शहरं
Join us  
Trending Stories
1
या देशामध्ये राष्ट्रपतींच्या हत्येचा प्रयत्न, जमावाने कारवर फेकले दगड, केला गोळीबार
2
मनोज जरांगे राहुल गांधींना म्हणाले 'दिल्लीचा लाल्या', काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया, पाटलांना दिलं असं नाव  
3
IPS पूरन कुमार यांच्या पत्नीचे गंभीर आरोप, हरियाणाचे DGP आणि SPविरोधात दिली तक्रार   
4
VIDEO: पंतप्रधान मोदी नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनावेळी मराठीत काय बोलले? ऐका...
5
थायलंडमध्ये मसाज घेण्यासाठी जाणं होणार महाग, जाणून घ्यावा हा नियम, अन्यथा ऐनवेळी बसेल भुर्दंड   
6
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
7
रोहित शर्मा पुन्हा बनला कर्णधार, मिळाला नवा 'ओपनिंग पार्टनर'; Playing XI मध्ये आणखी कोण?
8
नवी मुंबई विमानतळाचा उदघाटन सोहळा मंत्री राममोहन नायडूंनी गाजवला, केलं मराठीतून भाषण, म्हणाले... 
9
AUS W vs PAK W : वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलिया टॉपला; पराभवाच्या हॅटट्रिकसह पाकिस्तान रसातळाला!
10
VIDEO: शत्रूवरही अशी वेळ नको रे देवा... नवरदेवाची भर लग्नमंडपात होणाऱ्या बायकोसमोर 'फजिती'
11
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
12
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
13
‘मेस्मा’ लागू, सात वीज कर्मचारी संघटनांचा संप बेकायदेशीर
14
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
15
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
16
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
17
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
18
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
19
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
20
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”

सरपंच थेट जनतेतून!

By admin | Updated: April 27, 2017 02:36 IST

राज्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच थेट जनतेतून निवडून देण्याचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाने तयार केला असून लवकरच तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी येणार आहे.

यदु जोशी / मुंबईराज्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच थेट जनतेतून निवडून देण्याचा प्रस्ताव ग्रामविकास विभागाने तयार केला असून लवकरच तो मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी येणार आहे. येत्या सप्टेंबर-आॅक्टोबरमध्ये होणाऱ्या आठ हजार ग्राम पंचायतींच्या निवडणुकीपासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीस सरकारने घेतला आणि त्याचा मोठा फायदा भाजपाला झाला. पक्षाचे सर्वाधिक नगराध्यक्ष विजयी झाले. सरपंचांचीही निवडणूक थेट जनतेतून व्हावी, असा आग्रह ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी धरला होता. नगरपालिकांमधील भाजपाच्या यशाने आता ग्राम पंचायतींबाबतही तसाच निर्णय करण्याच्या कामाला गती आली आहे. राज्य मंत्रिमंडळाची येत्या एक महिन्यात सदर प्रस्तावाला मंजुरी मिळविली जाईल व विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात त्या संबंधीचे विधेयक पारित करून सप्टेंबर-आॅक्टोबरमधील निवडणुकीपासून त्याची अंमलबजावणी करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. उपसरपंचांची निवड मात्र ग्राम पंचायतीच्या सदस्यांमधून केली जाईल. तीन चतुर्थांश बहुमतानेच सरपंचांविरुद्ध अविश्वास ठराव मंजूर होऊ शकेल, असा प्रस्ताव आहे.शिक्षणाची अट असावी काय? थेट जनतेतून सरपंच व्हायचे तर काही शैक्षणिक अट असावी काय, या बाबत ग्राम विकास विभाग विचार करीत आहे. निरक्षर माणसाला लोकसभा, विधानसभेची निवडणूक लढता येते तर सरपंचांसाठी अशी अट ठेवणे योग्य होईल का, ते घटनात्मक तरतुदीच्या विसंगत ठरेल का यावर मंथन-चिंतन सुरू आहे. १४ व्या वित्त आयोगापासून ग्राम विकासासाठीचा केंद्र व राज्य सरकारचा निधी आज थेट ग्राम पंचायतींना मिळतो. या शिवाय सरपंचांचे अधिकार वाढविले तर सरपंच किमान काही इयत्ता तरी शिकलेले असावेत हा विचार समोर आला आहे.