शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘रन-वे विकलेत का?’ हायकोर्ट संतप्त

By admin | Updated: January 14, 2017 05:57 IST

जुहू विमानतळाच्या भूखंडावरील झोपडपट्टयांचे सर्वेक्षण करण्याची मुभा विमानतळ प्राधिकरणाने दिल्याबद्दल उच्च न्यायालयाने

मुंबई : जुहू विमानतळाच्या भूखंडावरील झोपडपट्टयांचे सर्वेक्षण करण्याची मुभा विमानतळ प्राधिकरणाने दिल्याबद्दल उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. ‘रन वेही विकलेत का?’ असा संतप्त सवालच उच्च न्यायालयाने प्राधिकरणाला केला. कोणत्याही परिस्थितीत विमानतळाच्या भूखंडावर झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याची कोणतीही योजना राबू देणार नाही, अशी तंबीही न्यायालयाने प्राधिकरणाला दिली.जुहू विमानतळाच्या भूखंडावर झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्याची योजना राबवण्यासाठी दिलेल्या आदेशांसंदर्भात तपास करण्यात यावा, तसेच २२, ४०० चौ. मी. भूखंडावर योजना सुरू न करण्याचा आदेश संबंधित प्राधिकरणांना द्यावा, यासाठी सांताक्रुझचे रहिवासी बाबू जगताप यांनी उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. या याचिकेवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठापुढे होती. जुहू विमानतळाच्या भूखंडावरील झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करण्याची परवानगी खुद्द भारतीय विमानतळ प्राधिकरणानचे दिल्याने उच्च न्यायालयाने संताप व्यक्त केला. ‘रन वेही विकलेत का?’ असा संतप्त सवाल करतानाच, ‘भविष्यात विमानतळ वाढवायचे असेल तेव्हा तुम्ही आणखी ५० किलोमीटर दूर जाणार,’ असा उपरोधिक टोलाही न्यायालयाने लगावला. मात्र विमानतळाच्या भूखंडावर एसआरएची योजना सुरू करण्याचा अद्याप एकही प्रस्ताव आला नसल्याचे  विमानतळ प्राधिकरण आणि एसआरएने खंडपीठाला सांगितले. 

काही खासगी विकासक एसआरएची योजना राबवण्यासाठी झोपडपट्टीधारकांकडून सहमती घेत असल्याची बाब याचिकाकर्त्यांचे वकील अशोक सरोगी यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणली. ‘याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी निदर्शनास आणलेली बाब आणि सध्या जुहू विमानतळही कार्यरत नसल्याने कोणीतरी या भूखंडावर एसआरए योजना राबविण्यात इच्छुक आहे, हे स्पष्ट आहे. विमानतळाच्या भूखंडावर आम्ही कोणत्याही योजनेला परवानगी देणार नाही. प्राधिकरणाने येथील झोपडपट्टीवासियांचे अन्य कुठेतरी पुनर्वसन करावे. अशा प्रकारची योजना या जागेवर राबवून दिली तर भविष्यात विमानतळाचा विकास करणे कठीण जाईल,’ असे खंडपीठाने म्हणत खंडपीठाने संबंधित भूखंडावर योजनेसाठी सुरू असलेल्या सर्व कामांना स्थगिती दिली.