शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

समृद्धी महामार्गासाठी पाचपट मोबदला

By admin | Updated: June 13, 2017 07:35 IST

विकास प्रकल्प वा अन्य कारणांसाठी भूसंपादन करताना रेडिरेकनरच्या चारपट रकमेइतका मोबदला द्यावा, असा केंद्र सरकारचा कायदा असताना राज्य शासनाने त्याच्या

- चक्रधर दळवी/यदु जोशी । लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : विकास प्रकल्प वा अन्य कारणांसाठी भूसंपादन करताना रेडिरेकनरच्या चारपट रकमेइतका मोबदला द्यावा, असा केंद्र सरकारचा कायदा असताना राज्य शासनाने त्याच्या एक पाऊल पुढे जात नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाचा पाचपट मोबदला देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील आजवरच्या कोणत्याही प्रकल्पापेक्षा हा मोबदला सर्वाधिक आहे. भूसंपादनाचा देशपातळीवरील कायदा डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना यूपीए सरकारच्या काळात झाला. या कायद्याचा आग्रह धरणाऱ्यांपैकी एक राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि तत्कालीन कृषी मंत्री शरद पवार हेदेखील होते. देशातील लाखो प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देणाऱ्या या कायद्याचे जोरदार स्वागत झाले. त्यातील तरतुदीपेक्षाही अधिकचा मोबदला समृद्धी महामार्गातील भूधारकांना दिला जाणार आहे. समृद्धी महामार्गासाठी भूसंपादनाकरता आंध्र प्रदेशातील अमरावतीसाठीचा ‘लँड पुलिंग’ फॉर्मूला महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने समृद्धी महामार्गाकरताही आणला तेव्हा शेतकऱ्यांकडून सुरुवातीला विरोध झाला. भूधारकांना समृद्धी महामार्गात मालकी/भागीदारी देण्याचे वचन सरकारने त्यात दिलेले होते. मात्र, यासंदर्भात साशंकता होती. मात्र, जमिनीच्या किमतीच्या (रेडिरेकनरनुसार) पाच पट मोबदला देण्याची भूमिका शासनाने घेतली आणि त्यास मोठा प्रतिसाद मिळाला. आता मोबदला कधी मिळणार हा औत्सुक्याचा विषय आहे. ‘आम्हाला उत्तम मोबदला मिळेल की नाही ही भूधारकांची चिंता तब्बल पाच पट मोबदला देत शासनाने दूर करण्याचा जोरकस प्रयत्न केला आहे. हा महामार्ग म्हणजे वर्षानुवर्षे मागासलेपणाचा शाप माथ्यावर असलेल्या विदर्भ आणि मराठवाड्यासाठी आणि कृषी-उद्योग क्षेत्रात प्रचंड क्षमता व शक्यता असलेल्या उत्तर महाराष्ट्रासाठीही ‘गेम चेंजर’ ठरू शकेल असा हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ आहे. मात्र तो प्रकल्पग्रस्तांसह सर्वांचाच ‘आपला’ प्रकल्प व्हावा यासाठी सर्वांना विश्वासात घेण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी सुरुवातीपासूनच घेतली आहे. या महामार्गाशी संबंधित विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी थेट जनतेशी संवाद साधत तब्बल १५०० बैठकी घेऊन शंकानिरसन केले आहे. ‘समृद्धी’साठी कुठेही जबरदस्तीने, किंवा कमी मोबदल्यात भूसंपादन करण्याची भूमिका शासनाने घेतलेली नाही. छोट्या, मोठ्या गावांतून हा महामार्ग जात नाही. त्यामुळे वस्त्या पाडापाडीचाही प्रश्न येत नाही. धरण, राखीव प्रकल्प यांना बाधा न पोहोचविता या महामार्गाची रचना करण्यात आली आहे. आता प्रश्न आहे तो मराठवाडा, विदर्भाला विकासाच्या मार्गावर नेणाऱ्या इच्छाशक्तीचा. ही इच्छाशक्तीच होणाऱ्या किरकोळ विरोधाला मोडीत काढत संपूर्ण राज्याला गतिमान विकासाच्या एका सूत्रात बांधेल, असे अत्यंत आशादायी चित्र आज निर्माण झाले आहे. तेव्हा विरोध कुठे होता?मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेसाठी भूसंपादन करण्यात आले आणि त्याचा पुणे व परिसराला औद्योगिक विकासासाठी मोठा फायदा झाला. कोल्हापूरपर्यंत आठ पदरी रस्ता होतानाही पश्चिम महाराष्ट्रातील नेतृत्वाने विरोध केल्याचे स्मरत नाही.या दोन्हींचा पश्चिम महाराष्ट्राच्या गतिमान औद्योगिक विकासाला मोठा फायदा झाला. तेव्हा कोणी विरोध केला नाही. समृद्धी महामार्गामुळे हाच फायदा आता विदर्भ आणि मराठवाड्याला होऊ पाहत असताना पश्चिम महाराष्ट्रातील काही ‘पॉवर’फुल नेते विरोधाची भूमिका घेत आहेत.विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्राचा मोठा फायदासमृद्धी महामार्गाने केवळ विदर्भ, मराठवाड्याच्या विकासाचे मोठे दालन खुले होणार आहे. एवढेच नव्हेतर, उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबारमधील मालालादेखील तातडीने ‘पोर्ट कनेक्टिव्हिटी’ मिळेल. मुंबईच्या जवाहरलाल नेहरू बंदरात कृषी, औद्योगिक माल काही तासांत पोहोचून त्याला जगाची बाजारपेठ उपलब्ध होणार असल्याने आर्थिक प्रगतीचा वेग झपाट्याने वाढणार आहे.