शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
2
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
4
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
5
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
6
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
7
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
8
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
9
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
10
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
11
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
13
संपादकीय: परीक्षा हे सर्वस्व नव्हे !
14
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
15
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
16
नहीं होगा, नहीं होगा... कुंभ में स्नान नहीं होगा?
17
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
18
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
19
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
20
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची

साध्वी ज्योतींच्या वक्तव्याचा भरुदड 27 कोटी!

By admin | Updated: December 7, 2014 02:16 IST

केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी दिल्लीत केलेल्या एका वक्तव्याचा फटका केवळ भाजपालाच बसलेला नाही तर देशाला तब्बल 27 कोटी रुपयांचा फटका बसला आहे.

फटका : एका आक्षेपार्ह वक्तव्यामुळे संसदेचे 3 दिवसांचे कामकाज पाण्यात
पवन देशपांडे - मुंबई
एका आक्षेपार्ह शब्दाची किंमत किती असू शकते, याचा प्रत्यय कदाचित भाजपाला आला असेल. केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी दिल्लीत केलेल्या एका वक्तव्याचा फटका केवळ भाजपालाच बसलेला नाही तर देशाला तब्बल 27 कोटी रुपयांचा फटका बसला आहे. शिवाय या गदारोळात अनेक महत्त्वाची विधेयकेही रखडली.
दिल्लीची सत्ता एकहाती मिळवण्याचे स्वप्न पाहणा:या भाजपाने आतापासूनच प्रचार सुरू केला आहे. दिल्लीत अशाच एका प्रचारसभेत केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योती यांनी आक्षेपार्ह विधान केले. त्यावरून हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी आक्रमक पवित्र घेतला. असभ्य भाषा वापरणा:या मंत्र्याने राजीनामा द्यावा, यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली खासदारांनी संसदेबाहेर आंदोलनही केले. सर्व विरोधक एकत्र आले. संसदेचे कामकाज तीन दिवस विस्कळीत झाल़े लोकसभा व राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधकांनी गदारोळ घातला. 
अधिवेशन काळात संसदेचे एका मिनिटाचे काम चालवण्याचा खर्च सुमारे 2.5 लाख रुपये आहे. दर दिवशी सहा तास कामकाज होणो अपेक्षित असते. त्यानुसार संसदेच्या एका दिवसाच्या कामकाजाचा खर्च नऊ कोटी रुपये आहे. साध्वी ज्योती यांच्या वक्तव्यानंतर तीन दिवस कामकाज विस्कळीत आहे. यापुढेही कामकाज सुरळीत होण्याची शक्यता धूसर आहे. गेल्या तीन दिवसांत एकूण 27 कोटी रुपयांचा खर्च वाया गेला असून, विरोधाची धार कायम राहिल्यास दर दिवसाला 9 कोटी रुपयांचा भरुदड बसणार आहे.