शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
2
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
3
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
4
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
6
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
7
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
8
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
9
दहशतवादी प्रकरणांतील फरारी गुन्हेगारांना परत आणण्यासाठी उपाययोजना करा: अमित शाह
10
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?
11
शाळेतील सुरक्षा उपायांचे ऑडिट आता अनिवार्य; केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दिले आदेश
12
वादग्रस्त न्यायाधीश यशवंत वर्मांप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी
13
‘जन्माधारित नागरिकत्व’चा ट्रम्प यांचा निर्णय कोर्टाकडून स्थगित; अमेरिकेतील भारतीयांना दिलासा
14
थायलंड-कंबोडिया संघर्षात ३३ ठार, हजारो विस्थापित; पुरातन मंदिरावरून पेटला संघर्ष
15
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
16
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
17
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
18
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
19
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
20
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या

साईनगरीत पाण्याला आलंय देवत्व

By admin | Updated: June 11, 2016 16:41 IST

पाण्याइतकं काहीच अमुल्य नसल्याचं वास्तव दुष्काळाने समोर आलं आहे. साईनगरीत तर या दुष्काळात पाण्याला थेट देवत्व आलंय

शिर्डी - पाण्याइतकं काहीच अमुल्य नसल्याचं वास्तव दुष्काळाने समोर आलं आहे. साईनगरीत तर या दुष्काळात पाण्याला थेट देवत्व आलंय. मंदीरात मुर्ती समोर पाण्याचे जार ठेवुन शिर्डीतील कुलपबंद केलेल्या पाण्याचं मोल देवत्वापेक्षा अधिक असल्याचे द्योतक आहे़.
शिर्डी सध्या भिषण पाणी टंचाईला तोंड देत आहे़. संस्थानने पन्नास टक्के भक्तनिवास, प्रसादालयाचे दोन उपविभाग पाण्या अभावी बंद केलेत़ पैसे देवुनही संस्थानला गोडे पाणी उपलब्ध होत नाही. फिल्टर असुनही खारे पाणी तोंडातही धरणे अवघड आहे़. भाविकांनाही मिनरल वॉटरचेच पाणी घ्यावे लागत आहे़. शहरातही दहा दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे़. संस्थानचे तलावही कोरडे पडले आहेत़ भोजनगृहात पत्रावळीवर जेवण देण्यात येत आहे़.
संस्थानला टँकर द्वारे पुरवठा होत असलेले बहुतांश पाणी खारे आहे़. त्यामुळे कर्मचारीही ते पाणी पित नाहीत़. संस्थानच्या नवीन भक्तनिवास (पाचशे रूम) व संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील सुरक्षा रक्षक रोज वर्गणी करून ड्युटीवर पिण्यासाठी पाण्याचे जार विकत घेत आहेत. पण हे जार बाहेर ठेवले तर कुणीही किंवा वर्गणी न देणाराही पिऊन लगेच संपवत आहेत. यावर या सुरक्षा रक्षकांनी तोडगा शोधुन काढला आहे़. संस्थानच्या शैक्षणिक संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ सरस्वतीचे मंदीर आहे़. सुरक्षा रक्षकांनी या मंदीरात पाण्याचे जार ठेवुन त्याला कुलूप लावुन घेतलेले आहे़. यामुळे मुर्ती झाकुन गेली असुन भक्तनिवास समोर असलेल्या या मंदीरात मुर्तीच्या जागी पाण्याच्या जारचे दर्शन घडत आहे. एकुनच धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणीही पाण्याला देवापेक्षा अधिक दर्जा आला आहे तर अन्य ठिकाणी काय परिस्थीती असेल याची कल्पना न केलेली बरी.