शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: आझाद मैदान रिकामे करा; मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांची नोटीस
2
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
3
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
Mumbai: मुंबईत मोठी वाहतूक कोंडी; कार्यालय गाठता गाठता नोकरदारांच्या नाकीनऊ!
5
तुम्हाला कन्नड येते का? मुख्यमंत्र्यांच्या प्रश्नावर राष्ट्रपतींचे चोख प्रत्युत्तर; म्हणाल्या,'प्रत्येकाने आपली भाषा...'
6
Maratha Reservation: मराठा आरक्षणाबाबत सरकारचा मसुदा तयार, लवकरच निर्णय!
7
१५ राज्ये, अनेक बँका अन् ओटीपीशिवाय खात्यातून काढले २९ कोटी; ६ आरोपींचे हादरवणारे कृत्य
8
लेख: सोलापूरकरांची ‘सज्जनशक्ती’, गणेशोत्सवात ‘डीजेमुक्ती’
9
लेख: मतभेद पुसून न टाकता ऐक्य साधता येईल काय?
10
हेमा मालिनी यांनी विकले मुंबईतील दोन आलिशान फ्लॅट्स, १२.५ कोटींची कमाई अन् आता...
11
Mumbai: अखेर मांडवा गेटवे जलवाहतुकीला मुहूर्त मिळाला!
12
Raigad Accident: रायगडमध्ये रिक्षाला अपघात, ब्रेक फेल झाल्याने दिशादर्शकाला धडक, तीन ठार
13
Sudan Landslide: अख्खं गावचं गिळलं, १००० लोकांचा मृत्यू, फक्त एक मुलगा वाचला! सुदानमध्ये भुस्खलनाचा प्रकोप
14
आजचे राशीभविष्य, ०२ सप्टेंबर २०२५: प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल, स्वकियांशीच खटके उडतील
15
आजचा अग्रलेख: अमेरिका विरुद्ध सर्व? ट्रम्प यांच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अनेक देश एकत्र
16
विशेष लेख: बाल बलात्कारांनी बांगलादेश हादरला !
17
Mumbai: हायकोर्टाने मराठा आंदोलकांना खडसावले, आज दुपारपर्यंत रस्ते मोकळे करण्याचे आदेश
18
Afghanistan Earthquake: अफगाणिस्तानमध्ये भूकंप, ८०० जणांचा मृत्यू, २५०० हून अधिक जखमी
19
Chhagan Bhujbal: ओबीसीत वाटेकरी नकोत; नाहीतर आम्हीही मुंबईत येऊ, छगन भुजबळांचा इशारा
20
Maratha Reservation: शहर पूर्ववत हवे, पण आंदोलकांचीही चिंता; सुनावणीदरम्यान हायकोर्ट काय म्हणाले?

सत्ताधारी आमदारच नाराज

By admin | Updated: March 2, 2015 01:57 IST

राज्यातील भाजपा-शिवसेना सरकारने सत्तेवर येताच तीन लाखांपेक्षा अधिक रकमेच्या सर्व कामांचे ई-टेंडरिंग केल्याने आणि महामंडळावरील नियुक्त्या हो

संदीप प्रधान, मुंबईराज्यातील भाजपा-शिवसेना सरकारने सत्तेवर येताच तीन लाखांपेक्षा अधिक रकमेच्या सर्व कामांचे ई-टेंडरिंग केल्याने आणि महामंडळावरील नियुक्त्या होत नसल्याने दोन्ही पक्षांचे सत्ताधारी आमदार नाराज असून, विधानसभेच्या अधिवेशनात या नाराजीचा सामना सरकारला करावा लागेल, अशी चिन्हे दिसत आहेत.मागील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने १० लाखांपेक्षा जास्त रकमेच्या कंत्राटांचे ई-टेंडरिंग केले होते. प्रशासनात अधिक पारदर्शकता आणण्याकरिता भाजपा-शिवसेना सरकारने तीन लाखांपेक्षा जास्त रकमेच्या कंत्राटांचे ई-टेंडरिंग करण्याचा निर्णय घेतला. भ्रष्टाचारमुक्त कारभाराकरिता हा निर्णय चांगला असला, तरी यामुळे आमदारांना त्यांच्या कार्यकर्त्यांना छोटी कामे देऊन त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवण्यात अडसर निर्माण झाला आहे. मागील सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांनी १० लाखांपेक्षा कमी रकमेची अनेक कामे आपल्या कार्यकर्त्यांना दिली. त्यामुळे सरकारने आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, असा आग्रह भाजपा व शिवसेनेच्या आमदारांनी धरला आहे. दिल्लीतील पराभव भाजपा कार्यकर्त्याच्या नाराजीमुळे झाला. त्यामुळे त्यातून आपण काही शिकलो नाही तर महापालिका निवडणुकीत फटका बसेल, असे मत सत्ताधारी आमदार व्यक्त करीत आहेत.महामंडळांच्या नियुक्त्या झालेल्या नसल्यानेही नाराजी आहे. भाजपाने महामंडळांच्या नियुक्त्या त्यांच्या पक्षाच्या सदस्य नोंदणीशी जोडल्या आहेत. ३१ मार्च २०१५ पर्यंत एक कोटी सदस्य नोंदणी करण्याचे लक्ष्य भाजपाने ठरवले आहे. आतापर्यंत ६० लाख सदस्य नोंदले आहेत. महामंडळाच्या नियुक्त्यांवरून नाराजी निर्माण होऊ नये, याकरिता कदाचित पुन्हा महामंडळाच्या नियुक्त्या टाळल्या जातील, अशी भीती आमदारांना वाटते. सरकार येऊन पाच महिने उलटले. अशाच पद्धतीने नियुक्त्या टाळल्या तर मागील सरकारमध्ये असंतुष्टांना चुचकारण्याकरिता महामंडळाचे गाजर पुढे धरले जायचे तसेच याही सरकारमध्ये होईल, अशी शंका आमदार व्यक्त करीत आहेत.