शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

समताधिष्ठित महाराष्ट्र घडावा - राधाकृष्ण विखे-पाटील

By admin | Updated: May 22, 2016 04:13 IST

पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात संतांचे आणि वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान आहे. हा वारसा पुढे नेत प्रतिगामी शक्तींवर मात करुन समाताधिष्ठित महाराष्ट्र घडवला पाहिजे

पुणे : पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात संतांचे आणि वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान आहे. हा वारसा पुढे नेत प्रतिगामी शक्तींवर मात करुन समाताधिष्ठित महाराष्ट्र घडवला पाहिजे, असे मत विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेतर्फे आयोजित पाचव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते दिंडी सोहळ््याचा प्रारंभ झाला. उद्घाटनप्रसंगी संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बद्रिनाथमहाराज तनपुरे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, रिपार्इंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, सचिव डॉ. सदानंद मोरे, माजी संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजीराव मोहिते आदि व्यासपीठावर उपस्थित होते. हे संमेलन दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना समर्पित करत असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. विखे पाटील म्हणाले, ‘संस्कृती टिकवून ठेवायची असेल तर संतांच्या विचारांची कास धरायला हवी. सध्याच्या दुष्काळाच्या समस्येतूनही वारकरी संप्रदायच मार्ग दाखवेल. सत्ताधारी हातात झाडू घेऊन प्रसिध्दीसाठी स्वच्छता अभियानाचा देखावा करीत आहेत. मात्र, स्वच्छतेचे मूल्य प्रस्थापित केलेल्या गाडगेमहाराजांचे नाव मात्र पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. ’ बहुजन समाजाच्या उद्धारासाठी समतेचा, विश्वबंधुत्वाचा उद्घोष व्हावा, असे मत संमेलनाध्यक्ष बद्रिनाथमहाराज तनपुरे यांनी अध्यक्षीय भाषणात मांडले. सामाजिक प्रश्नांना उत्तर देण्याची ताकद वारकरी संप्रदायामध्ये आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. डॉ. सदानंद मोरे यांनी संमेलनामागील भूमिका स्पष्ट केली. (प्रतिनिधी)