शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

देशात सत्तापालट झाला; मात्र पुरोगाम्यांच्या दबावापोटी हिंदुत्ववाद्यांचा छळ केव्हा थांबणार ? - सनातन

By admin | Updated: June 11, 2016 18:10 IST

हिंदुत्वाचे कार्य करणा-या सनातन संस्थेला सॉफ्ट टार्गेट समजून बळीचा बकरा बनवणे भाजपच्या शासनकाळातही चालूच आहे असा आरोप सनातन संस्थेने केला आहे

ऑनलाइन लोकमत - 
मुंबई, दि. 11 - मालेगाव बाँबस्फोट प्रकरणी साध्वींच्या अटकेला ८ वर्षांनंतर त्यांच्या विरोधात पुरावे नाहीत असे तपास यंत्रणांनी सांगितले. मडगाव बाँबस्फोट प्रकरणी सनातन संस्थेच्या साधकांना ४ वर्षांनी निर्दोष मुक्त केले. पानसरे हत्या प्रकरणी समीर गायकवाडला अटक करून ८ महिने झाले, तरी अद्याप एकही पुरावा तपास यंत्रणांकडे नाही, त्यामुळे आरोपपत्र दाखल करण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई चालू आहे. अशातच डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांना अटक केली. यातून पुन्हा एकदा हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या सनातन संस्थेला सॉफ्ट टार्गेट समजून बळीचा बकरा बनवणे भाजपच्या शासनकाळातही चालूच आहे असा आरोप सनातन संस्थेने केला आहे. एकूणच केंद्रात आणि राज्यात सत्तापालट झाला; मात्र हिंदुत्ववाद्यांचा छळ काही थांबलेला नाही, हेच यातून स्पष्ट होत आहे. यामुळे देशातील अनेक हिंदुत्ववादी संघटनांनी आमच्याकडे सरकारच्या या धोरणाविषयी नाराजी व्यक्त केली आहे अशी भुमिका सनातन संस्थेने पत्रकार परिषदेदरम्यान मांडली आहे. 
 
काही दिवसांपूर्वी सनातनच्या पुण्यातील १५ साधकांची चौकशी झाली, पैकी २ जणांच्या पॉलीग्राफीक टेस्टची मागणी सीबीआयने केली. ती मान्य करत सनातनने या प्रकरणी पूर्णतः सहकार्य केले. या टेस्टचे पुढे काय झाले, हे कुठेही कळले नाही. सप्टेंबर २०१५ मध्येच दाभोलकर हत्येप्रकरणी तपास करणारे सीबीआयचे अधिकारी नंदकुमार नायर यांच्या विरोधात आम्ही पत्रकार परिषद घेऊन उच्च न्यायालयाने गंभीर ताशेरे ओढलेल्या अधिकार्‍याची या प्रकरणी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे ते येथेही सनातनला गोवतील, असा आरोप केला होता. तो आज खरा ठरला. काल रात्री उशीरा डॉ. तावडे यांना अटक करून सनातनला गोवण्यासाठी सीबीआयने एक पाऊल पुढे टाकले असल्याचाही दावा सनातनने केला आहे.
 
डॉ. तावडे निष्पाप असून ते सनातनच्या पनवेल येथील आश्रमात साधना करण्यासाठी येत असत. २००७ पूर्वी ते हिंदु जनजागृती समितीत कार्यरत होते. काही कौटुंबिक कारणांमुळे ते घरी राहून साधना करत होते. उद्या कलबुर्गी हत्येप्रकरणीही सनातनच्या आणखी काही निर्दोष साधकांना गोवून अटक करण्याचा प्रयत्न नक्की केला जाईल, यात शंका नाही असंही सनातनने म्हटलं आहे.
दाभोलकर हत्या प्रकरणातील पहिली अटक असा चुकीचा प्रसार !
 
डॉ. दाभोलकरांच्या हत्येप्रकरणी नागोरी आणि खंडेलवाल नामक दोन गुंडांना यापूर्वी अटक करण्यात आली होती. तसेच त्यांच्याकडून हत्येत वापरलेले पिस्तुल मिळवल्याचेही न्यायालयात सांगण्यात आले होते. जर ते पिस्तुल पोलिसांकडे आहे, तर त्याच पिस्तुलाने पुढच्या दोन हत्या कशा काय होऊ शकतात ? यातील नागोरीने न्यायालयात राकेश मारीया यांच्यावर आरोप करतांना गुन्हा कबूल कर, २५ लाख देतो असा दबाव टाकल्याचा खळबळजनक आरोप केला होता. या आरोपाचीही पुढे चौकशी झाली नाही, तसेच दोघेही जामिनावर मुक्तही झाले. 
 
गोव्यात राजकीय बस्तान बसवण्यासाठी आपकडून आरोपांचे सत्र !
 
आपने गोव्यातील पुढील वर्षी होणार्‍या निवडणुका लढवण्याचे घोषित केले असून, त्यामुळे गोव्यात प्रभाव असणार्‍या हिंदुत्ववादी संस्थेवर आरोप करून फुकट प्रसिद्धीसह अल्पसंख्य मतांची बेगमी करण्याचा त्यांचा उद्देश आहे. त्यांनी प्रथम बलात्कार, दंगली, लाच आदी प्रकरणांत गुंतलेल्या आपच्या नेत्यांच्या संदर्भात केजरीवालांना; तसेच काँग्रेसी घोटाळ्यांबद्दल सोनियांना अटक करण्याची मागणी करण्याचे धाडस दाखवावे !