शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्करी समाजविघातक गुन्हा

By admin | Updated: October 13, 2016 05:31 IST

नद्यांच्या पात्रांतून वाळूची तस्करी करणे हा गुन्हा वैयक्तिक स्वरूपाचा नसून, ते सार्वजनिक सुव्यवस्थेस मारक ठरणारे दुष्कृत्य आहे, असा निर्वाळा देत,

मुंबई : नद्यांच्या पात्रांतून वाळूची तस्करी करणे हा गुन्हा वैयक्तिक स्वरूपाचा नसून, ते सार्वजनिक सुव्यवस्थेस मारक ठरणारे दुष्कृत्य आहे, असा निर्वाळा देत, मुंबई उच्च न्यायालयाने जळगाव जिल्ह्याच्या भादगाव तालुक्यातील एका वाळू तस्कराच्या स्थानबद्धतेवर शिक्कामोर्तब केले आहे.गिरणा नदीच्या पात्रातून वाळूची तस्करी करणे आणि ती करीत असताना गावकऱ्यांना दमदाटी व मारहाण करणे व प्रसंगी सरकारी अधिकाऱ्यांवरही हल्ला करणे अशा कारणांवरून जळगावच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी नीलेश ज्ञानेश्वर देसले याच्याविरुद्ध १६ मार्च रोजी स्थानबद्धता आदेश काढला होता. नीलेशचा मित्र हरीश पाटील याने याविरुद्ध केलेली रिट याचिका फेटाळताना न्या. विजया कापसे-ताहिलरामाणी व न्या. मृदुला भाटकर यांच्या खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्वाळा दिला.देसले यास पूर्वी फौजदारी गुन्ह्यांत रीतसर अटक झाली होती, परंतु स्थानिक न्यायालयाने त्यास जामिनावर सोडले. त्यानंतर, दोन साक्षीदारांनी नोंदविलेल्या ‘इन कॅमेरा’ जबानीच्या आधारे त्याच्यावर ही स्थानबद्धतेची कारवाई केली गेली. देसले गावकऱ्यांना कशी दमदाटी करतो, त्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांना रात्री त्यांच्या शेताला पाणी देण्यासाठी जाणेही कसे मुश्कील होते व देसले आणि त्याच्या माणसांनी एक-दोन वेळा सरकारी अधिकाऱ्यांवरही कसे हात उगारले, याची माहिती या साक्षीदारांनी दिली होती.देसले याच्या वतीने इतर मुद्द्यांखेरीज असाही मुद्दा मांडला गेला की, साक्षीदारांनी दिलेली जबानी वादासाठी खरी मानली, तरी तिचे स्वरूप व्यक्तिगत स्वरूपाचे आहे. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था बिघडल्याचे किंवा बिघडू शकेल, अशी परिस्थिती असल्याचे दिसत नाही. हे अमान्य करताना न्यायालयाने म्हटले की, या कृत्यांकडे एकाकीपणे पाहता येणार नाही. वाळू तस्करीचा एकूणच त्या भागातील पर्यावरण, शेती, पाणी इत्यादींवर होणारा दुष्परिणाम आणि गावकऱ्यांना दमदाटी व सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण यामुळे निर्माण होणारी दहशत याचा एकत्र विचार करता, देसले याची कृत्ये सार्वजनिक सुव्यवस्थेस मारक अशीच ठरतात.न्यायालय म्हणते की, सार्वजनिक सुव्यवस्था म्हणजे शांतता, सुरक्षा व समाजजीवन सुरळीतपणे चालणे. वाळू ही नदीपात्रामध्ये सहजपणे मिळणारी वस्तू असली, तरी तिचे जतन करणे स्थानिक लोकांच्या हितासाठी आवश्यक आहे. नदीपात्रांमधून बेसुमार वाळू काढणे व तिची तस्करी करणे याचे गंभीर परिणाम दिसून आलेले आहेत. अनिर्बंध वाळूउपशामुळे जलपातळी खालावते व त्यामुळे पिण्यासाठी, तसेच शेतीसाठी पाण्याच्या तुटवडा निर्माण होते. पर्यावरणाचा ऱ्हास होण्याखेरीज शेतकऱ्यांचे व स्थानिक नागरिकांचे आर्थिक नुकसानही होते. या सर्वाचा एकत्रित परिणाम सार्वजनिक सुव्यवस्था बिघडण्यात होतो. (विशेष प्रतिनिधी)