शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
5
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
6
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
7
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
8
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
9
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
10
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
11
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
12
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
13
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
14
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
15
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
16
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
17
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?
18
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
19
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
20
"मी हात जोडते...", थार खरेदी करताच 'चक्काचूर'; महिलेने सांगितलं 'त्या' दिवशी नेमकं काय घडलं?

आदिवासींच्या जमिनींची विक्री लिलावातून

By admin | Updated: March 30, 2017 03:25 IST

आदिवासींच्या मालकीच्या जमिनी बिगर आदिवासींना विकण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या असून

मुंबई : आदिवासींच्या मालकीच्या जमिनी बिगर आदिवासींना विकण्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या असून त्यात प्रचंड गैरव्यवहार झाल्याचा मुद्दा आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात ऐरणीवर आला. यापुढे आदिवासींच्या जमिनींचा लिलाव करून आदिवासींना जास्तीतजास्त मोबदला देण्याचा तसेच या जमिनींच्या विक्रीबाबत एक धोरण आणण्याचा शासनाचा विचार असल्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. आदिवासींच्या जमिनी विकायच्या असतील तर शासनाची परवानगी घ्यावी लागते. या विक्रीसाठी ठोस कारणे नमूद करावी लागतात. अशा परवानगीची ४५० प्रकरणे ही आपल्याकडे प्रलंबित आहेत. त्यांना आपण परवानगी दिलेली नाही. या जमिनींच्या विक्रीसंदर्भात ठोस धोरण करण्याचा शासनाचा विचार आहे.धानोरकर, देशमुख आक्रमक; अखेर समितीची घोषणाचंद्रपूर जिल्ह्यातील रामपूर येथे गणपत भिवा टेकाम या आदिवासीच्या मालकीची जमीन बिगरआदिवासी करून विकण्यात आली. दारुच्या नशेत त्याच्याकडून कागदपत्रांवर सह्या घेण्यात आल्याचे प्रकरण यावेळी गाजले. शिवसेनेचे सुरेश (बाळू) धानोरकर यांनी या बाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. या प्रकरणी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून चौकशी केली जाईल आणि त्या अहवालाच्या आधारे दोषींवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी दिले. मात्र, त्यांच्या उत्तराने समाधान न झाल्याने भाजपाचे डॉ.सुनील देशमुख चांगलेच संतप्त झाले. ‘राठोड हे आमदार असताना आक्रमक होते आता राज्यमंत्री होताच ते अधिकाऱ्यांना वाचवत आहेत, असा आरोप त्यांनी केला.