातळीवर हीच टक्केवारी ८४.६ टक्के इतकी आहे. शिवाय राज्यातील ९९.३ टक्के शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध आहे. नऊ वर्षांपूर्वी हीच टक्केवारी ८२.६ टक्के इतकी होती. शाळा होताहेत ‘हायटेक’जगभरात ‘ई-लर्निंग’चे प्रमाण वाढीस लागलेले असताना राज्यातील शाळांमध्येदेखील संगणक साक्षरतेवर भर देण्यात येत आहे. २००५-०६ मध्ये राज्यातील केवळ २३.१ टक्के शाळांमध्ये संगणक उपलब्ध होते. परंतु नऊ वर्षांत हे प्रमाण दुपटीने वाढून ५०.६ टक्के झाले आहे. देशामध्ये हेच प्रमाण अवघे २३.३ टक्के इतकेच आहे.विशेष म्हणजे १४ टक्के उच्च प्राथमिक शाळांमध्ये संगणकाच्या साहाय्याने शिक्षण देणाऱ्या ‘लर्निंग लॅब’ची उभारणी करण्यात आली आहे.