शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे 'शिवतीर्थ'हून निघाले, कार थांबवली, काच खाली केली अन् म्हणाले, "मातोश्री'वर चाललोय...!"
2
राज्यातील महाराष्ट्रविरोधी सरकार घालवायला ठाकरे बंधू एकत्र येत असतील तर स्वागत: वडेट्टीवार
3
Raja Raghuvanshi : सस्पेन्स वाढला! राजा आणि सोनमचं मेघालयमध्ये झालं भांडण? भावाला आल्या धमक्या
4
Fact Check: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीचं निधन? व्हायरल व्हिडीओमागील सत्य समोर!
5
३० लाखांच्या होम लोनवर वाचतील ४.६३ लाख; आपली कर्जाची रक्कम टाका आणि पाहा किती होईल बचत?
6
Astrology: राहू दशा सुरु झाली हे कसं ओळखावं? राहूमुळे कोणकोणती हानी होते? वाचा!
7
'सुनील तटकरेंनी राजीनामा द्यायला पाहिजे, त्यांनी दिला तर मी नक्की देईन', आमदार महेंद्र थोरवेंचा घणाघात
8
स्कूटरवरून आले, सामान हॉटेलमध्ये ठेवलं अन्...; राजा आणि सोनम बेपत्ता होण्यापूर्वीच्या CCTV व्हिडीओमध्ये काय?
9
“२ तास गोंधळ, मतमोजणी हायजॅक, मोदींचा वाराणसीत जवळपास पराभवच झाला होता”; कुणाचा दावा?
10
एकटं राहायला आवडतं? उषा नाडकर्णी म्हणाल्या, "आमच्या इमारतीत राज ठाकरेंची मावशी..."
11
म्युच्युअल फंड गुंतवणूकदाराचा अचानक मृत्यू झाला तर पैशांचं काय होतं? पाहा महत्त्वाची माहिती आणि प्रक्रिया
12
Astrology: पत्रिका मंगळाची असेल तर सगळेच अमंगल होते का? काय आहे त्यावर उपाय? वाचा!
13
Rahul Gandhi: महाराष्ट्र विधानसभेत 'मॅच फिक्सिंग', राहुल गांधींचा आरोप; भाजपचा पलटवार!
14
Jyoti Malhotra : ज्योती मल्होत्राबाबत मोठा खुलासा; पाकिस्तानमधील रिटायर्ड सब-इन्स्पेक्टरच्या होती संपर्कात
15
COVID19: कोरोना वाढतोय, काळजी घ्या! २४ तासांत ४ मृत्यू, सक्रीय रुग्णांची संख्या ५००० च्या वर!
16
“२०१४, २०१७ ला काय घडले यात रस नाही, आम्ही मागे वळून पाहत नाही”; प्रस्तावावर राऊतांचे विधान
17
'उद्धव ठाकरेंना गर्दीचं मतांमध्ये परिवर्तन करण्यात यश', शरद पवार राज ठाकरेंबद्दल काय म्हणाले?
18
Vedashree Toraskar : जलपरी! समुद्रातील आव्हान पेललं, अटल सेतू ते गेटवेपर्यंत पोहून ११ व्या वर्षी रचला इतिहास
19
‘हमासचा खात्मा करण्याची इच्छा, पण अयशस्वी ठरले’; मौलाना अरशद मदनी म्हणाले, गाझातील एक लाख शहिदांनी...
20
संजय राऊतांचे RSSचे सरसंघचालक मोहन भागवतांना पत्र; म्हणाले, “विरोधकांचा आवाज दडपायला...”

सत्ताधारी आमदारच नाराज

By admin | Updated: March 2, 2015 01:57 IST

राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारने सत्तेवर येताच तीन लाखांपेक्षा अधिक रकमेच्या सर्व कामांचे ई-टेंडरिंग केल्याने आणि महामंडळावरील नियुक्त्या हो

संदीप प्रधान, मुंबईराज्यातील भाजपा-शिवसेना सरकारने सत्तेवर येताच तीन लाखांपेक्षा अधिक रकमेच्या सर्व कामांचे ई-टेंडरिंग केल्याने आणि महामंडळावरील नियुक्त्या होत नसल्याने दोन्ही पक्षांचे सत्ताधारी आमदार नाराज असून, विधानसभेच्या अधिवेशनात या नाराजीचा सामना सरकारला करावा लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत.मागील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने १० लाखांपेक्षा जास्त रकमेच्या कंत्राटांचे ई-टेंडरिंग केले होते. प्रशासनात अधिक पारदर्शकता आणण्याकरिता भाजपा-शिवसेना सरकारने तीन लाखांपेक्षा जास्त रकमेच्या कंत्राटांचे ई-टेंडरिंग करण्याचा निर्णय घेतला. भ्रष्टाचारमुक्त कारभाराकरिता हा निर्णय चांगला असला, तरी यामुळे आमदारांना त्यांच्या कार्यकर्त्यांना छोटी कामे देऊन त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यात अडसर निर्माण झाला आहे. मागील सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी १० लाखांपेक्षा कमी रकमेची अनेक कामे आपल्या कार्यकर्त्यांना दिली. त्यामुळे सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असा आग्रह भाजपा व शिवसेनेच्या आमदारांनी धरला आहे. दिल्लीतील पराभव भाजपा कार्यकर्त्याच्या नाराजीमुळे झाला. त्यामुळे त्यातून आपण काही शिकलो नाही तर महापालिका निवडणुकीत फटका बसेल, असे मत सत्ताधारी आमदार व्यक्त करीत आहेत.महामंडळांच्या नियुक्त्या झालेल्या नसल्यानेही नाराजी आहे. भाजपाने महामंडळांच्या नियुक्त्या त्यांच्या पक्षाच्या सदस्य नोंदणीशी जोडल्या आहेत. ३१ मार्च २०१५ पर्यंत एक कोटी सदस्य नोंदणी करण्याचे लक्ष्य भाजपाने ठरवले आहे. आतापर्यंत ६० लाख सदस्य नोंदले आहेत. महामंडळाच्या नियुक्त्यांवरून नाराजी निर्माण होऊ नये, याकरिता कदाचित पुन्हा महामंडळाच्या नियुक्त्या टाळल्या जातील, अशी भीती आमदारांना वाटते. सरकार येऊन पाच महिने उलटले. अशाच पद्धतीने नियुक्त्या टाळल्या तर मागील सरकारमध्ये असंतुष्टांना चुचकारण्याकरिता महामंडळाचे गाजर पुढे धरले जायचे तसेच याही सरकारमध्ये होईल, अशी शंका आमदार व्यक्त करीत आहेत.