शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
5
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
6
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
7
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
8
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
9
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
10
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
11
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
12
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
13
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
14
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
15
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
16
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
17
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
18
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
19
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
20
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट

सातारच्या कॅमेरामननं केला ‘ख्वाडा’ पार!

By admin | Updated: October 24, 2015 23:56 IST

साध्या कॅमेऱ्याची कमाल : मेंढपाळांच्या जीवनावर आधारित चित्रपटात वीरधवलने भरले निसर्गाचे रंग

प्रदीप यादव ल्ल सातारा असं म्हटलं जातं की लेखक पटकथा लिहिताना त्याच्या मनात कथापट चित्ररूपानं सरकतो तर दिग्दर्शक ती कथा पडद्यावर दृश्यरूपात कशी मांडावी, याची दिशा ठरवतो; पण लेखक आणि दिग्दर्शकानं पाहिलेल्या स्वप्नाला मूर्तरूप देण्याचं खरं कौशल्य असतं ते कॅमेरामनचं. कोणत्याही प्रकारचे उच्च दर्जाचे तंत्रज्ञान न वापरता एका साध्या एचडी कॅमेऱ्यातून पाच राष्ट्रीय पुरस्कारांसह विविध सोळा पुरस्कारांनी गौरविलेला ‘ख्वाडा’ हा मराठी चित्रपट चित्रित करण्याचं शिवधनुष्य पेललंय साताऱ्यातील कॅमेरामन वीरधवल पाटील याने. नवख्या कलाकारांबरोबर काम करत असतानाही धनगरांच्या रखरखीत आयुष्यात अन् रांगड्या जीवनशैलीत आपल्या कॅमेऱ्यातून वास्तववादी निसर्गाचे रंग भरणाऱ्या वीरधवलने चित्रपटनिर्मितीतले अनुभव ‘लोकमत’जवळ दिलखुलासपणे व्यक्त केले. मेंढपाळाचं आयुष्य विंचवाच्या बिऱ्हाडासारखं. सगळ्या लवाजम्यासह मजलदरमजल करत रानोमाळ भटकायचं. दिवसभर मेढरं वळायची. रात्र होईल तिथं पाल टाकायचं. जमिनीला पाठ टेकवून आकाश पांघरायचं अन् उद्याचं स्वप्न रंगवत उजाड माळावर निजायचं, असे असंख्य खोडे हसत-हसत पार करत जीवन जगणाऱ्या मेंढपाळांच्या जीवनावर आधारित भाऊराव कऱ्हाडे या तरुणानं ‘ख्वाडा’ हा मराठी चित्रपट बनविला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. ‘ख्वाडा’ या बहुचर्चित चित्रपटाचा कॅमेरामन म्हणून अनुभव कसा होता, याबद्दल विचारले असता वीरधवल म्हणाला, ‘मातीशी नातं सांगणाऱ्या कलाकारांनी एकत्र येऊन बनविलेली ही एक रांगडी कलाकृती आहे. अभिनेता शशांक शेंडे आणि अनिल नगरकर हे दोन कलाकार सोडले तर सर्वच जण नवखे आहेत. ज्यांना अभिनय म्हणजे काय आणि कॅमेरा काय असतो, हे माहीत नाही अशा लोकांबरोबरच काम करताना अनंत अडचणी आल्या; पण अशा वेळी माझा पूर्वानुभव उपयोगी पडला. कलाकारांना जास्त सूचना देण्यापेक्षा कॅमेऱ्याचा अँगल बदलून दृश्ये चित्रित केली. ‘ख्वाडा’साठी उच्च तंत्रज्ञान वापरणेही गरजेचे नव्हते. कारण हा चित्रपट रांगडा आहे. रांगडेपण, त्यांच्या जगण्यातली वास्तवता चित्रित करताना नैसर्गिक वातावरणाचाच जास्त वापर करून घेतला.’  

फायटिंगचा सीन चांगलाच लक्षात! ‘ख्वाडा’मध्ये बहुंशी कलाकार नवखे आहेत; एवढेच काय पण घोडेसुध्दा रानटीच होते. फायटिंगचा सीन शूट करताना एका कलाकाराने कुऱ्हाडीचा वार थेट कॅमेऱ्याच्या तोंडावरच केला. कुऱ्हाड नकली होती म्हणून ‘सगळंच’ बचावलं. शूटिंग करताना घोडे सरळ कॅमेऱ्याच्या दिशेने धावत यायचे. अशावेळेला कॅमेरा सांभाळून दृश्य चित्रित करण्याची कसरत करावी लागे, असे वीरधवलने सांगितले.  

पुरस्कारप्राप्त कलाकृती साकारण्यात अनुभव कामी... चित्रीकरणासाठी किती किमतीचा किंवा किती उच्च दर्जाचा कॅमेरा वापरला हे महत्त्वाचे नसते. त्यामध्ये कौशल्य असते ते कॅमेरामनचे. ‘ख्वाडा’च्या बाबतीतही असेच काहीसे घडले आहे. साध्या एचडी कॅमेऱ्याने हा चित्रपट चित्रित केला आहे. ‘हाय लाईट कंट्रोल’ होत नाही. त्यात ख्वाडाचे संपूर्ण चित्रीकरण ‘आऊटडोअर’ झाले आहे. माळरान, रखरखीत ऊन अशा वातावरणात चित्रीकरण करताना कॅमेऱ्यात जिथे जास्त प्रकाश दिसायचा त्या ठिकाणी एखादं मेंढरू नाहीतर घोडा उभा करून दृश्ये चित्रित केली आहेत. उपलब्ध साधनांचाच जास्त वापर केला आहे.  

अनेक चित्रपट, मालिकांसाठी सहायक कॅमेरामन म्हणून काम केलं. अत्याधुनिक कॅमेरे हाताळले. माझ्या नजरेतून साकारलेला ‘ख्वाडा’ हा माझा पहिलाच चित्रपट आहे. एवढी नितांत सुंदर कलाकृती आपल्या हातून निर्माण झाल्याचं खूप समाधान वाटतं. या चित्रपटाला अनेक पुरस्कारांनी गौरविलं आहेतच; पण प्रेक्षकांची पसंती हाच सर्वात मोठा पुरस्कार आहे, असे मला वाटते. - वीरधवल पाटील, कॅमेरामन  

रखरखीत ऊनही डोळ्यांना भावतं! धनगरांच्या जीवनावर आधारित या चित्रपटात ‘कलरफुल सीन’ कसे असतील? त्यामुळे जे काही आहे ते फक्त नैसर्गिक. डोंगर, तलाव, मेंढपाळांचे रंगीत फेटे, मेंढ्यांचा तळ, पालं, रखरखीत ऊन, मोकळं आकाश अन् जत्रेतला गुलाल अन् भंडारा याचे चित्रण अशा प्रकारे केले आहे ज्यामुळेच हा चित्रपट अधिक जिवंत झाला आहे. यामध्ये कुठेही ‘मिक्सिंग’ केलेले नाही. रखरखीत ऊनही डोळ्यांना भावतं, असे वीरधवल म्हणाला.