शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीची लक्तरे दिल्लीच्या वेशीवर

By admin | Updated: April 30, 2015 00:25 IST

प्रदूषणाचा कहर : दमा आणि सीओपीडी रुग्णांमध्ये सात टक्क्यांनी वाढ--लोकमत विशेष

नरेंद्र रानडे - सांगलीघनकचरा व्यवस्थापनात हलगर्जीपणा, ई-कचऱ्याची समस्या, औद्योगिक वसाहतीतील प्रदूषणाकडे दुर्लक्ष आदी प्रमुख कारणांमुळे शहरातील प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अहवालात वायू प्रदूषणाचा स्तर वाढलेल्या शहरांमध्ये सांगलीचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी सांगलीच्या घनकचरा, नदी प्रदूषणाचा प्रश्नही दिल्लीपर्यंत गाजला. सांगलीच्या प्रदूषणाची लक्तरे दिल्लीच्या वेशीवर टांगली गेली तरी, त्याचे गांभीर्य प्रशासकीय पातळीवर दिसत नाही. महापालिका क्षेत्रात दररोज सुमारे ११० टन कचरा जमा होतो. सांगली जिल्हा सुधार समितीच्या सर्वेक्षणानुसार वीस टन कचरा हा प्लॅस्टिकमिश्रित असतो. वास्तविक या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्यानुसार विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. ओला, सुका तसेच प्लॅस्टिकमिश्रित कचरा एकत्रितरित्याच गोळा करण्यात येत आहे. काहीवेळा उपनगरांमधील कचरा कोंडाळ्यातच पेटविण्यात आल्याने वायुप्रदूषणात भर पडत आहे. ई-कचऱ्याचा प्रश्नदेखील गंभीर आहे.वाढत्या वायुप्रदूषणाने मागील काही महिन्यांपासून दमा आणि सीओपीडी (क्रॉनिक आॅपस्ट्रक्टीव्ह पलमोगरी डिसीज) रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. प्रदूषणाचा अहवाल गायबमहाराष्ट्र महापालिका, नगरपालिका अधिनियम १९९४ च्या कलम ६७ नुसार दरवर्षी वायू, जल आणि ध्वनी प्रदूषणाचा अहवाल तयार करून तो महासभेत मांडायचा असतो. तत्कालीन आयुक्त मिलिंद म्हैसकर यांच्या कालावधित २००४-०५ चा प्रदूषण अहवाल तयार करण्यात आला होता. त्यानंतर दहा वर्षे महापालिकेने हा अहवालच सादर केला नाही. आरोग्य धोक्यातसीओपीडी आजारात फुफुसाची कार्यक्षमता कमी होते. परिणामी रुग्णांमध्ये दम लागणे, सतत खोकला येणे, छातीतून घरघरणे आदी लक्षणे दिसून येतात. सध्या वाढत्या वायू प्रदूषणामुळे प्रामुख्याने ३५ ते ४० वयोगटातील रुग्णांमध्ये याचे प्रमाण वाढलेले दिसत आहे. कमाल मर्यादा ओलांडल्यामहापालिकेच्या २००४-०५ च्या अहवालात ध्वनी, वायू आणि जलप्रदूषणाने कमाल मर्यादा ओलांडल्याचे दिसून आले होते. शहरातील नागरी, औद्योगिक भागात तरंगणारे घटक, सल्फरडाय आॅक्साईड, नायट्रोजन आॅक्साईड यांचे प्रमाण कमाल मर्यादेपेक्षा दुप्पट झाले होते. गेल्या दहा वर्षांत यात मोठी भर पडली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळही याबाबत गाफील आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालणे हे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्य आहे. परंतु हे मंडळ केवळ नोटीसबहाद्दर म्हणूनच ओळखले जाते. मंडळ कार्यशील आहे, हे जनतेला दाखविण्यासाठी ‘कारवाई’ला नव्हे, तर संबंधितांना नोटीस पाठविण्यालाच प्राधान्य देण्यात येत आहे. - अ‍ॅड. अमित शिंदे, अध्यक्ष, सांगली जिल्हा सुधार समिती.वाढत्या वायुप्रदूषणामुळे तरुण वयातच सीओपीडी आणि दमा रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. रुग्णांनी तातडीने उपचार घेणे आवश्यक असून या आजारांपासून दूर राहण्यासाठी नियमित प्राणायम आणि शहरात फिरताना पूर्ण बंद असलेले हेल्मेट अथवा मास्क वापरणे आवश्यक आहे. - डॉ. अनिल मडके, छातीरोगतज्ज्ञ, सांगली.नागरिकांना स्वच्छ हवा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. प्रदूषण नियंत्रण विभागाने नियमानुसार प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. तसे होताना दिसत नसल्याने वायुप्रदूषणात भर पडत आहे. यामुळे प्रदूषण नियंत्रण कार्यालयाविरुध्द कारवाई होण्यासाठी प्रयत्नशील आहोत.- डॉ. ज्ञानचंद्र पाटील, अध्यक्ष, ग्राहक पंचायत सांगली.राज्यातील प्रदूषित अठरा शहरांमध्ये सांगलीचा समावेश असल्याचे समजले. परंतु संबंधितांनी यासाठी कोणता आधार घेतला आहे, हे समजू शकले नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळ आपले कार्य करीत असून नागरिकांनीही वायुप्रदूषण होऊ नये यासाठी जागरुक राहणे गरजेचे आहे.- जयवंत हजारे, उपप्रादेशिक अधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळ सांगली.