शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

सरपंच थेट जनतेतून!

By admin | Updated: April 27, 2017 02:36 IST

राज्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच थेट जनतेतून निवडून देण्याचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाने तयार केला असून लवकरच तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी येणार आहे.

यदु जोशी / मुंबईराज्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच थेट जनतेतून निवडून देण्याचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाने तयार केला असून लवकरच तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी येणार आहे. येत्या सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या आठ हजार ग्राम पंचायतींच्या निवडणुकीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आणि त्याचा मोठा फायदा भाजपाला झाला. पक्षाचे सर्वाधिक नगराध्यक्ष विजयी झाले. सरपंचांचीही निवडणूक थेट जनतेतून व्हावी, असा आग्रह ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धरला होता. नगरपालिकांमधील भाजपाच्या यशाने आता ग्राम पंचायतींबाबतही तसाच निर्णय करण्याच्या कामाला गती आली आहे. राज्य मंत्रिमंडळाची येत्या एक महिन्यात सदर प्रस्तावाला मंजुरी मिळविली जाईल व विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्या संबंधीचे विधेयक पारित करून सप्टेंबर-आॅक्टोबरमधील निवडणुकीपासून त्याची अंमलबजावणी करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. उपसरपंचांची निवड मात्र ग्राम पंचायतीच्या सदस्यांमधून केली जाईल. तीन चतुर्थांश बहुमतानेच सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर होऊ शकेल, असा प्रस्ताव आहे.शिक्षणाची अट असावी काय? थेट जनतेतून सरपंच व्हायचे तर काही शैक्षणिक अट असावी काय, या बाबत ग्राम विकास विभाग विचार करीत आहे. निरक्षर माणसाला लोकसभा, विधानसभेची निवडणूक लढता येते तर सरपंचांसाठी अशी अट ठेवणे योग्य होईल का, ते घटनात्मक तरतुदीच्या विसंगत ठरेल का यावर मंथन-चिंतन सुरू आहे. १४ व्या वित्त आयोगापासून ग्राम विकासासाठीचा केंद्र व राज्य सरकारचा निधी आज थेट ग्राम पंचायतींना मिळतो. या शिवाय सरपंचांचे अधिकार वाढविले तर सरपंच किमान काही इयत्ता तरी शिकलेले असावेत हा विचार समोर आला आहे.