शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

उन्हाचा तडाखा ओसरला; उकाडा कायम

By admin | Updated: April 4, 2017 05:39 IST

गुजरातमध्ये निर्माण झालेल्या प्रतिचक्रीवादळाचा परिणाम म्हणून मागील आठवड्यात राज्यासह मुंबईच्या कमाल तापमानात वाढ झाली

मुंबई : गुजरातमध्ये निर्माण झालेल्या प्रतिचक्रीवादळाचा परिणाम म्हणून मागील आठवड्यात राज्यासह मुंबईच्या कमाल तापमानात वाढ झाली होती. राज्यातल्या प्रमुख शहरांचे कमाल तापमान ४० ते ४२ अंशांच्या आसपास नोंदवण्यात येत होते. तर मुंबईचे कमाल तापमान ३८ अंश नोंदवण्यात येत होते. परिणामी, मुंबईकरांच्या अंगाची लाहीलाही झाली होती. मात्र, आता वातावरणात झालेल्या बदलामुळे मुंबईचे कमाल तापमान ३८ हून ३४ आणि ३४ हून ३२ अंशांवर घसरल्याने उन्हाचा तडाखा कमी झाला, परंतु उकाडा कायम आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात हवामान कोरडे नोंद झाले आहे. विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. संपूर्ण मराठवाड्यात, कोकण-गोवा व मध्य महाराष्ट्राच्या काही भागात तर विदर्भाच्या उर्वरित भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते. मागील आठवड्यात मुंबईचे कमाल तापमान ३८ अंश नोंद झाले. त्यानंतर वातावरणातील बदल आणि ढगाळ हवामानामुळे कमाल तापमान ३४ अंशांवर घसरले. परिणामी उन्हाचा तडाखा कमी तर उकाड्यात वाढ झाली. सद्य:स्थितीत मुंबईचे कमाल तापमान ३२ अंशांच्या आसपास आहे. उन्हाचा तडाखा काही अंशी कमी झाला असून, उकाडा कायम आहे. मंगळवारसह बुधवारी कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, २२ अंशांच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला. (प्रतिनिधी)