शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

खटला कोल्हापूरबाहेर चालवा

By admin | Updated: December 19, 2015 02:10 IST

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी आणि सनातन संस्थेचा सदस्य समीर गायकवाड याने कोल्हापूर कनिष्ठ न्यायालयातून खटला जिल्ह्याबाहेर वर्ग करण्यासाठी उच्च

मुंबई : कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी आणि सनातन संस्थेचा सदस्य समीर गायकवाड याने कोल्हापूर कनिष्ठ न्यायालयातून खटला जिल्ह्याबाहेर वर्ग करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. गुरुवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावत यावर दोन आठवड्यांत उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.विशेष तपास पथकाने सप्टेंबर २०१५मध्ये समीरला सांगली येथून अटक केली. त्यानंतर समीरने १५ डिसेंबर रोजी हा खटला कोल्हापूर कनिष्ठ न्यायालयातून राज्यात अन्य ठिकाणी वर्ग करण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी न्या. ए.आर. जोशी यांच्या खंडपीठापुढे झाली. याचिकेनुसार, कोल्हापूर दंडाधिकाऱ्यांनी समीरचा रिमांड देताना पानसरेंच्या नातेवाइकांचे म्हणणे ऐकून घेतले. कायद्यानुसार, आरोपीला रिमांड देताना पीडितांच्या नातेवाइकांची बाजू ऐकण्याची तरतूद नाही. कनिष्ठ न्यायालय जनमतप्रवाहात वाहून गेल्याचा आरोप या याचिकेद्वारे करण्यात आला आहे. त्याशिवाय कोल्हापूरमध्ये पानसरेंच्या समर्थकांनी भव्य रॅली काढून कोल्हापुरातील वातावरण दूषित केले आहे. हा खटला घेण्यास एकही वकील तयार नाही. त्यामुळे या ठिकाणी आपल्याला न्याय मिळेल, अशी अपेक्षा नाही, असे गायकवाडने याचिकेत म्हटले आहे. (प्रतिनिधी)पानसरे कुटुंबीयांचा विरोधया खटल्यामध्ये पानसरे कुटुंबीयांचा अथवा अन्य कुणाचाच कोणत्याही प्रकारचा दबाव नाही. न्यायालयीन प्रक्रिया सुरळीत सुरू आहे. गायकवाडनेही आजपर्यंत त्याबद्दल कोणतीही तक्रार केलेली नाही. त्यामुळे हा खटला कोल्हापूरच्या बाहेर चालविण्याची मागणी करणे चुकीचे आहे. त्यास आमचा विरोध राहील, असे गोविंद पानसरे यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी म्हटले आहे.