शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
5
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
6
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
7
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
9
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
10
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
11
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
12
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
13
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
14
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
15
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
16
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
17
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
18
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
19
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
20
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!

समताधिष्ठित महाराष्ट्र घडावा - राधाकृष्ण विखे-पाटील

By admin | Updated: May 22, 2016 04:13 IST

पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात संतांचे आणि वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान आहे. हा वारसा पुढे नेत प्रतिगामी शक्तींवर मात करुन समाताधिष्ठित महाराष्ट्र घडवला पाहिजे

पुणे : पुरोगामी महाराष्ट्र घडवण्यात संतांचे आणि वारकरी संप्रदायाचे मोठे योगदान आहे. हा वारसा पुढे नेत प्रतिगामी शक्तींवर मात करुन समाताधिष्ठित महाराष्ट्र घडवला पाहिजे, असे मत विधानसभेतील विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेतर्फे आयोजित पाचव्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. तत्पूर्वी सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते दिंडी सोहळ््याचा प्रारंभ झाला. उद्घाटनप्रसंगी संत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बद्रिनाथमहाराज तनपुरे, माजी मंत्री बबनराव पाचपुते, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, रिपार्इंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले, परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, सचिव डॉ. सदानंद मोरे, माजी संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजीराव मोहिते आदि व्यासपीठावर उपस्थित होते. हे संमेलन दुष्काळग्रस्त शेतकरी बांधवांना समर्पित करत असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. विखे पाटील म्हणाले, ‘संस्कृती टिकवून ठेवायची असेल तर संतांच्या विचारांची कास धरायला हवी. सध्याच्या दुष्काळाच्या समस्येतूनही वारकरी संप्रदायच मार्ग दाखवेल. सत्ताधारी हातात झाडू घेऊन प्रसिध्दीसाठी स्वच्छता अभियानाचा देखावा करीत आहेत. मात्र, स्वच्छतेचे मूल्य प्रस्थापित केलेल्या गाडगेमहाराजांचे नाव मात्र पुसून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. ’ बहुजन समाजाच्या उद्धारासाठी समतेचा, विश्वबंधुत्वाचा उद्घोष व्हावा, असे मत संमेलनाध्यक्ष बद्रिनाथमहाराज तनपुरे यांनी अध्यक्षीय भाषणात मांडले. सामाजिक प्रश्नांना उत्तर देण्याची ताकद वारकरी संप्रदायामध्ये आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. डॉ. सदानंद मोरे यांनी संमेलनामागील भूमिका स्पष्ट केली. (प्रतिनिधी)