भार्इंदर : येथील शंकर नारायण महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे रविवारी झालेल्या वर्षा मॅरेथॉनमध्ये खोपोली येथील केएमसी महाविद्यालयाच्या संजय मारुती झाकणे याने मुलांच्या, तर कांदिवली येथील ठाकूर महाविद्यालयाच्या ऐश्वर्या मिश्रा हिने मुलींच्या गटात प्रथम क्रमांक पटकावला. वर्षा मॅरेथॉनचे यंदा आठवे वर्ष होते. या वेळी मुंबई विद्यापीठांतर्गत असलेल्या ५५६ महाविद्यालयांतील सुमारे १२ हजार विद्यार्थी सहभागी झाले होते. सकाळी ८ वाजता भाजपा प्रदेश प्रवक्ते माधव भंंडारी व मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांच्या हस्ते मॅरेथॉनला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. मुलींसाठी पाच किलोमीटर व मुलांसाठी ८ किलोमीटर अंतर निश्चित केले होते. स्पर्धेपूर्वी सहभागी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व पटवून देण्यासह त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्रांगणात मशाल ज्योत फिरवण्यात आली. ग्लोबल वॉर्मिंगमुळे जगात त्सुनामीसारख्या दुर्घटना घडल्या. जंगल व हिमनद्या नामशेष होत चालल्या आहेत. परिणामी, समुद्राची पातळी वाढत असून उष्णतेत वाढ होत आहे. या ग्लोबल वॉर्मिंगशी संबंधित असलेल्या संकटांना थोपवण्यासाठी हरितक्रांती हाच एकमेव उपाय आहे. या उद्देशानेच वर्षा मॅरेथॉन स्पर्धा होते, असे महाविद्यालयाचे प्रमुख रोहिदास पाटील यांनी सांगितले. आयुक्त गीते यांनी सहभागी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी महापौर गीता जैन, उपमहापौर प्रवीण पाटील, शिवसेनेचे युवासेना सचिव पूर्वेश सरनाईक, महाविद्यालयाचे सचिव महेश म्हात्रे, नगरसेविका कल्पना म्हात्रे, प्राचार्य डॉ. विष्णू यादव, अॅण्ड्रस डिसोझा उपस्थित होते. (प्रतिनिधी)>हरितक्रांतीचा दिला संदेशमुलांच्या गटात प्रथम क्रमांक संजय झाकणे, द्वितीय क्रमांक खोपोलीच्याच केएमसी महाविद्यालयाच्या जगदीश गावडे व तृतीय क्रमांक वसईच्या वर्तक महाविद्यालयातील जयेश गावरी याने पटकावला. मुलींच्या गटात प्रथम क्रमांक ऐश्वर्या मिश्रा, द्वितीय क्रमांक रिझवी महाविद्यालयातील श्वेता गावडे व तृतीय क्रमांक विरारच्या उत्कर्ष महाविद्यालयातील मयूरी सुतार हिने पटकावला.
संजय, ऐश्वर्या मिश्रा अव्वल
By admin | Updated: August 22, 2016 03:40 IST