शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
4
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
7
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
8
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
9
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
10
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
11
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
12
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
13
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
14
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
15
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
16
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
17
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
18
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
19
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
20
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र

उमेदवारांची व्याजाच्या पैशासाठी धावाधाव

By admin | Updated: October 14, 2014 00:57 IST

निवडणुकीचे वाढते बिग बजेट लक्षात घेता अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यातूनच या उमेदवारांची व्याजाच्या पैशांसाठी धावाधाव सुरू आहे. मात्र यातही काही खरोखरच गरजू आहेत तर काही

राजेश निस्ताने - यवतमाळ निवडणुकीचे वाढते बिग बजेट लक्षात घेता अनेकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यातूनच या उमेदवारांची व्याजाच्या पैशांसाठी धावाधाव सुरू आहे. मात्र यातही काही खरोखरच गरजू आहेत तर काही केवळ देखावा निर्माण करीत आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकांचे बजेट आघाडी व युती तुटल्याने चांगलेच वाढले आहे. कारण कार्यकर्ते व संबंधितांपुढे एक नव्हे तर चार प्रमुख सक्षम पर्याय उपलब्ध झाले आहेत. याशिवाय आणखी दोन ते तीन पर्याय प्रत्येक मतदारसंघात आहेतच.राजकीय आखाड्यात काही गब्बर उमेदवार आहेत. त्यातही सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांची संख्या अधिक आहे. कारण गेली दहा वर्ष याच पक्षांची सत्ता आहे. गब्बर उमेदवाराच्या तोडीस तोड खर्च करता यावा म्हणून प्रचारात आघाडी घेतलेल्या मात्र आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या आणि अखेरच्या क्षणी पैशाने मागे पडलेल्या उमेदवारांनीही ऐनवेळी पैशाची जुळवाजुळव सुरू केली आहे. हे उमेदवार पैशासाठी फिरताना दिसत आहे. प्रत्येकच मतदारसंघात अर्थपुरवठा करणाऱ्यांची बरीच संख्या आहे. मात्र हा उमेदवार पडला तर पैसे कसे मिळणार म्हणून त्यांनी हात आखुडता घेतला आहे. त्यासाठी पैसे मागणाऱ्या उमेदवाराला हमीदार कोण, अशी विचारणा केली जात आहे किंवा त्याची संपत्ती तारण ठेवली जात आहे. जिंकून येण्याची खात्री असलेल्या उमेदवारालाच व्याजाने पैसा दिला जातोय, हे विशेष. या पैशाचा व्याजाचा दर किमान साडेतीन टक्के असल्याचे सांगितले जाते. काही उमेदवारांनी आपल्या पक्षाच्या गब्बर नेत्यांकडे आर्थिक पाठबळाची मागणी केली आहे. तर काही जण पक्षाकडे पार्टी फंडसाठी तगादा लावत आहे. पार्टी फंड वाटपाची जबाबदारी असलेले काही नेते स्वत:च रिंगणात असल्याने ते किती प्रामाणिकपणे फंड वाटतील याबाबत साशंकता आहे. आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या उमेदवारांसोबतच काही गब्बर उमेदवारही ‘कुणी व्याजाने पैसे देणारा आहे का’, अशी विचारणा करताना दिसत आहे. त्यांची ही विचारणा पाहून कुणाला विश्वास बसत नाही. मात्र या मागणीला विविध पैलू आहेत. उमेदवाराजवळचे पैसे संपले असे वातावरण निर्माण केल्यास कार्यकर्ते जास्त त्रास देणार नाही, हा एक प्रमुख उद्देश आहे. शिवाय आपल्याकडे दोन नंबरचा पैसा नाही, हे दाखविण्यासाठीसुद्धा व्याजाचा पैशाचा देखावा निर्माण केला जातो आहे. काही उमेदवारांकडे भक्कम पैसा आहे, मात्र घरावर आयोगाची नजर असल्याने हा पैसा घराबाहेर काढणे त्यांना धोक्याचे वाटत आहे. म्हणून तात्पुरती व्यवस्था बाहेरून करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. आचारसंहिता संपल्यानंतर आयोगाचा वॉचही संपुष्टात येत असल्याने नंतर हळूच काळापैसा घराबाहेर काढण्याचे प्लॅनिंग आहे. काही उमेदवारांनी अचानक सर्च होण्याच्या भीतीने आपल्या विश्वासू शेजाऱ्यांकडे, मित्रांकडेसुद्धा मोठ्या रकमा ठेवल्याचे समजते. युती-आघाडी तुटल्याने अनेकांना अनपेक्षितरीत्या निवडणुकीच्या रिंगणात उतरावे लागले. त्यामुळे त्यांची कोणतीच तयारी नव्हती. आता काही उमेदवार अक्षरश: कोरे स्टॅम्प पेपर घेऊन फिरत असल्याचे पहायला मिळत आहे. हे चित्र एकट्या यवतमाळ जिल्ह्यात अथवा विदर्भात नसून राज्याच्या अनेक विधानसभा मतदारसंघात आहे.