शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

साईनगरीत पाण्याला आलंय देवत्व

By admin | Updated: June 11, 2016 16:41 IST

पाण्याइतकं काहीच अमुल्य नसल्याचं वास्तव दुष्काळाने समोर आलं आहे. साईनगरीत तर या दुष्काळात पाण्याला थेट देवत्व आलंय

शिर्डी - पाण्याइतकं काहीच अमुल्य नसल्याचं वास्तव दुष्काळाने समोर आलं आहे. साईनगरीत तर या दुष्काळात पाण्याला थेट देवत्व आलंय. मंदीरात मुर्ती समोर पाण्याचे जार ठेवुन शिर्डीतील कुलपबंद केलेल्या पाण्याचं मोल देवत्वापेक्षा अधिक असल्याचे द्योतक आहे़.
शिर्डी सध्या भिषण पाणी टंचाईला तोंड देत आहे़. संस्थानने पन्नास टक्के भक्तनिवास, प्रसादालयाचे दोन उपविभाग पाण्या अभावी बंद केलेत़ पैसे देवुनही संस्थानला गोडे पाणी उपलब्ध होत नाही. फिल्टर असुनही खारे पाणी तोंडातही धरणे अवघड आहे़. भाविकांनाही मिनरल वॉटरचेच पाणी घ्यावे लागत आहे़. शहरातही दहा दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे़. संस्थानचे तलावही कोरडे पडले आहेत़ भोजनगृहात पत्रावळीवर जेवण देण्यात येत आहे़.
संस्थानला टँकर द्वारे पुरवठा होत असलेले बहुतांश पाणी खारे आहे़. त्यामुळे कर्मचारीही ते पाणी पित नाहीत़. संस्थानच्या नवीन भक्तनिवास (पाचशे रूम) व संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील सुरक्षा रक्षक रोज वर्गणी करून ड्युटीवर पिण्यासाठी पाण्याचे जार विकत घेत आहेत. पण हे जार बाहेर ठेवले तर कुणीही किंवा वर्गणी न देणाराही पिऊन लगेच संपवत आहेत. यावर या सुरक्षा रक्षकांनी तोडगा शोधुन काढला आहे़. संस्थानच्या शैक्षणिक संकुलाच्या प्रवेशद्वाराजवळ सरस्वतीचे मंदीर आहे़. सुरक्षा रक्षकांनी या मंदीरात पाण्याचे जार ठेवुन त्याला कुलूप लावुन घेतलेले आहे़. यामुळे मुर्ती झाकुन गेली असुन भक्तनिवास समोर असलेल्या या मंदीरात मुर्तीच्या जागी पाण्याच्या जारचे दर्शन घडत आहे. एकुनच धार्मिक तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणीही पाण्याला देवापेक्षा अधिक दर्जा आला आहे तर अन्य ठिकाणी काय परिस्थीती असेल याची कल्पना न केलेली बरी.