शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
2
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
3
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
4
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
5
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
6
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
7
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
8
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
9
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
10
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
11
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
12
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
13
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून
14
परीक्षेच्या शेवटच्या दिवशी विद्यार्थिनीने केली आत्महत्या; लातूरच्या शासकीय महिला तंत्रनिकेतनच्या वसतिगृहात घेतला गळफास
15
क्षुल्लक मुद्द्याला जास्त महत्व देऊ नका, हे प्रकरण इथेच थांबवा; सरन्यायाधीश गवई यांचे आवाहन
16
पाकिस्तानची पोलखोल करण्यासाठी भारताचे शिष्टमंडळ तयार; कोण कुठे जाणार? पाहा...
17
Viral Video: आधी देवाला हात जोडले, नंतर मंदिरातील दानपेटी नेली चोरून
18
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
19
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
20
IPL 2025: आता पाऊस पडल्यानंतरही सामने रद्द होणार नाहीत, आयपीएलमध्ये नवा नियम लागू!

समताधिष्ठित महाराष्ट्र घडावा - राधाकृष्ण विखे-पाटील

By admin | Updated: May 22, 2016 04:13 IST

पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात संतांचे आणि वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान आहे. हा वारसा पुढे नेत प्रतिगामी शक्तींवर मात करुन समाताधिष्ठित महाराष्ट्र घडवला पाहिजे

पुणे : पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात संतांचे आणि वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान आहे. हा वारसा पुढे नेत प्रतिगामी शक्तींवर मात करुन समाताधिष्ठित महाराष्ट्र घडवला पाहिजे, असे मत विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेतर्फे आयोजित पाचव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते दिंडी सोहळ््याचा प्रारंभ झाला. उद्घाटनप्रसंगी संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बद्रिनाथमहाराज तनपुरे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, रिपार्इंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, सचिव डॉ. सदानंद मोरे, माजी संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजीराव मोहिते आदि व्यासपीठावर उपस्थित होते. हे संमेलन दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना समर्पित करत असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. विखे पाटील म्हणाले, ‘संस्कृती टिकवून ठेवायची असेल तर संतांच्या विचारांची कास धरायला हवी. सध्याच्या दुष्काळाच्या समस्येतूनही वारकरी संप्रदायच मार्ग दाखवेल. सत्ताधारी हातात झाडू घेऊन प्रसिध्दीसाठी स्वच्छता अभियानाचा देखावा करीत आहेत. मात्र, स्वच्छतेचे मूल्य प्रस्थापित केलेल्या गाडगेमहाराजांचे नाव मात्र पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. ’ बहुजन समाजाच्या उद्धारासाठी समतेचा, विश्वबंधुत्वाचा उद्घोष व्हावा, असे मत संमेलनाध्यक्ष बद्रिनाथमहाराज तनपुरे यांनी अध्यक्षीय भाषणात मांडले. सामाजिक प्रश्नांना उत्तर देण्याची ताकद वारकरी संप्रदायामध्ये आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. डॉ. सदानंद मोरे यांनी संमेलनामागील भूमिका स्पष्ट केली. (प्रतिनिधी)