शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

वाळू तस्करी समाजविघातक गुन्हा

By admin | Updated: October 13, 2016 05:31 IST

नद्यांच्या पात्रांतून वाळूची तस्करी करणे हा गुन्हा वैयक्तिक स्वरूपाचा नसून, ते सार्वजनिक सुव्यवस्थेस मारक ठरणारे दुष्कृत्य आहे, असा निर्वाळा देत,

मुंबई : नद्यांच्या पात्रांतून वाळूची तस्करी करणे हा गुन्हा वैयक्तिक स्वरूपाचा नसून, ते सार्वजनिक सुव्यवस्थेस मारक ठरणारे दुष्कृत्य आहे, असा निर्वाळा देत, मुंबई उच्च न्यायालयाने जळगाव जिल्ह्याच्या भादगाव तालुक्यातील एका वाळू तस्कराच्या स्थानबद्धतेवर शिक्कामोर्तब केले आहे.गिरणा नदीच्या पात्रातून वाळूची तस्करी करणे आणि ती करीत असताना गावकऱ्यांना दमदाटी व मारहाण करणे व प्रसंगी सरकारी अधिकाऱ्यांवरही हल्ला करणे अशा कारणांवरून जळगावच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी नीलेश ज्ञानेश्वर देसले याच्याविरुद्ध १६ मार्च रोजी स्थानबद्धता आदेश काढला होता. नीलेशचा मित्र हरीश पाटील याने याविरुद्ध केलेली रिट याचिका फेटाळताना न्या. विजया कापसे-ताहिलरामाणी व न्या. मृदुला भाटकर यांच्या खंडपीठाने वरीलप्रमाणे निर्वाळा दिला.देसले यास पूर्वी फौजदारी गुन्ह्यांत रीतसर अटक झाली होती, परंतु स्थानिक न्यायालयाने त्यास जामिनावर सोडले. त्यानंतर, दोन साक्षीदारांनी नोंदविलेल्या ‘इन कॅमेरा’ जबानीच्या आधारे त्याच्यावर ही स्थानबद्धतेची कारवाई केली गेली. देसले गावकऱ्यांना कशी दमदाटी करतो, त्याच्या दहशतीमुळे शेतकऱ्यांना रात्री त्यांच्या शेताला पाणी देण्यासाठी जाणेही कसे मुश्कील होते व देसले आणि त्याच्या माणसांनी एक-दोन वेळा सरकारी अधिकाऱ्यांवरही कसे हात उगारले, याची माहिती या साक्षीदारांनी दिली होती.देसले याच्या वतीने इतर मुद्द्यांखेरीज असाही मुद्दा मांडला गेला की, साक्षीदारांनी दिलेली जबानी वादासाठी खरी मानली, तरी तिचे स्वरूप व्यक्तिगत स्वरूपाचे आहे. त्यामुळे सार्वजनिक सुव्यवस्था बिघडल्याचे किंवा बिघडू शकेल, अशी परिस्थिती असल्याचे दिसत नाही. हे अमान्य करताना न्यायालयाने म्हटले की, या कृत्यांकडे एकाकीपणे पाहता येणार नाही. वाळू तस्करीचा एकूणच त्या भागातील पर्यावरण, शेती, पाणी इत्यादींवर होणारा दुष्परिणाम आणि गावकऱ्यांना दमदाटी व सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण यामुळे निर्माण होणारी दहशत याचा एकत्र विचार करता, देसले याची कृत्ये सार्वजनिक सुव्यवस्थेस मारक अशीच ठरतात.न्यायालय म्हणते की, सार्वजनिक सुव्यवस्था म्हणजे शांतता, सुरक्षा व समाजजीवन सुरळीतपणे चालणे. वाळू ही नदीपात्रामध्ये सहजपणे मिळणारी वस्तू असली, तरी तिचे जतन करणे स्थानिक लोकांच्या हितासाठी आवश्यक आहे. नदीपात्रांमधून बेसुमार वाळू काढणे व तिची तस्करी करणे याचे गंभीर परिणाम दिसून आलेले आहेत. अनिर्बंध वाळूउपशामुळे जलपातळी खालावते व त्यामुळे पिण्यासाठी, तसेच शेतीसाठी पाण्याच्या तुटवडा निर्माण होते. पर्यावरणाचा ऱ्हास होण्याखेरीज शेतकऱ्यांचे व स्थानिक नागरिकांचे आर्थिक नुकसानही होते. या सर्वाचा एकत्रित परिणाम सार्वजनिक सुव्यवस्था बिघडण्यात होतो. (विशेष प्रतिनिधी)