शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
5
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
6
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
7
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
8
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
9
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
10
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
11
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
12
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
13
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
15
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
16
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
17
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
18
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
19
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
20
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!

युतीच्या तणावात ‘जान बचाओ’ !

By admin | Updated: April 7, 2016 02:57 IST

राज्यातील भाजपा-शिवसेना या दोन सत्ताधारी पक्षांतील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला असून एकमेकांना पाण्यात पाहण्याची एकही संधी सोडली जात नाही. मात्र, युतीतील या तणावाचा फटका मुंबई महापालिकेने तयार

मुंबई : राज्यातील भाजपा-शिवसेना या दोन सत्ताधारी पक्षांतील तणाव दिवसेंदिवस वाढत चालला असून एकमेकांना पाण्यात पाहण्याची एकही संधी सोडली जात नाही. मात्र, युतीतील या तणावाचा फटका मुंबई महापालिकेने तयार केलेल्या ‘जान बचाओ’ या लघुपटास बसला आहे. विशेष म्हणजे, हा लघुपट उच्च रक्तदाब आणि तणावपूर्ण जीवनशैलीवर प्रबोधन करणारा आहे!स्वतंत्र विदर्भाची मागणी आणि नाशिकमध्ये भाजपाच्या महिला अध्यक्षांचा उधळलेला कार्यक्रम, यावरून युतीच्या नेतृत्वात बेबनाव धुमसत आहे. त्यात देवनार डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीने भडका उडाला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपावर शेलक्या शब्दांत केलेल्या टीकेमुळे सत्ताधारी युतीतील तणाव अधिकाधिक ठळक होत आहे. मुंबईतील नागरिकांमध्ये वाढत चाललेले रक्तदाबाचे प्रमाण आणि तणावपूर्ण जीवनशैलीवर प्रबोधन करण्यासाठी पालिकेनेच तयार केलेल्या लघुपटास पडद्यावर येण्यासाठी युतीतील बेदिलीमुळे उशीर होत आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने ‘जान बचाओ’ ही विशेष मोहीम मुंबई महापालिकेतर्फे हाती घेण्यात आली आहे. रक्तदाबाच्या वाढत्या प्रमाणामुळे चिंतित होऊन पालिकेने त्यावर चार मिनिटांची फिल्म बनविण्याचा निर्णय घेतला. सामाजिक कार्य म्हणून दिग्दर्शक राजकुमार हिराणी आणि अभिनेता अक्षय कुमार यांनी त्यासाठी विनामोबदला योगदानही दिले. ही फिल्म ४ एप्रिल रोजी ताज लँड्स एन्ड हॉटेलमध्ये पडद्यावरही येणार होती; मात्र अचानक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वेळ नसल्याने या लघुपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. आता मे महिन्यामध्ये ही फिल्म प्रसारित होणार आहे. लघुपटाच्या प्रदर्शनासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुखांना वेळ नसल्याचे कारण पुढे केले असले, तरी दोन्ही नेते हेतूपुरस्सर एकाच व्यासपीठावर येण्याचे टाळत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.