शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियात अफवांचे शेअरिंग

By admin | Updated: August 11, 2014 22:58 IST

व्हॉटसअँपवर अलिताही वाढली : सर्वसामान्यांची डोकेदुखी

बुलडाणा: परस्परांशी अगदी सहज अँक्सेस होणार्‍या व्हॉटसअपने सद्यस्थितीत तरूणाईला भुरळ घातली आहे. मात्र, एकमेकांशी संवाद साधण्यापेक्षा यावर अफवांच्या शेअरिंगलाच कमालीचा उत आला आहे. परिणामी डोकेदुखी वाढली आहे. सोशल मिडीयाचा वापर वाढला आहे. फेसबुकची क्रेझ काहीशी कमी होते ना होते तोच व्हॉटसअँपने तरूणाईला कवेत घैतले आहे. संवादाच्या या नव्या तंत्राचा अनेकांना मोठा फायदा होत असला तरी, सद्या वाट चुकललेल्या काही वापरकर्त्यांंंनी या जादुच्या कांडीचा वापर चुकींच्या कामांसाठी चालविला आहे. योग्य प्रसंगावधान साधुन एखादी अफवा व्हॉटस्अप वर शेअर केली जाते.

** शिक्षकाची मारहाण

एक शिक्षक विद्यार्थ्यांंंना गुरा सारखा बदडत असल्याचा व्हिडीओ गेल्या दोन दिवसांपासुन व्हॉटस्अँपवर फॉर्वड होत आहे. हा व्हिडीओ पाहताच कुणाचाही पारा चढणे सहाजीकच आहे इतका क्रुर आहे. हा व्हिडीओ पाहणार्‍या प्रत्येकाने हा कुठला आहे, तो शिक्षक कोण याची विचारणा ग्रुपवर व मित्रांमध्ये करणे सुरू केले. कुणालाही हा व्हिडीओ कुठला आहे याची माहिती नव्हती, नंतर बुलडाण्यातील एका पत्रकाराने सायबर सेलला याबाबत माहिती दिली असता तो व्हिडीओ खूप जुना असल्याची बाब समोर आली. वास्तविक तो व्हिडीओ हा अतिशय संतापजनक असाच आहे. कुठल्याही सहदय व्यक्तीला अस्वस्थ करणारे ते चित्रीकरण आहे अनेकांनी याबाबत विचारणा केली मात्र कुठलीही खातरजमा न करता सदर व्हिडीओ फॉरवर्ड होत गेला हे समोर आले.

** मृत्यू व आजारांच्या अफवा

सिने अभिनेत्री माधुर दिक्षीत यांच्या वाहनाला मुंबई- पूणे मार्गावर अपघात झाला असुन या अपघातामध्ये त्यांची प्राणज्योत मालविली असल्याची धक्कादायक बातमी व्हॉटस्अँपनेच सर्वत्र पसरविली होती. सोबतच शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, भन्ते सुरई ससाई, लता मंगेशकर, यांच्याही आजाराबाबत व्हॉटस् अँप वर अफवा पसरल्या होत्या. या अफवांचे शेअरींग करताना कुणीही सत्यता पडताळत नाही त्यामुळे सर्व सामान्य नागरीक चांगलेच धास्तावले जातात. नंतर मात्र अशी कुठलीच बातमी नसल्याचे पाहून अनेकांनी सुटकेचा निश्‍वास टाकतात खरा मात्र त्यांची दिवसभर त्रेधातिरपीट उडालेली असते. अशा अफवांची आधी खातरजमा करून घ्या नंतरच शेअरींगचा निर्णय घेतला पाहिजे अन्यथा हे प्रकार थांबविले पाहिजे.

** चिखली मार्गावर अपघात

मागील महिन्यात पुणे येथे दोन विद्यार्थिनींचा अपघात झाला होता. त्या अपघात दोन्ही विद्यार्थिनींचा जागेवरच मृत्यू झाला होता. याबाबतच्या फोटोवरून अपघाताची भिषणता दिसून येत होती. या अपघाताचे वृत्त विविध वाहिन्यावर झळकले होते. दरम्यान अपघाताच्या तिसर्‍या दिवशी तीच पोस्ट टाकताना .पुणे शहराचा उल्लेख केला नाही. सर्व गृपमध्ये चिखली रस्त्यावर भिषण अपघात, दोन विद्यार्थिंंंनी जागीच ठार झाल्याचे वृत्त पोस्ट केले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. व्हॉटस् अँपवर ही बातमी फिरल्यावर अनेक पत्रकारांनी चिखली रस्त्यावर धाव घेतली. पोलीस स्टेशनचे दूरध्वनी खणखणले. नागरीकही विचारणा करू लागले मात्र शेवटी विद्यार्थिनींच्या अपघाताचे वृत्त अफवा ठरले.

** सावधनता बाळगणे गरजेचे

फेसबुक चा वापर करताना युर्जसने दक्षता घेणे गरजेचे आहे. फेसबुक वापरताना कुणालाच आपला पासवर्ड तथा अन्य खासगी माहीती देऊ नये. एवढेच नव्हेतर पासवर्ड हा अत्यंत क्लिष्ट ठेवावा जेणेकरून सहज कुणालाही तुमचे अकाऊंट वापरणे शक्य होणार नाही. व्हॉटस्अप वापरताना आपल्याला आलेला प्रत्येक संदेश दुसर्‍यांना पोस्ट करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचून घ्या. कुणी अफवा पसरवित असेल तर त्याला दाद देऊ नका म्हणजे या कृत्याला पायबद घातल्या जाईल.

** पालकांनो तुम्ही जागृत व्हा !

व्हॉटस्अँप व फेसबुक या सोशल मिडीयातील अप्लिकेशनचा वापर मुलेच करतात असे नाही. मुलीही ही अप्लिकेशन हाताळत आहेत. त्यांचेही ग्रुप आहेत; पण या ग्रुपमध्ये नेमक ी कशाची देवाण-घेवाण केली जाते हे पाहिले असता त्याही मुलांपेक्षा वेगळे काही करीत नाहीत हेच दिसून आले त्यामुळे आता पालकांनी जागृत होण्याची वेळ आली आहे. आपला मुलगा अथवा मुलगी हातातील मोबाईल सोडतच नसेल तर पालकांनी त्यांची चौकशी करावी तसच याला आळा बसेल. अन्यथा..